शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

लोकसेवकांच्या पुढाकारातून फुटणार शिवाराला ‘पाझर’

By admin | Updated: May 27, 2017 00:39 IST

वातावरणाचा बिघडत चाललेला समतोल यामुळे दिवसागणिक पावसाचे प्रमाण कमी होवू लागले आहे. तर वाढत्या उष्णतेमुळे जलसाठे कोरडे पडण्याचेही प्रमाण वाढले आहेत.

एसडीओंचा पुढाकार : जांभुळघाट गावात वाढणार पाण्याची पातळी लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : वातावरणाचा बिघडत चाललेला समतोल यामुळे दिवसागणिक पावसाचे प्रमाण कमी होवू लागले आहे. तर वाढत्या उष्णतेमुळे जलसाठे कोरडे पडण्याचेही प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे गावा-गावात पाण्याचा दुष्काळ निर्माण होत आहे. या दुष्काळातून गावकऱ्यांची सुटका करण्यासाठी चिमूर येथील लोकसेवकांच्या पुढाकारातून जांभुळघाट येथील तळ्यातील गाळ उपसा करण्यासाठी चक्क लोकसेकांनी स्वत: वर्गणी गोळा करून कामाला सुरुवात केली. त्यामुळे आता जांभुळघाट येथील शिवारला पाझर फुटणार आहे.महाराष्ट्र राज्य हे देशात सर्वात जास्त धरण जलसाठे असलेले राज्य असून या धरणामध्ये दरवर्षी साचत चालेलेल्या गाळामुळे धरण, तलावाच्या पाणी साठवण क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे तलावातील गाळ काढून शेतकऱ्यांचा शेतात टाकण्यात येत आहे. त्या योजनेमुळे धरण तलाव याचा पाणी क्षमतेत वाढ होवून शेतकऱ्यांचा उत्पादनात वाढ होणार आहे. तसेच गावातील जलस्तर वाढून जणावरांना पिण्याचे पाणी मुबलक मिळण्यास उपयोग होणार आहे. त्यामुळेही योजना शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार आहे.