शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

मूल तालुका दुष्काळाच्या छायेत

By admin | Updated: November 30, 2015 00:54 IST

निसर्गाच्या अवकृपेमुळे पडलेला अत्यल्प पाऊस शेतकऱ्यांना चिंतातुर करणारा ठरला.

उत्पादन घटले : शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षाराजू गेडाम मूलनिसर्गाच्या अवकृपेमुळे पडलेला अत्यल्प पाऊस शेतकऱ्यांना चिंतातुर करणारा ठरला. पावसाचे अल्प प्रमाण असतानादेखील रोवणीनंतर पाऊस येईल ही नाही, या चिंतेतच शेतकऱ्यांनी धानाची रोवणी केली. बँकेतून कर्ज घेऊन केलेल्या रोवणीचे फलीत होईल ही आशा बाळगून केलेल्या रोवणीवर पाणी फेरले गेले. अनेकांचे पाण्याअभावी शेतावरच पिक करपले. लाखो रुपयाचा चुराडा होत असताना शेतकऱ्यांनीही हाय खाल्ली. ज्यांना पाण्याची काही प्रमाणात सोय उपलब्ध होती, त्यांचे उत्पादन घटले. लावलेला पैसा मिळाला नसल्याने शेतकरी चिंतातुर झाल्याचे चित्र मूल तालुक्यात दिसत आहे. बँकेतून घेतलेल्या कर्जावर कपात केलेला पीक विमा तरी मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना असल्याने ते शासनाच्या आणेवारीकडे आस लावून बसले आहेत. मूल तालुक्यात १८७०६.०९ हेक्टर आर जागेवर धानाची रोवणी करण्यात आली. यात ४५९.१६ हेक्टर आर जागेत आवत्या पेरण्यात आल्या आहेत. सर्वसाधारणपणे तालुक्यात सरासरी पाऊस ११४१.५ मिमी पडतो. मात्र यावर्षी १०४१.६ मिमी पाऊस पडला आहे. एकंदरीत ९४.५ मिमी पावसाची घट झाली. हा पाऊस पडला असता तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असता. गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडणार अशी घोषणा करून जलपूजनदेखील करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळेल, या आशेने मनात नसतानादेखील धानाची रोवणी केली. मात्र गोसेखुर्द धरणाचे पाणी न पोहचल्याने धानाचे पिक पाण्याअभावी करपले. यावर्षी ज्या शेतकऱ्यांना पाण्याची सोय उपलब्ध होती. त्यांना पीक झाले असले तरी धानाचे उत्पादन घटल्याचे शेतकरी सांगतात. लावलेला पैसादेखील निघणार नसल्याने मूल तालुक्यातील शेतकरी चिंतातुर दिसत आहेत. मूल तालुक्याची जर अंदाजे आणेवारी ही ५० पैशापेक्षा जास्त आहे. नजरअंदाज आणेवारी ही ५० पैशाच्या वर असल्याने दुष्काळ जाहीर होणार की नाही, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. मात्र प्रत्यक्षात डिसेंबर-जानेवारी महिन्यात पैसेवारी काढली जाते. त्यात तालुका दुष्काळग्रस्त घोषित होऊ शकेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मूल येथून तीन हजार ५२४ शेतकऱ्यांनी १३ लाख ३९ हजार १४० रुपये भरून पीक विमा काढला आहे. यावेळी दुष्काळाची परिस्थिती असल्याने बँकदेखील पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करीत होते. मात्र प्रत्यक्ष पैसेवारी ५० पैशाच्या आतमध्ये आल्यावरच तालुका दुष्काळामध्ये समाविष्ट होऊन पीक विम्याचा लाभ मिळू शकेल. मागील वर्षी पीक विम्याचा लाभ मूल तालुक्यातील जनतेला मिळाला नव्हता. उर्वरित जवळपास सर्वच तालुक्याला मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांकडून प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील जवळपास ६० टक्के शेतकऱ्यांचे पिके शेतातच करपली. तर ३० टक्के शेतकऱ्यांना पिकाचे उत्पादन आले असले तरी उत्पादन घटल्याने लावलेला पैसा निघणार नसल्याचे बोलले जात आहे. दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा आहे.