शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

रेशीम शेतीला विदर्भात वाव; मात्र शेतकऱ्यासह कृषी विभाग उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 14:40 IST

विदर्भात रेशीम शेतीला भरपूर वाव आहे, असे कृषीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र अनेक शेतकरी या शेतीपासून अनभिज्ञ आहेत. या शेतीविषयी माहिती देण्यात कृषी विभागही अपयशी ठरत आहे.

ठळक मुद्देजनजागृतीचा अभाव मार्गदर्शन करण्यात कृषी विभाग अपयशी

प्रवीण खिरटकर

लोकमत न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर: विदर्भात रेशीम शेतीला भरपूर वाव आहे, असे कृषीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र अनेक शेतकरी या शेतीपासून अनभिज्ञ आहेत. या शेतीविषयी माहिती देण्यात कृषी विभागही अपयशी ठरत आहे. जिल्ह्याचे ठिकाण गाठून रेशीम संचालनालय कार्यालयात गेल्यावरच शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन मिळते. त्यामुळे तयारी असूनही शेतकरी रेशीम शेतीबाबत उदासीनता बाळगून आहे.शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन या पारंपारिक शेतीसोबतच शेतीमध्ये जोडधंदे करावे. यासोबतच रेशीम शेती केल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल. रेशीम शेतीकरिता विदर्भातील वातावरण योग्य असल्याचे मत कृषी तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. रेशीमला वस्त्रउद्योगात मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने शेतकऱ्यांना भावही अधिक मिळण्याची शक्यता आहे. तरीही विदर्भात रेशीम शेती नगण्य असल्याचे दिसून येते. रेशीम शेती करण्याकरिता जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रेशीम संचालनालय कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. तालुकास्तरावर शेतकऱ्यांना रेशीम शेतीविषयी माहिती मिळण्यात अडचणी येत असल्याने शेतकरी रेशीम शेतीच्या माहितीपासून अनभिज्ञ राहत आहेत. प्रारंभी कुठलेही पीक नव्याने शेतात घेत असताना शेतकऱ्यांना वारंवार मार्गदर्शनाची आवश्यकता असते. जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय असल्याने आपल्याला वेळोवेळी रेशीम शेती करताना मार्गदर्शन मिळेल काय, अशी शंका शेतकऱ्यांना आहे.तालुका स्तरावर कार्यालय नाही. रेशीम संचालन कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. रेशीम शेती सदर कार्यालयाशी संलग्न आहे. अशा प्रकारचे कार्यालय तालुका स्तरावर शासनाने सुरू केल्यास त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होऊन शेतकरी रेशीम शेतीकडे वळू शकतो.तालुका कृषी विभागाकडून प्रस्तावरेशीम शेती करावयाची असल्यास प्रस्ताव जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रेशीम संचालनालयाकडे द्यावा लागतो. जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे त्रासदायक ठरत असल्याने तालुका कृषी विभागाकडे रेशीम शेतीचा प्रस्ताव दिल्यास तो रेशीम संचालनयाकडे कृषी विभागाने पाठविणे सुरू केले आहे.कृषी विभागास रेशीम संचालनालय जोडावेबहुतांश शेतीविषयी योजना तालुका कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर रेशीम संचालनालय हे कृषी कार्यालयाशी जोडल्यास रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी उपलब्धी होईल व तालुका स्तरावरील कृषी कार्यालयात जावून वेळोवेळी मार्गदर्शन घेणे रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सोयीचे ठरणार आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती