शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मूल तालुका दुष्काळाच्या छायेत

By admin | Updated: November 30, 2015 00:54 IST

निसर्गाच्या अवकृपेमुळे पडलेला अत्यल्प पाऊस शेतकऱ्यांना चिंतातुर करणारा ठरला.

उत्पादन घटले : शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षाराजू गेडाम मूलनिसर्गाच्या अवकृपेमुळे पडलेला अत्यल्प पाऊस शेतकऱ्यांना चिंतातुर करणारा ठरला. पावसाचे अल्प प्रमाण असतानादेखील रोवणीनंतर पाऊस येईल ही नाही, या चिंतेतच शेतकऱ्यांनी धानाची रोवणी केली. बँकेतून कर्ज घेऊन केलेल्या रोवणीचे फलीत होईल ही आशा बाळगून केलेल्या रोवणीवर पाणी फेरले गेले. अनेकांचे पाण्याअभावी शेतावरच पिक करपले. लाखो रुपयाचा चुराडा होत असताना शेतकऱ्यांनीही हाय खाल्ली. ज्यांना पाण्याची काही प्रमाणात सोय उपलब्ध होती, त्यांचे उत्पादन घटले. लावलेला पैसा मिळाला नसल्याने शेतकरी चिंतातुर झाल्याचे चित्र मूल तालुक्यात दिसत आहे. बँकेतून घेतलेल्या कर्जावर कपात केलेला पीक विमा तरी मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना असल्याने ते शासनाच्या आणेवारीकडे आस लावून बसले आहेत. मूल तालुक्यात १८७०६.०९ हेक्टर आर जागेवर धानाची रोवणी करण्यात आली. यात ४५९.१६ हेक्टर आर जागेत आवत्या पेरण्यात आल्या आहेत. सर्वसाधारणपणे तालुक्यात सरासरी पाऊस ११४१.५ मिमी पडतो. मात्र यावर्षी १०४१.६ मिमी पाऊस पडला आहे. एकंदरीत ९४.५ मिमी पावसाची घट झाली. हा पाऊस पडला असता तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असता. गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडणार अशी घोषणा करून जलपूजनदेखील करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळेल, या आशेने मनात नसतानादेखील धानाची रोवणी केली. मात्र गोसेखुर्द धरणाचे पाणी न पोहचल्याने धानाचे पिक पाण्याअभावी करपले. यावर्षी ज्या शेतकऱ्यांना पाण्याची सोय उपलब्ध होती. त्यांना पीक झाले असले तरी धानाचे उत्पादन घटल्याचे शेतकरी सांगतात. लावलेला पैसादेखील निघणार नसल्याने मूल तालुक्यातील शेतकरी चिंतातुर दिसत आहेत. मूल तालुक्याची जर अंदाजे आणेवारी ही ५० पैशापेक्षा जास्त आहे. नजरअंदाज आणेवारी ही ५० पैशाच्या वर असल्याने दुष्काळ जाहीर होणार की नाही, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. मात्र प्रत्यक्षात डिसेंबर-जानेवारी महिन्यात पैसेवारी काढली जाते. त्यात तालुका दुष्काळग्रस्त घोषित होऊ शकेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मूल येथून तीन हजार ५२४ शेतकऱ्यांनी १३ लाख ३९ हजार १४० रुपये भरून पीक विमा काढला आहे. यावेळी दुष्काळाची परिस्थिती असल्याने बँकदेखील पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करीत होते. मात्र प्रत्यक्ष पैसेवारी ५० पैशाच्या आतमध्ये आल्यावरच तालुका दुष्काळामध्ये समाविष्ट होऊन पीक विम्याचा लाभ मिळू शकेल. मागील वर्षी पीक विम्याचा लाभ मूल तालुक्यातील जनतेला मिळाला नव्हता. उर्वरित जवळपास सर्वच तालुक्याला मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांकडून प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील जवळपास ६० टक्के शेतकऱ्यांचे पिके शेतातच करपली. तर ३० टक्के शेतकऱ्यांना पिकाचे उत्पादन आले असले तरी उत्पादन घटल्याने लावलेला पैसा निघणार नसल्याचे बोलले जात आहे. दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा आहे.