शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सेवाग्राम-मुंबई ट्रेन कायमस्वरुपी बंद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 05:00 IST

चंद्रपूर तसेच शेजारील जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जाणे सोयीचे व्हावे, यासाठी नागपूर - सेवाग्राम एक्सप्रेसला बल्लारशाह - भुसावळ या पॅसेंजरचे सहा डब्बे जोडले जात होते. चंद्रपूर येथे बसले की, थेट मुंबईत पोहोचत होते. त्यामुळे ज्येष्ठांपासून नोकरदार व विद्यार्थ्यांनाही ही ट्रेन सोयीची होती. कोरोना संकट आले आणि बल्लारशाह - भुसावळ ही पॅसेंजर बंद झाली. परिणामी बल्लारपूर येथून थेट मुंबईत जाणेही प्रवाशांचे बंद झाले. आता विशेष ट्रेन सुरु आहेत. मात्र, प्रवाशांना त्रासदायक झाले आहे.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ येथील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी बल्लारशाह - मुंबई सेवाग्राम ही हक्काची ट्रेन होती. मात्र, कोरोना संकटापासून बंद असलेली ही ट्रेन अद्याप बंदच आहे. आता तर एलएचबी प्रणालीमुळे ती कायमस्वरुपी बंद होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे येथील प्रवाशांची मोठी अडचण होणार आहे. विशेष म्हणजे  प्रवाशांना वर्धा, नागपूर येथून ट्रेन पकडून मुंबईला जावे लागत आहे.चंद्रपूर तसेच शेजारील जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जाणे सोयीचे व्हावे, यासाठी नागपूर - सेवाग्राम एक्सप्रेसला बल्लारशाह - भुसावळ या पॅसेंजरचे सहा डब्बे जोडले जात होते. चंद्रपूर येथे बसले की, थेट मुंबईत पोहोचत होते. त्यामुळे ज्येष्ठांपासून नोकरदार व विद्यार्थ्यांनाही ही ट्रेन सोयीची होती. कोरोना संकट आले आणि बल्लारशाह - भुसावळ ही पॅसेंजर बंद झाली. परिणामी बल्लारपूर येथून थेट मुंबईत जाणेही प्रवाशांचे बंद झाले. आता विशेष ट्रेन सुरु आहेत. मात्र, प्रवाशांना त्रासदायक झाले आहे.

 अप-डाऊनही झाले बंदबहुतांश कर्मचारी वर्धा, हिंगणघाट, वरोरा तसेच इतरही ठिकाणांहून याच ट्रेनने चंद्रपूर तसेच चंद्रपूर येथील कर्मचारी अन्य ठिकाणी अप-डाऊन करून नोकरी करायचे. मात्र, हक्काची ट्रेन बंद असल्याने या सर्वांची मोठी अडचण झाली आहे. अनेकांना कुटुंबीयांना सोडून मुख्यालयीच राहावे लागत आहे.

लहान व्यावसायिकांचेही नुकसानसेवाग्राम ट्रेन दररोज होती. त्यामुळे यामध्ये प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असायची. याचा फायदा घेत चंद्रपूर - बल्लारशाह तसेच इतरही ठिकाणचे लहान व्यावसायिक ट्रेनमध्ये खाण्या-पिण्यासह अन्य साहित्य विकायचे. मात्र, ट्रेनच नसल्याने अनेकांचा व्यवसाय बंद झाला आहे. विशेषत: वरोरा परिसरातून अनेक जण सिझनमध्ये शिंगाडे आणून विकायचे. मात्र, आता ते विकणेही बंद झाले आहे.

कॅन्सर रुग्णांचे बेहाल चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यातील कॅन्सरग्रस्त रुग्ण मोठ्या प्रमाणात मुंबईतील टाटा तसेच इतर रुग्णालयात उपचारासाठी जातात. मात्र, सोयीची असलेली सेवाग्राम ट्रेन मागील अनेक दिवसांपासून बंद असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांना वर्धा येथून ट्रेन पकडून मुंबईला जावे लागते.

थेट ट्रेनशिवाय पर्याय नाहीचंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी आता थेट ट्रेन सुरु करावी लागणार आहे.  मात्र, एलएचबी प्रणालीमुळे ती सुरु होणे सध्या तरी कठीण आहे. त्यामुळे प्रवाशांना वर्धा, नागपूर येथूनच पुढील प्रवास करावा लागणार आहे.

रेल्वे अधिकारीही गप्पसर्वांच्या सोयीची असलेली सेवाग्राम ट्रेन बंद आहे. यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे. असे असले तरी रेल्वे विभागातील अधिकारी गप्प आहेत. विशेष म्हणजे, सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांनी अनेकवेळा निवेदन दिली आहे. मात्र, अद्याप काहीच हालचाली झाल्या नाहीत.

सेवाग्राम एक्स्प्रेस बंद आहे. त्यामुळे चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईत जाणे कठीण झाले झाले. वर्धा किंवा नागपूर येथे विशेष ट्रेन पकडावी लागत आहे. विशेषत: कॅन्सरग्रस्त रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आठवडाभर नाही तर किमान  दोन दिवस तरी मुंबईसाठी ट्रेन चालवावी. यासंदर्भात रेल्वे प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे अनेकवेळा निवेदने दिली आहेत. - श्रीनिवास सुंचूवार,झेडआरयुसी सदस्य, मध्यरेल्वे

 

टॅग्स :railwayरेल्वे