शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
5
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
6
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
7
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
8
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
9
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
10
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
11
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
12
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
13
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
14
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
15
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
16
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
17
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
18
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
19
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले

मिळायला हवे होते ५० हजार, खात्यात आले फक्त आठ ! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये भरपाई कमी मिळाल्याने संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 19:59 IST

Chandrapur : शेतकऱ्यांना एका हेक्टरमागे पीक पेरणीचा खर्च जवळपास ५० हजार येतो. यामुळे अतिवृष्टीत झालेल्या नुकसानाची भरपाई ५० हजार मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात गेल्या ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये बल्लारपूर तालुक्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. संकटात सापडलेल्या तालुक्यांतील अतिवृष्टीग्रस्त ४ हजार २६५ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मदत देण्यासाठी शासनामार्फत मदतनिधी मंजूर करण्यात आला. काही शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा झाला आहे. मात्र, मागणी ५० हजारांची असतानाही काही शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ ८ हजार ५०० रुपये जमा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

शेतकऱ्यांना एका हेक्टरमागे पीक पेरणीचा खर्च जवळपास ५० हजार येतो. यामुळे अतिवृष्टीत झालेल्या नुकसानाची भरपाई ५० हजार मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. परंतु, शासनाने एका हेक्टरमागे ८ हजार ५०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी आहे.

बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम आजघडीला तालुका प्रशासनामार्फत सुरू आहे. आतापर्यंत २ हजार ७०० च्या जवळपास याद्या उपलोड करण्यात आल्या आहेत. तर मदतीची रक्कम दिवाळीच्या दिवशी काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. इतरांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात बल्लारपूर तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक नुकसान गेल्या ऑगस्टमध्ये ३ हजार ५६७ शेतकरी व सप्टेंबर महिन्यात ६९८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

पोर्टलवर याद्या अपलोड

मंजूर मदतीची रक्कम अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीत जमा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम तहसील कार्यालयामध्ये १८ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले असून, आतापर्यंत २ हजार ७००च्या वर याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत. याद्या अपलोड करणे सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात बल्लारपूर तालुक्यात ३५ गावांतील ३ हजार ५६७ शेतकऱ्यांची ३ हजार ६२९.९३ हेक्टर शेती अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झाली.

या गावांमध्ये नुकसान

सप्टेंबरमध्ये ६९८ शेतकऱ्यांच्या शेतीतील पीक नष्ट झाले. यामध्ये धान २०२ हेक्टर, कापूस ३ हजार ८५ हेक्टर, सोयाबीन ११६ हेक्टर व तूर २२५ हेक्टर शेतमालाचे नुकसान झाले. जास्त नुकसान झालेल्या काटवली, आमडी, किन्ही, दुधोली, चारवट, पळसगाव, दहेली, कोठारी, कवडजई, बामणी, नांदगाव पोडे, हडस्ती, विसापूर या गावांचा समावेश आहे.

"पुरामुळे आमच्या शेतात दोन हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याची नोंद केली. परंतु, एक हेक्टरचे ८ हजार ५०० रुपये खात्यात जमा झाले."- आबाजी देरकर, दहेली, ता. बल्लारपूर

English
हिंदी सारांश
Web Title : Rain-hit farmers receive meager compensation, sparking outrage in Ballarpur.

Web Summary : Ballarpur farmers, hit by August-September floods, are angry. They requested ₹50,000 compensation per hectare but received only ₹8,500. While the administration uploads farmer lists, the low payout sparks discontent.
टॅग्स :Farmerशेतकरीfarmingशेती