शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

गंभीर! पाणी नसल्याने 'येथे' होत नाहीत तरुणांची लग्नं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 18:21 IST

Chandrapur News चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपिंपरी तालुक्यातील हेटी नांदगावात कुणी वधूपिता आपली मुलगी द्यायला तयार होत नाही. यामागे तिथे पाण्याचा दुष्काळ असणे हे एक प्रमख कारण सांगितले जाते.

ठळक मुद्दे नळ बंद, विहिरीतील पाणी अयोग्य

चंद्रपूर : गोंडपिंपरी तालुक्यातील हेटी नांदगावपर्यंत आलेली जलवाहिनी फुटलेली आहे. अनेक भागांमध्ये नळच येत नाहीत. विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नाही. नाल्यात खड्डा करून ग्रामस्थांना तहान भागवावी लागते. महिलांचा संपूर्ण दिवस पाणी गोळा करण्यात जातोय. त्यामुळे कोणीही इथल्या तरुणांना मुलगी द्यायला तयार नाही. याबाबत वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून पुन्हा कानाडोळा केला जातो, असा आरोप शिवसेना पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक व विभागीय प्रवक्ता प्रा. शिल्पा बोडखे यांनी एका प्रसिद्धपत्रकातून केला आहे.

गावात नळ नाही. टाकीत जाणाऱ्या पाण्याची पाईपलाईन ठिकठिकाणी फुटली असल्यामुळे शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा जरी पुरवठा केला, तरी नळाला गढूळच पाणी येते. त्यामुळे गावातील लोकांना फिल्टर तसेच पाणी शुद्धीकरण मशीन बसवून जर पाणी शुद्ध करून दिले असते, तर लोकांना स्वच्छ पाणी प्यायला मिळू शकते. पाण्याची समस्या सुटू शकते. पाणीटंचाईसोबतच या गावामध्ये सध्या अनेक सामाजिक प्रश्नसुद्धा निर्माण झालेले आहेत. पाणीच नसल्यामुळे या गावातल्या मुलांची लग्नं सध्या जुळत नाहीत. याचा पाठपुरावा सातत्याने इथले गावकरी करतात. मात्र पाठपुरावा करूनसुद्धा प्रशासनाकडून कोणत्याहीप्रकारचा दिलासा या गावकऱ्यांना मिळू शकला नाही. अशा परिस्थितीत तेथील महिलांना पाणी गोळा करावे लागते. त्यामुळे प्रशासनाने येथील गावकऱ्यांच्या समस्यांची दखल घेत हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी शिवसेना पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक व विभागीय प्रवक्ता प्रा. शिल्पा बोडखे यांनी केली आहे.

गोंडपिंपरी तालुक्यातील हेटी नांदगाव गावातील पाण्याचा प्रश्न बिकट झालेला आहे. येथील महिलांना दिवसभर पाण्यासाठी वेळ द्यावा लागत आहे. महिलांची ही अवस्था पाहून येथील तरुणांना लग्नासाठी मुली द्यायला कोणीही तयार होत नाही. म्हणूनच येथील पाणी प्रश्न तत्काळ सोडविण्याची गरज आहे.

- प्रा. शिल्पा बोडखे, पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक व विभागीय प्रवक्ता, शिवसेना

टॅग्स :water shortageपाणीकपात