शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

हे तर अंधारात केलेलं पाप; चंद्रपूर जिल्ह्यातील आमदारांच्या प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 17:42 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील काही आमदार व मान्यवरांच्या या काही प्रतिक्रिया.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर:गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या गोंधळाला शनिवारी सकाळी मिळालेल्या कलाटणीने राज्यात चर्चेचा महापूर लोटला आहे. झालेल्या घडामोडी या योग्य आहेत इथपासून ते हा लोकशाहीचा विश्वासघात आहे इथपर्यंतच्या प्रतिक्रिया ऐकू येत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील काही आमदार व मान्यवरांच्या या काही प्रतिक्रिया.हे अंधारातले पाप आहे. मात्र त्यांचा राजकीय डाव फसला आहे. सत्तालोलुप, सत्तेसाठी अस्वस्थ झालेली भाजपा ही कुठल्या थराला जावू शकते, याचे हे जिवंत उदाहरण आहे. सत्ता मिळविण्यासाठी आकडे नसताना मणिपूर, गोवा, कर्नाटकमध्ये जो प्रकार भाजपाने केला आहे. तोच प्रकार महाराष्ट्रात घडवण्याचा असफल प्रयत्न यांनी केला आणि हे सगळे तोंडघशी पडलेत. सत्तेचं समीकरण मांडताना नैतिकता, नितिमत्ता सर्व यांनी गुंडाळली. सत्तेचा दुरुपयोग करून येनकेनप्रकारे सत्ता मिळवायची या एकाच उद्देशाने ही मंडळी पछाडलेली आहे. आता त्यांच्याकडे कुणीही आमदार राहिलेला नाही. शपथ घेतली खरी परंतु बहुमत सिद्ध करण्याअगोदरच त्यांना राजीनामा द्यावा लागेल. पुन्हा असले धंदे करण्याचा प्रयत्न या मंडळींनी करू नये, एवढेच आमचे म्हणणे आहे.- विजय वडेट्टीवार, आमदार तथा काँग्रेसचे विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेता.अजितदादांनी जे काही केले ते फार चुकीचे केलेले आहे. त्यांच्यासोबतच गेलेले काही आमदार परत आले आहेत. अजितदादासुद्धा परत येतील. भाजप कदापि विश्वास मत जिंकू शकणार नाही. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाआघाडीचीच सत्ता येईल. आम्ही सर्व आमदार एकत्र आहोत. पवार साहेब निर्णय घेतील.- प्रतिभा धानोरकर, नवनिर्वाचित काँग्रेस आमदार, वरोरा विधानसभा मतदार संघ, जि. चंद्रपूर.आज महाराष्ट्रात जे काही घडले आहे ते चुकीचे झालेले आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला घेऊन महाआघाडीच्या माध्यमातून सत्तेची मोट बांधिली होती. परंतु आज जो घटनाक्रम महाराष्ट्राला बघायला मिळाला तो अनपेक्षित आहे.- सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर, खासदार, चंद्रपूर.महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होती. शेतकऱ्यांची दैनावस्था आहे. कामगार, कष्टकऱ्यांचेही प्रश्न गंभीर झालेले आहे. अशा परिस्थितीत कुणीतरी पुढाकार घेऊन सत्ता स्थापन करणे गरजेचे होते. सत्ता स्थापनेमागे कदाचित हेच कारण असावे.- किशोर जोरगेवार, अपक्ष आमदार, चंद्रपूर.महाराष्ट्रातील आजचे सत्तांतर अनपेक्षित आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र आहे. भाजपने जे सरकार बसविले ते विधानसभेत कदापि बहुमत सिद्ध करू शकणार नाही. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना व राकाँचेच सरकार राज्यात येणार आहे.- सुभाष धोटे, काँग्रेस आमदार, राजुरा.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार