शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

आमचे तरुणपण पोलीस भरतीच्या तयारीतच घालवायचे का? सोशल मीडियावर व्यक्त होतोय रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2022 17:43 IST

पोलीस भरती रद्द झाल्याने नाराजी

चंद्रपूर : तीन वर्षांनंतर होऊ घातलेली पोलीस भरती राज्य शासनाने पुढे ढकलली. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. एकतर तीन वर्षांनंतर भरती काढली. त्यातही प्रशासकीय कारण पुढे करत ती भरती समोर ढकलली. असेच सुरू राहिल्यास आम्ही आयुष्यभर पोलीस भरतीची तयारी करायची काय, असा प्रश्न तरुण युवक सरकारला सोशल मीडियावर विचारताना दिसून येत आहेत.

पोलीस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेकजण मागील काही वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करीत आहेत. परंतु, तीन वर्षांपासून भरती झालीच नाही. नुकतीच जाहिरात प्रसिद्ध होताच ती भरती रद्द करण्यात आली. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांची निराशा झाली आहे. पुन्हा किती दिवस तयारी करावी लागणार असा प्रश्न ते सरकारला विचारत आहेत.

पोलीस भरती पुढे ढकलली

- राज्यात २० हजार पदांसाठी पोलीस भरती होणार होती. तशा सूचना पोलीस महासंचालकांकडून पोलीस आयुक्तांना देण्यात आल्या होत्या.

- परंतु, सरकारने प्रशासकीय कारण पुढे करून भरती पुढे ढकलली आहे.

जिल्ह्यात १९४ पदांसाठी होणार भरती

राज्यात वीस हजार पदांची भरती होणार होती.

चंद्रपूर जिल्ह्यात १९४ पदांसाठी भरती होणार होती.

परंतु, आता पोलीस भरतीच रद्द झाल्याने तरुणांचा हिरमोड झाला आहे.

पोर पोलीस व्हावं म्हणून किती वर्षे खर्च करायची?

पोराला पोलीस बनायचं आहे. भरतीची तयारी करतो अन् शिकवणी लावतो. म्हणून पोरगा तीन वर्षांपासून चंद्रपूरला राहतो. पण भरतीच निघत नाही. हातावर आणून पोटावर खाण्याची परिस्थिती आहे.

- संगम रायपुरे, पालक

पोराची पोलीस भरतीची तयारी चांगली व्हावी, म्हणून त्याला अकादमीमध्ये टाकले. परंतु, भरतीच निघेना. भरतीच्या प्रतीक्षेत वय वाढत आहे. किती दिवस पैसे पुरवायचे.

- जितेंद्र सायमवार, पालक

चार वर्षांपासून तयारी करतोय, पुढे काय?

पोलीस बनण्याचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. शारीरिक क्षमता चाचणी व पेपरचा अभ्यास करीत आहे. पण भरतीच निघत नसल्याने काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वय वाढत चालले आहे. परंतु, सरकार भरती प्रक्रिया राबवत नाही.

- प्रफुल्ल गोंगले

आई-वडील मुलगा पोलीस बनेल असे स्वप्न बघत आहेत. ते पूर्ण करण्यासाठी कठोर प्रयत्न करीत आहेत. पण भरतीच निघत नसल्याने किती दिवस भरतीची तयारीच करावी लागणार काही कळेनासे झाले आहे. भरतीची माहिती मिळताच घरी कळविले. आता भरती निघाली. तुमचे स्वप्न पूर्ण करेल. पण दुसऱ्याच दिवशी भरती रद्द झाल्याचे कळवावे लागले.

- सयम मडावी

टॅग्स :SocialसामाजिकPoliceपोलिसjobनोकरी