शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मिळायला हवे होते ५० हजार, खात्यात आले फक्त आठ ! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये भरपाई कमी मिळाल्याने संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 19:59 IST

Chandrapur : शेतकऱ्यांना एका हेक्टरमागे पीक पेरणीचा खर्च जवळपास ५० हजार येतो. यामुळे अतिवृष्टीत झालेल्या नुकसानाची भरपाई ५० हजार मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात गेल्या ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये बल्लारपूर तालुक्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. संकटात सापडलेल्या तालुक्यांतील अतिवृष्टीग्रस्त ४ हजार २६५ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मदत देण्यासाठी शासनामार्फत मदतनिधी मंजूर करण्यात आला. काही शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा झाला आहे. मात्र, मागणी ५० हजारांची असतानाही काही शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ ८ हजार ५०० रुपये जमा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

शेतकऱ्यांना एका हेक्टरमागे पीक पेरणीचा खर्च जवळपास ५० हजार येतो. यामुळे अतिवृष्टीत झालेल्या नुकसानाची भरपाई ५० हजार मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. परंतु, शासनाने एका हेक्टरमागे ८ हजार ५०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी आहे.

बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम आजघडीला तालुका प्रशासनामार्फत सुरू आहे. आतापर्यंत २ हजार ७०० च्या जवळपास याद्या उपलोड करण्यात आल्या आहेत. तर मदतीची रक्कम दिवाळीच्या दिवशी काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. इतरांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात बल्लारपूर तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक नुकसान गेल्या ऑगस्टमध्ये ३ हजार ५६७ शेतकरी व सप्टेंबर महिन्यात ६९८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

पोर्टलवर याद्या अपलोड

मंजूर मदतीची रक्कम अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीत जमा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम तहसील कार्यालयामध्ये १८ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले असून, आतापर्यंत २ हजार ७००च्या वर याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत. याद्या अपलोड करणे सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात बल्लारपूर तालुक्यात ३५ गावांतील ३ हजार ५६७ शेतकऱ्यांची ३ हजार ६२९.९३ हेक्टर शेती अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झाली.

या गावांमध्ये नुकसान

सप्टेंबरमध्ये ६९८ शेतकऱ्यांच्या शेतीतील पीक नष्ट झाले. यामध्ये धान २०२ हेक्टर, कापूस ३ हजार ८५ हेक्टर, सोयाबीन ११६ हेक्टर व तूर २२५ हेक्टर शेतमालाचे नुकसान झाले. जास्त नुकसान झालेल्या काटवली, आमडी, किन्ही, दुधोली, चारवट, पळसगाव, दहेली, कोठारी, कवडजई, बामणी, नांदगाव पोडे, हडस्ती, विसापूर या गावांचा समावेश आहे.

"पुरामुळे आमच्या शेतात दोन हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याची नोंद केली. परंतु, एक हेक्टरचे ८ हजार ५०० रुपये खात्यात जमा झाले."- आबाजी देरकर, दहेली, ता. बल्लारपूर

English
हिंदी सारांश
Web Title : Rain-hit farmers receive meager compensation, sparking outrage in Ballarpur.

Web Summary : Ballarpur farmers, hit by August-September floods, are angry. They requested ₹50,000 compensation per hectare but received only ₹8,500. While the administration uploads farmer lists, the low payout sparks discontent.
टॅग्स :Farmerशेतकरीfarmingशेती