शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

आमचे तरुणपण पोलीस भरतीच्या तयारीतच घालवायचे का? सोशल मीडियावर व्यक्त होतोय रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2022 17:43 IST

पोलीस भरती रद्द झाल्याने नाराजी

चंद्रपूर : तीन वर्षांनंतर होऊ घातलेली पोलीस भरती राज्य शासनाने पुढे ढकलली. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. एकतर तीन वर्षांनंतर भरती काढली. त्यातही प्रशासकीय कारण पुढे करत ती भरती समोर ढकलली. असेच सुरू राहिल्यास आम्ही आयुष्यभर पोलीस भरतीची तयारी करायची काय, असा प्रश्न तरुण युवक सरकारला सोशल मीडियावर विचारताना दिसून येत आहेत.

पोलीस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेकजण मागील काही वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करीत आहेत. परंतु, तीन वर्षांपासून भरती झालीच नाही. नुकतीच जाहिरात प्रसिद्ध होताच ती भरती रद्द करण्यात आली. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांची निराशा झाली आहे. पुन्हा किती दिवस तयारी करावी लागणार असा प्रश्न ते सरकारला विचारत आहेत.

पोलीस भरती पुढे ढकलली

- राज्यात २० हजार पदांसाठी पोलीस भरती होणार होती. तशा सूचना पोलीस महासंचालकांकडून पोलीस आयुक्तांना देण्यात आल्या होत्या.

- परंतु, सरकारने प्रशासकीय कारण पुढे करून भरती पुढे ढकलली आहे.

जिल्ह्यात १९४ पदांसाठी होणार भरती

राज्यात वीस हजार पदांची भरती होणार होती.

चंद्रपूर जिल्ह्यात १९४ पदांसाठी भरती होणार होती.

परंतु, आता पोलीस भरतीच रद्द झाल्याने तरुणांचा हिरमोड झाला आहे.

पोर पोलीस व्हावं म्हणून किती वर्षे खर्च करायची?

पोराला पोलीस बनायचं आहे. भरतीची तयारी करतो अन् शिकवणी लावतो. म्हणून पोरगा तीन वर्षांपासून चंद्रपूरला राहतो. पण भरतीच निघत नाही. हातावर आणून पोटावर खाण्याची परिस्थिती आहे.

- संगम रायपुरे, पालक

पोराची पोलीस भरतीची तयारी चांगली व्हावी, म्हणून त्याला अकादमीमध्ये टाकले. परंतु, भरतीच निघेना. भरतीच्या प्रतीक्षेत वय वाढत आहे. किती दिवस पैसे पुरवायचे.

- जितेंद्र सायमवार, पालक

चार वर्षांपासून तयारी करतोय, पुढे काय?

पोलीस बनण्याचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. शारीरिक क्षमता चाचणी व पेपरचा अभ्यास करीत आहे. पण भरतीच निघत नसल्याने काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वय वाढत चालले आहे. परंतु, सरकार भरती प्रक्रिया राबवत नाही.

- प्रफुल्ल गोंगले

आई-वडील मुलगा पोलीस बनेल असे स्वप्न बघत आहेत. ते पूर्ण करण्यासाठी कठोर प्रयत्न करीत आहेत. पण भरतीच निघत नसल्याने किती दिवस भरतीची तयारीच करावी लागणार काही कळेनासे झाले आहे. भरतीची माहिती मिळताच घरी कळविले. आता भरती निघाली. तुमचे स्वप्न पूर्ण करेल. पण दुसऱ्याच दिवशी भरती रद्द झाल्याचे कळवावे लागले.

- सयम मडावी

टॅग्स :SocialसामाजिकPoliceपोलिसjobनोकरी