शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मूल नगर परिषदेतील मालमत्ता विभागात सावळा गोंधळ

By admin | Updated: November 1, 2015 01:09 IST

स्थानिक नगर परिषदेमधील मालमत्ता विभागात कार्यरत विभाग प्रमुख बोस यांच्या दुर्लक्षितपणामुळे सावळा गोंधळ सुरू असून ...

विभाग प्रमुखाचा दुर्लक्षितपणा : फेरफार नोंदीची प्रकरणे धूळ खातमूल : स्थानिक नगर परिषदेमधील मालमत्ता विभागात कार्यरत विभाग प्रमुख बोस यांच्या दुर्लक्षितपणामुळे सावळा गोंधळ सुरू असून गृहकर भरण्यास आलेल्या नागरिकांना ताटकळत तासन्तास वाट बघावी लागते. तसेच गेल्या सहा महिन्यांपासून फेरफार नोंदीचे प्रकरण धूळखात असून नागरिकांनी सर्व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतरही फेरफार केला जात नसल्याची बाब उघडकीस आली आहे. याकडे न.प. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.नगर परिषदेत उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत मालमत्ता विभाग आहे. मात्र मालमत्ता विभागात कार्यरत असलेले विभाग प्रमुख बोस हे चंद्रपूरवरुन ये-जा करीत असल्याने वेळेवर कार्यालयात केव्हाच उपलब्ध राहात नाहीत. संपूर्ण यंत्रणेवर लक्ष ठेवणे, त्यातील नियोजन करणे, ही विभाग प्रमुखांची जबाबदारी असताना मात्र त्याकडे त्यांचे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. गृहकर भरण्यास आलेल्या नागरिकांना ताटकळत वाट बघावी लागत असेल तर नगर परिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी मालमत्ता विभाग संवेदनशिल नसल्याचे यावरुन दिसून येते. मालमत्ता विभागातील कर्मचारी जनगणनेच्या कामात असले तरी कार्यालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी असताना गृहकराची पावती कापण्यासाठी एका कर्मचाऱ्याला तरी कार्यालयात बसवून जबाबदारी देणे गरजेचे होते. मात्र विभाग प्रमुखाच्या दुर्लक्षितपणामुळे मालमत्ता विभागातील प्रशासन ढासळल्याची बाब समोर आली आहे.नगर परिषदेच्या क्षेत्रात प्लॉटची विक्री केल्यानंतर रितसर नोंदीसाठी नगरपरिषदेकडे आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर केल्या जातो. त्याची वर्तमान पत्रात रितसर जाहीरात दिली जाते. ही प्रक्रिया झाल्यानंतर लगेच त्याची फेरफार नोंद करणे आवश्यक असताना नागरिकांना हेलपाट्या माराव्या लागत आहे. तब्बल सहा महिन्यानंतरही फेरफार नोंद करण्यात आली नसल्याने नागरिकांचा नगर परिषदेच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. कुणाला बांधकामासाठी परवानगी घ्यायची असल्याने फेरफार नोंदीची आवश्यकता असते. मात्र यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे. ‘चिरीमिरी’ घेण्यासाठीच हा प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नोंदी नसल्याने बांधकाम परवानगीसाठी अर्ज सादर करता येत नाही. ज्यांना कुणाला बांधकाम करायचे आहे, त्यांनी बांधकाम करण्यास सुरुवात केली तर अवैध बांधकामाबाबत नोटीस बजावण्यात येते. एकीकडे फेरफार नोंद घ्यायची नाही दुसरीकडे बांधकाम सुरू केल्यास नोटीस द्यायची ही बाब न संताप आणणारी आहे. ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी स्थिती झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)नागरिकांची होत आहे गोची मूल नगर पालिकेत मोठ्या प्रमाणावर अनागोंदी सुरू आहे. त्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने नागरिकांची चांगलीच गोची होत आहे. विभाग प्रमुख आपल्या कर्तव्यापासून दूर जात असल्याने त्याच्या अख्त्यारित काम करणारे कर्मचारी अनियंत्रित झाले आहेत. अच्छे दिन आणून म्हणणाऱ्या भाजपाचीच या नगरपालिकेवर सत्ता आहे. मात्र सत्ताधारीही याकडे कानाडोळा करताना दिसतात. भाजपाप्रणित नगर परिषद प्रशासनातील पारदर्शकता आणण्यास सत्तारुढ पदाधिकारी व नगरसेवक प्रयत्न करणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे.