शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

चंद्रपूर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 14:21 IST

इरई धरणाच्या जलसाठ्यात अपेक्षित वाढ न झाल्याने महऔष्णिक विद्युत केंद्रही आॅक्सिजनवर आहे. अशातच पावसाने दडी मारली आहे. ही परिस्थिती बघता चंद्रपूर जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट दिसत आहे.

ठळक मुद्देपावसाची दडी : २६ टक्के धान रोवण्याचा खोळंबल्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या वर्षी पावसाने दगा दिला. यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचे अंदाज वर्तविले होते. मात्र हे अंदाज चंद्रपूर जिल्ह्यात फोल ठरले. पावसाळ्याचे दोन महिने निघून गेले असून आतापर्यंत केवळ ५७ टक्केच पर्जन्यमान जिल्ह्यात झाले आहे. धानपट्टा अल्प पावसाने चिंतेत आहे. इरई धरणाच्या जलसाठ्यात अपेक्षित वाढ न झाल्याने महऔष्णिक विद्युत केंद्रही आॅक्सिजनवर आहे. अशातच पावसाने दडी मारली आहे. ही परिस्थिती बघता चंद्रपूर जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट दिसत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात कापूस, सोयाबीन आणि धान हे मुख्य पीक घेतले जातात. चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, कोरपना, जिवती, भद्रावती व वरोरा या तालुक्यांना कापूस व सोयाबीनचा पट्टा म्हणून ओळखले जाते. या भागात यंदा समाधानकारक पाऊस झाला. कोरपन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेकांच्या शेतातील पीक खरडून गेले. या पट्ट्यात ३९ टक्के कपाशी व ४० टक्के सोयाबीन अशी एकूण ७९ टक्के पेरण्या आटोपल्या आहे. विपरित परिस्थिती धान पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंडपिपरी, पोंभूर्णा, मूल, सावली, चिमूर, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड तालुक्यात आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी शेतात टाकलेले पऱहे उन्हाने करपत आहे. लागवडीसाठी धानाच्या बांद्यात पाणी साचणे आवश्यक असते. पावपाचे प्रमाण चिंताजनक असल्याने २६ टक्के धान रोवण्या खोळंबल्या आहेत. दरवर्षीचा वाईट अनुभव आणि सध्या पावसाने मारलेली दडी बघता ही पिके शेवटपर्यंत टिकतील, याबाबत शेतकरी साशंकच आहे.नागभीड तालुक्याची स्थिती चिंताजनकधानपट्ट्यातील नागभीड तालुक्यात केवळ ३१.८६ टक्के पाऊस झाला आहे. काही शेतकऱ्यांनी पऱहेच टाकले नाही. ज्यांनी पऱहे टाकले ते करपत आहे. रोवण्या पूर्णत: खोळंबल्या आहे. एकूणच या तालुक्यात भीषण दुष्काळाचे चित्र आतापासूनच दिसायला लागले आहे.महाऔष्णिक वीज केंद्र आॅक्सिजनवरचदोन महिन्याच्या पावसात इरई धरणात अपेक्षित जलसंचय झाला नाही. सद्यस्थितीत केवळ ३४ टक्केच जलसाठा धरणात आहे. या धरणाच्या पाण्यापासून महाऔष्णिक विद्युत केंद्रात वीज निर्मिती होते आणि चंद्रपूर महानगराची तहान भागविली जाते. हे धरण भरले नाही तर वरच्या भागातील चारगाव धरणातून पाणी घेतले जाते. चारगाव धरण ८९.५४ टक्के भरल्याने काहीशी समाधानकारक स्थिती म्हणता येईल.

टॅग्स :droughtदुष्काळ