शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रेशीम शेतीला विदर्भात वाव; मात्र शेतकऱ्यासह कृषी विभाग उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 14:40 IST

विदर्भात रेशीम शेतीला भरपूर वाव आहे, असे कृषीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र अनेक शेतकरी या शेतीपासून अनभिज्ञ आहेत. या शेतीविषयी माहिती देण्यात कृषी विभागही अपयशी ठरत आहे.

ठळक मुद्देजनजागृतीचा अभाव मार्गदर्शन करण्यात कृषी विभाग अपयशी

प्रवीण खिरटकर

लोकमत न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर: विदर्भात रेशीम शेतीला भरपूर वाव आहे, असे कृषीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र अनेक शेतकरी या शेतीपासून अनभिज्ञ आहेत. या शेतीविषयी माहिती देण्यात कृषी विभागही अपयशी ठरत आहे. जिल्ह्याचे ठिकाण गाठून रेशीम संचालनालय कार्यालयात गेल्यावरच शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन मिळते. त्यामुळे तयारी असूनही शेतकरी रेशीम शेतीबाबत उदासीनता बाळगून आहे.शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन या पारंपारिक शेतीसोबतच शेतीमध्ये जोडधंदे करावे. यासोबतच रेशीम शेती केल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल. रेशीम शेतीकरिता विदर्भातील वातावरण योग्य असल्याचे मत कृषी तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. रेशीमला वस्त्रउद्योगात मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने शेतकऱ्यांना भावही अधिक मिळण्याची शक्यता आहे. तरीही विदर्भात रेशीम शेती नगण्य असल्याचे दिसून येते. रेशीम शेती करण्याकरिता जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रेशीम संचालनालय कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. तालुकास्तरावर शेतकऱ्यांना रेशीम शेतीविषयी माहिती मिळण्यात अडचणी येत असल्याने शेतकरी रेशीम शेतीच्या माहितीपासून अनभिज्ञ राहत आहेत. प्रारंभी कुठलेही पीक नव्याने शेतात घेत असताना शेतकऱ्यांना वारंवार मार्गदर्शनाची आवश्यकता असते. जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय असल्याने आपल्याला वेळोवेळी रेशीम शेती करताना मार्गदर्शन मिळेल काय, अशी शंका शेतकऱ्यांना आहे.तालुका स्तरावर कार्यालय नाही. रेशीम संचालन कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. रेशीम शेती सदर कार्यालयाशी संलग्न आहे. अशा प्रकारचे कार्यालय तालुका स्तरावर शासनाने सुरू केल्यास त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होऊन शेतकरी रेशीम शेतीकडे वळू शकतो.तालुका कृषी विभागाकडून प्रस्तावरेशीम शेती करावयाची असल्यास प्रस्ताव जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रेशीम संचालनालयाकडे द्यावा लागतो. जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे त्रासदायक ठरत असल्याने तालुका कृषी विभागाकडे रेशीम शेतीचा प्रस्ताव दिल्यास तो रेशीम संचालनयाकडे कृषी विभागाने पाठविणे सुरू केले आहे.कृषी विभागास रेशीम संचालनालय जोडावेबहुतांश शेतीविषयी योजना तालुका कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर रेशीम संचालनालय हे कृषी कार्यालयाशी जोडल्यास रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी उपलब्धी होईल व तालुका स्तरावरील कृषी कार्यालयात जावून वेळोवेळी मार्गदर्शन घेणे रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सोयीचे ठरणार आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती