शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

कोहीनूर तलावातील भाजीबाजारावरून धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 06:00 IST

शहरातील गंजवार्डात अनेक वर्षांपासून भाजीबाजार भरत आहे. सकाळी ८ वाजतापासूनच या बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळते. संचारबंदी असतानाही बाजार सुरू असल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव होण्याचा धोका वर्तविण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात सूचना दिल्यानंतर मनपाने शनिवारपासून किरकोळ भाजी विक्रेत्यांना कोहीनुर तलावात पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. तलावात चुन्याने चौकटीही आखून दिल्या.

ठळक मुद्देमनपाचा निर्णय ठरला वादग्रस्त । भरलाच नाही गंज वार्डातील भाजीबाजार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना दहशतीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गंज वार्डातील किरकोळ भाजी विक्रेत्यांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून कोहीनुर तलावात बाजार भरविण्याचा निर्णय मनपाने शुक्रवारी घेतला होता. मात्र, तापत्या उन्हात व्यावसायिकांसाठी कुठलीही व्यवस्था नसल्याच्या कारणावरून व्यावसायिक व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे मनपाचा निर्णय वादग्रस्त ठरला असून भाजीबाजारच भरला नाही. शहरातील शेकडो नागरिकांना भाजीपाल्याविना घरी परत जावे लागले.शहरातील गंजवार्डात अनेक वर्षांपासून भाजीबाजार भरत आहे. सकाळी ८ वाजतापासूनच या बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळते. संचारबंदी असतानाही बाजार सुरू असल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव होण्याचा धोका वर्तविण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात सूचना दिल्यानंतर मनपाने शनिवारपासून किरकोळ भाजी विक्रेत्यांना कोहीनुर तलावात पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. तलावात चुन्याने चौकटीही आखून दिल्या. केवळ लिलाव करणाºयाना गाळेधारकांना विक्रेत्यांनाच सकाळी ९ वाजतापर्यंत गंजवार्डात व्यवसाय करण्याची मूभा देण्यात आली. मात्र, किरकोळ भाजीपाला विकता येणार नाही, अशा सूचना दिल्या. परंतु, किरकोळ विक्रेते माल उचलणार की नाही, या भीतीने बहुतांश गाळेधारक व्यावसायिकांनी शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा जोतिबा फुले बाजारात थोक भाजीपाला खरेदी केला नाही. काही किरकोळ विक्रेत्यांनी सकाळी दुकाने लावण्याची तयारी करत असताना मनपा पथकाने ध्वनीक्षेपकाद्वारे सूचना देऊन गंजवार्डातून हुसकावून लावले. कोहीनुर तलावात जाण्याचे आवाहन केले. परंतु, त्या ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी व्यवस्थाच नसल्याचा आरोप करून विक्रेते फिरकलेच नाही. दरम्यान, व्यवस्थेच्या कारणावरून सकाळी ११ वाजताच्या सुमारास काही विक्रेते व मनपा कर्मचाºयांमध्ये धक्काबुक्की झाल्याने भाजी बाजारच भरला नाही. त्यानंतर काही विक्रेत्यांनी रामाळा तलाव परिसरात दुकाने लावल्याचे दिसून आले.हातठेल्यांवरून शहरात भाजीपाला विक्रीगंजवार्डातील भाजीबाजार नियोजित कोहीनुर तलावात न भरल्याने बºयाच किरकोळ विक्रेत्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा जोतिबा फुले बाजारातून भाजीपाला खरेदी करून हातठेल्यावरून वार्डावार्डात विक्री करीत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMarketबाजार