शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

भेजगाव येथे विद्युत उपकेंद्र उभारण्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:23 IST

मूल : तालुक्यातील भेजगाव परिसरात चिचाळावरून विद्युत पुरवठा केला जातो. या परिसरात जवळपास २० गावे असून मूलशिवाय कोठेही ...

मूल : तालुक्यातील भेजगाव परिसरात चिचाळावरून विद्युत पुरवठा केला जातो. या परिसरात जवळपास २० गावे असून मूलशिवाय कोठेही विद्युत केंद्र नाही. विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे भेजगाव या केंद्रस्थानी असलेल्या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीने ३३ के.व्ही. विद्युत उपकेंद्र उभारावे, अशी मागणी परिसरातील जनतेने केली आहे.

ग्रामीण भागात आजच्या घडीला विद्युत पुरवठा आवश्यक बाब ठरली आहे.

हिवाळ्याचे दिवस असले तरी विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने जनता त्रस्त झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर हा लपंडाव अधिकच वाढतो. तसेच वीज वितरण कंपनीच्या धोरणामुळे कधी कमी-अधिक दाबाचा वीजपुरवठा होतो. परिणामी घरगुती उपकरणे, कृषिपंप निकामी ठरत असल्याची बोंब ग्रामस्थांमध्ये आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे ग्रामीण नागरिकांना रोजगाराचे साधन मिळाले. छोट्या-मोठ्या उद्योगांतून नागरिक उदरनिर्वाह करीत आहेत. त्यामध्ये पीठगिरणी, राईस मिल, मेडिकल यांसारख्या उद्योगांत विजेचा वापर होतो. त्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. मात्र विजेचा लपंडाव व कमी दाबाचा वीजपुरवठा याचा फटका या छोट्या उद्योगांना बसत आहे.

विजेचा वाढता लपंडाव व कमी दाबाचा विद्युत पुरवठा, यामुळे परिसरातील नागरिक चांगलेच वैतागले आहेत. या समस्येतून सुटका व्हावी म्हणून भेजगाव येथे विद्युत वितरण कंपनीने ३३ के.व्ही. विद्युत उपकेंद्र उभारावे, अशी मागणी परिसरातील जनतेने केली आहे.