शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

हे तर अंधारात केलेलं पाप; चंद्रपूर जिल्ह्यातील आमदारांच्या प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 17:42 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील काही आमदार व मान्यवरांच्या या काही प्रतिक्रिया.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर:गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या गोंधळाला शनिवारी सकाळी मिळालेल्या कलाटणीने राज्यात चर्चेचा महापूर लोटला आहे. झालेल्या घडामोडी या योग्य आहेत इथपासून ते हा लोकशाहीचा विश्वासघात आहे इथपर्यंतच्या प्रतिक्रिया ऐकू येत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील काही आमदार व मान्यवरांच्या या काही प्रतिक्रिया.हे अंधारातले पाप आहे. मात्र त्यांचा राजकीय डाव फसला आहे. सत्तालोलुप, सत्तेसाठी अस्वस्थ झालेली भाजपा ही कुठल्या थराला जावू शकते, याचे हे जिवंत उदाहरण आहे. सत्ता मिळविण्यासाठी आकडे नसताना मणिपूर, गोवा, कर्नाटकमध्ये जो प्रकार भाजपाने केला आहे. तोच प्रकार महाराष्ट्रात घडवण्याचा असफल प्रयत्न यांनी केला आणि हे सगळे तोंडघशी पडलेत. सत्तेचं समीकरण मांडताना नैतिकता, नितिमत्ता सर्व यांनी गुंडाळली. सत्तेचा दुरुपयोग करून येनकेनप्रकारे सत्ता मिळवायची या एकाच उद्देशाने ही मंडळी पछाडलेली आहे. आता त्यांच्याकडे कुणीही आमदार राहिलेला नाही. शपथ घेतली खरी परंतु बहुमत सिद्ध करण्याअगोदरच त्यांना राजीनामा द्यावा लागेल. पुन्हा असले धंदे करण्याचा प्रयत्न या मंडळींनी करू नये, एवढेच आमचे म्हणणे आहे.- विजय वडेट्टीवार, आमदार तथा काँग्रेसचे विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेता.अजितदादांनी जे काही केले ते फार चुकीचे केलेले आहे. त्यांच्यासोबतच गेलेले काही आमदार परत आले आहेत. अजितदादासुद्धा परत येतील. भाजप कदापि विश्वास मत जिंकू शकणार नाही. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाआघाडीचीच सत्ता येईल. आम्ही सर्व आमदार एकत्र आहोत. पवार साहेब निर्णय घेतील.- प्रतिभा धानोरकर, नवनिर्वाचित काँग्रेस आमदार, वरोरा विधानसभा मतदार संघ, जि. चंद्रपूर.आज महाराष्ट्रात जे काही घडले आहे ते चुकीचे झालेले आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला घेऊन महाआघाडीच्या माध्यमातून सत्तेची मोट बांधिली होती. परंतु आज जो घटनाक्रम महाराष्ट्राला बघायला मिळाला तो अनपेक्षित आहे.- सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर, खासदार, चंद्रपूर.महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होती. शेतकऱ्यांची दैनावस्था आहे. कामगार, कष्टकऱ्यांचेही प्रश्न गंभीर झालेले आहे. अशा परिस्थितीत कुणीतरी पुढाकार घेऊन सत्ता स्थापन करणे गरजेचे होते. सत्ता स्थापनेमागे कदाचित हेच कारण असावे.- किशोर जोरगेवार, अपक्ष आमदार, चंद्रपूर.महाराष्ट्रातील आजचे सत्तांतर अनपेक्षित आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र आहे. भाजपने जे सरकार बसविले ते विधानसभेत कदापि बहुमत सिद्ध करू शकणार नाही. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना व राकाँचेच सरकार राज्यात येणार आहे.- सुभाष धोटे, काँग्रेस आमदार, राजुरा.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार