शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

सेवाग्राम-मुंबई ट्रेन कायमस्वरुपी बंद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 05:00 IST

चंद्रपूर तसेच शेजारील जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जाणे सोयीचे व्हावे, यासाठी नागपूर - सेवाग्राम एक्सप्रेसला बल्लारशाह - भुसावळ या पॅसेंजरचे सहा डब्बे जोडले जात होते. चंद्रपूर येथे बसले की, थेट मुंबईत पोहोचत होते. त्यामुळे ज्येष्ठांपासून नोकरदार व विद्यार्थ्यांनाही ही ट्रेन सोयीची होती. कोरोना संकट आले आणि बल्लारशाह - भुसावळ ही पॅसेंजर बंद झाली. परिणामी बल्लारपूर येथून थेट मुंबईत जाणेही प्रवाशांचे बंद झाले. आता विशेष ट्रेन सुरु आहेत. मात्र, प्रवाशांना त्रासदायक झाले आहे.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ येथील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी बल्लारशाह - मुंबई सेवाग्राम ही हक्काची ट्रेन होती. मात्र, कोरोना संकटापासून बंद असलेली ही ट्रेन अद्याप बंदच आहे. आता तर एलएचबी प्रणालीमुळे ती कायमस्वरुपी बंद होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे येथील प्रवाशांची मोठी अडचण होणार आहे. विशेष म्हणजे  प्रवाशांना वर्धा, नागपूर येथून ट्रेन पकडून मुंबईला जावे लागत आहे.चंद्रपूर तसेच शेजारील जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जाणे सोयीचे व्हावे, यासाठी नागपूर - सेवाग्राम एक्सप्रेसला बल्लारशाह - भुसावळ या पॅसेंजरचे सहा डब्बे जोडले जात होते. चंद्रपूर येथे बसले की, थेट मुंबईत पोहोचत होते. त्यामुळे ज्येष्ठांपासून नोकरदार व विद्यार्थ्यांनाही ही ट्रेन सोयीची होती. कोरोना संकट आले आणि बल्लारशाह - भुसावळ ही पॅसेंजर बंद झाली. परिणामी बल्लारपूर येथून थेट मुंबईत जाणेही प्रवाशांचे बंद झाले. आता विशेष ट्रेन सुरु आहेत. मात्र, प्रवाशांना त्रासदायक झाले आहे.

 अप-डाऊनही झाले बंदबहुतांश कर्मचारी वर्धा, हिंगणघाट, वरोरा तसेच इतरही ठिकाणांहून याच ट्रेनने चंद्रपूर तसेच चंद्रपूर येथील कर्मचारी अन्य ठिकाणी अप-डाऊन करून नोकरी करायचे. मात्र, हक्काची ट्रेन बंद असल्याने या सर्वांची मोठी अडचण झाली आहे. अनेकांना कुटुंबीयांना सोडून मुख्यालयीच राहावे लागत आहे.

लहान व्यावसायिकांचेही नुकसानसेवाग्राम ट्रेन दररोज होती. त्यामुळे यामध्ये प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असायची. याचा फायदा घेत चंद्रपूर - बल्लारशाह तसेच इतरही ठिकाणचे लहान व्यावसायिक ट्रेनमध्ये खाण्या-पिण्यासह अन्य साहित्य विकायचे. मात्र, ट्रेनच नसल्याने अनेकांचा व्यवसाय बंद झाला आहे. विशेषत: वरोरा परिसरातून अनेक जण सिझनमध्ये शिंगाडे आणून विकायचे. मात्र, आता ते विकणेही बंद झाले आहे.

कॅन्सर रुग्णांचे बेहाल चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यातील कॅन्सरग्रस्त रुग्ण मोठ्या प्रमाणात मुंबईतील टाटा तसेच इतर रुग्णालयात उपचारासाठी जातात. मात्र, सोयीची असलेली सेवाग्राम ट्रेन मागील अनेक दिवसांपासून बंद असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांना वर्धा येथून ट्रेन पकडून मुंबईला जावे लागते.

थेट ट्रेनशिवाय पर्याय नाहीचंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी आता थेट ट्रेन सुरु करावी लागणार आहे.  मात्र, एलएचबी प्रणालीमुळे ती सुरु होणे सध्या तरी कठीण आहे. त्यामुळे प्रवाशांना वर्धा, नागपूर येथूनच पुढील प्रवास करावा लागणार आहे.

रेल्वे अधिकारीही गप्पसर्वांच्या सोयीची असलेली सेवाग्राम ट्रेन बंद आहे. यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे. असे असले तरी रेल्वे विभागातील अधिकारी गप्प आहेत. विशेष म्हणजे, सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांनी अनेकवेळा निवेदन दिली आहे. मात्र, अद्याप काहीच हालचाली झाल्या नाहीत.

सेवाग्राम एक्स्प्रेस बंद आहे. त्यामुळे चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईत जाणे कठीण झाले झाले. वर्धा किंवा नागपूर येथे विशेष ट्रेन पकडावी लागत आहे. विशेषत: कॅन्सरग्रस्त रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आठवडाभर नाही तर किमान  दोन दिवस तरी मुंबईसाठी ट्रेन चालवावी. यासंदर्भात रेल्वे प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे अनेकवेळा निवेदने दिली आहेत. - श्रीनिवास सुंचूवार,झेडआरयुसी सदस्य, मध्यरेल्वे

 

टॅग्स :railwayरेल्वे