शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

निवड समिती विश्वासार्ह नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:43 IST

काँग्रेसच्या जडणघडणीत पक्षाने अनेकदा चढउतार अनुभवले. कॉंग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष चालतो. मात्र आजघडीला निष्ठावंतांना डावलून पक्ष कारभार चालविला जात आहे. हा त्यांच्यावर अन्याय आहे. स्वत:ची विधानसभा निवडणुकीत उमेदवारी हाकणारेच इच्छुकांची मुलाखती घेण्याचा फार्स करीत आहेत.

ठळक मुद्देनरेश पुगलिया यांचा आरोप : समर्थक उमेदवारांनी मुलाखतीकडे फिरवली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : काँग्रेसच्या जडणघडणीत पक्षाने अनेकदा चढउतार अनुभवले. कॉंग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष चालतो. मात्र आजघडीला निष्ठावंतांना डावलून पक्ष कारभार चालविला जात आहे. हा त्यांच्यावर अन्याय आहे. स्वत:ची विधानसभा निवडणुकीत उमेदवारी हाकणारेच इच्छुकांची मुलाखती घेण्याचा फार्स करीत आहेत. काँग्रेसची विधानसभा इच्छुक उमेदवाराची निवड समिती विश्वासहार्य नसल्याचा आरोप माजी खासदार व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सोमवारी केला.प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार येथील इंटक भवन, बायपास रोड येथील कार्यालयात आज चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, चिमूर, वरोरा व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम आयोजित केला. या पार्श्वभूमीवर माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या समर्थक उमेदवारांनी याकडे पाठ फिरवून निष्ठावान कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा राजीव गांधी सभागृहात घेतला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.नरेश पुगलिया म्हणाले, सर्वसामान्य कार्यकर्ता कॉंग्रेसची उर्जा आहे. त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देताना निष्ठावंताना न्याय मिळाला पाहिजे. जिल्हा निवड समितीत असणारे ९० टक्के सदस्य स्वत:च्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असून त्यावर इतरांनी विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे महासचिव मल्लीकार्जुन खरगे यांच्याकडे शिष्टमंडळाने भेट देवून बाजू मांडणार असल्याचे पुगलिया म्हणाले.यावेळी कॉंग्रेसचे नेते गजानन गावंडे, युवा नेते राहुल पुगलिया, मनपाचे गटनेता डॉ. सुरेश महाकूलकर, जि.प. सदस्य गोदरू जुमनाके, शिवचंद काळे, अ‍ॅड. अविनाश ठावरी, देवेंद्र बेले, अविनाश जाधव, प्रविण पडवेकर, सुभाष माथनकर, अशोक नागापुरे, प्रशांत दानव, माजी जि. प. सदस्य रामभाऊ टोंगे, वसंत मांढरे, चंद्रशेखर पोडे, चेतन गेडाम, करण पुगलिया यांच्यासह कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.इंटकचा जिल्हा निवड समितीवर आक्षेपआगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडियन नॅशनल टेंÑड युनियन कॉंग्रेसने जिल्हा निवड समितीवर आक्षेप घेवून मुलाखतीचा फार्स असल्याचे पत्र परिषदेतून सांगिंतले. कॉंग्रेस पक्षाने राज्यात कॉंग्रेसला बलवान करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने प्रदेशाध्यक्ष यांच्यासह विभागीय समतोल साधण्यासाठी पाच कार्याध्यक्षांची नियुक्ती केली. मात्र जिल्हास्तरावरील निवड समिती केवळ देखावा असल्याचा आरोप यावेळी कामगार नेते चंद्रशेखर पोडे, वसंत मांढरे, रामभाउ टोंगे, रामदास वाग्दरकर, मानवटकर, शोभा महतो, छबु मेश्राम, सुमन गौरकार यांनी आयोजित पत्रपरिषदेतून केला. धनशक्तीला वगळून जनशक्ती असणाऱ्यांना उमेदवारी देण्याचा आग्रह यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेसNaresh Pugliaनरेश पुगलिया