शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 14:21 IST

इरई धरणाच्या जलसाठ्यात अपेक्षित वाढ न झाल्याने महऔष्णिक विद्युत केंद्रही आॅक्सिजनवर आहे. अशातच पावसाने दडी मारली आहे. ही परिस्थिती बघता चंद्रपूर जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट दिसत आहे.

ठळक मुद्देपावसाची दडी : २६ टक्के धान रोवण्याचा खोळंबल्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या वर्षी पावसाने दगा दिला. यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचे अंदाज वर्तविले होते. मात्र हे अंदाज चंद्रपूर जिल्ह्यात फोल ठरले. पावसाळ्याचे दोन महिने निघून गेले असून आतापर्यंत केवळ ५७ टक्केच पर्जन्यमान जिल्ह्यात झाले आहे. धानपट्टा अल्प पावसाने चिंतेत आहे. इरई धरणाच्या जलसाठ्यात अपेक्षित वाढ न झाल्याने महऔष्णिक विद्युत केंद्रही आॅक्सिजनवर आहे. अशातच पावसाने दडी मारली आहे. ही परिस्थिती बघता चंद्रपूर जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट दिसत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात कापूस, सोयाबीन आणि धान हे मुख्य पीक घेतले जातात. चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, कोरपना, जिवती, भद्रावती व वरोरा या तालुक्यांना कापूस व सोयाबीनचा पट्टा म्हणून ओळखले जाते. या भागात यंदा समाधानकारक पाऊस झाला. कोरपन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेकांच्या शेतातील पीक खरडून गेले. या पट्ट्यात ३९ टक्के कपाशी व ४० टक्के सोयाबीन अशी एकूण ७९ टक्के पेरण्या आटोपल्या आहे. विपरित परिस्थिती धान पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंडपिपरी, पोंभूर्णा, मूल, सावली, चिमूर, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड तालुक्यात आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी शेतात टाकलेले पऱहे उन्हाने करपत आहे. लागवडीसाठी धानाच्या बांद्यात पाणी साचणे आवश्यक असते. पावपाचे प्रमाण चिंताजनक असल्याने २६ टक्के धान रोवण्या खोळंबल्या आहेत. दरवर्षीचा वाईट अनुभव आणि सध्या पावसाने मारलेली दडी बघता ही पिके शेवटपर्यंत टिकतील, याबाबत शेतकरी साशंकच आहे.नागभीड तालुक्याची स्थिती चिंताजनकधानपट्ट्यातील नागभीड तालुक्यात केवळ ३१.८६ टक्के पाऊस झाला आहे. काही शेतकऱ्यांनी पऱहेच टाकले नाही. ज्यांनी पऱहे टाकले ते करपत आहे. रोवण्या पूर्णत: खोळंबल्या आहे. एकूणच या तालुक्यात भीषण दुष्काळाचे चित्र आतापासूनच दिसायला लागले आहे.महाऔष्णिक वीज केंद्र आॅक्सिजनवरचदोन महिन्याच्या पावसात इरई धरणात अपेक्षित जलसंचय झाला नाही. सद्यस्थितीत केवळ ३४ टक्केच जलसाठा धरणात आहे. या धरणाच्या पाण्यापासून महाऔष्णिक विद्युत केंद्रात वीज निर्मिती होते आणि चंद्रपूर महानगराची तहान भागविली जाते. हे धरण भरले नाही तर वरच्या भागातील चारगाव धरणातून पाणी घेतले जाते. चारगाव धरण ८९.५४ टक्के भरल्याने काहीशी समाधानकारक स्थिती म्हणता येईल.

टॅग्स :droughtदुष्काळ