शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

मूल तालुका दुष्काळाच्या छायेत

By admin | Updated: November 30, 2015 00:54 IST

निसर्गाच्या अवकृपेमुळे पडलेला अत्यल्प पाऊस शेतकऱ्यांना चिंतातुर करणारा ठरला.

उत्पादन घटले : शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षाराजू गेडाम मूलनिसर्गाच्या अवकृपेमुळे पडलेला अत्यल्प पाऊस शेतकऱ्यांना चिंतातुर करणारा ठरला. पावसाचे अल्प प्रमाण असतानादेखील रोवणीनंतर पाऊस येईल ही नाही, या चिंतेतच शेतकऱ्यांनी धानाची रोवणी केली. बँकेतून कर्ज घेऊन केलेल्या रोवणीचे फलीत होईल ही आशा बाळगून केलेल्या रोवणीवर पाणी फेरले गेले. अनेकांचे पाण्याअभावी शेतावरच पिक करपले. लाखो रुपयाचा चुराडा होत असताना शेतकऱ्यांनीही हाय खाल्ली. ज्यांना पाण्याची काही प्रमाणात सोय उपलब्ध होती, त्यांचे उत्पादन घटले. लावलेला पैसा मिळाला नसल्याने शेतकरी चिंतातुर झाल्याचे चित्र मूल तालुक्यात दिसत आहे. बँकेतून घेतलेल्या कर्जावर कपात केलेला पीक विमा तरी मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना असल्याने ते शासनाच्या आणेवारीकडे आस लावून बसले आहेत. मूल तालुक्यात १८७०६.०९ हेक्टर आर जागेवर धानाची रोवणी करण्यात आली. यात ४५९.१६ हेक्टर आर जागेत आवत्या पेरण्यात आल्या आहेत. सर्वसाधारणपणे तालुक्यात सरासरी पाऊस ११४१.५ मिमी पडतो. मात्र यावर्षी १०४१.६ मिमी पाऊस पडला आहे. एकंदरीत ९४.५ मिमी पावसाची घट झाली. हा पाऊस पडला असता तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असता. गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडणार अशी घोषणा करून जलपूजनदेखील करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळेल, या आशेने मनात नसतानादेखील धानाची रोवणी केली. मात्र गोसेखुर्द धरणाचे पाणी न पोहचल्याने धानाचे पिक पाण्याअभावी करपले. यावर्षी ज्या शेतकऱ्यांना पाण्याची सोय उपलब्ध होती. त्यांना पीक झाले असले तरी धानाचे उत्पादन घटल्याचे शेतकरी सांगतात. लावलेला पैसादेखील निघणार नसल्याने मूल तालुक्यातील शेतकरी चिंतातुर दिसत आहेत. मूल तालुक्याची जर अंदाजे आणेवारी ही ५० पैशापेक्षा जास्त आहे. नजरअंदाज आणेवारी ही ५० पैशाच्या वर असल्याने दुष्काळ जाहीर होणार की नाही, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. मात्र प्रत्यक्षात डिसेंबर-जानेवारी महिन्यात पैसेवारी काढली जाते. त्यात तालुका दुष्काळग्रस्त घोषित होऊ शकेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मूल येथून तीन हजार ५२४ शेतकऱ्यांनी १३ लाख ३९ हजार १४० रुपये भरून पीक विमा काढला आहे. यावेळी दुष्काळाची परिस्थिती असल्याने बँकदेखील पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करीत होते. मात्र प्रत्यक्ष पैसेवारी ५० पैशाच्या आतमध्ये आल्यावरच तालुका दुष्काळामध्ये समाविष्ट होऊन पीक विम्याचा लाभ मिळू शकेल. मागील वर्षी पीक विम्याचा लाभ मूल तालुक्यातील जनतेला मिळाला नव्हता. उर्वरित जवळपास सर्वच तालुक्याला मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांकडून प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील जवळपास ६० टक्के शेतकऱ्यांचे पिके शेतातच करपली. तर ३० टक्के शेतकऱ्यांना पिकाचे उत्पादन आले असले तरी उत्पादन घटल्याने लावलेला पैसा निघणार नसल्याचे बोलले जात आहे. दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा आहे.