शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

‘महाडीबीटी’ने अडकली विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 05:00 IST

प्रथम शासनाच्या महाडीबीटी पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईलवर मॅसेजव्दारे युजर आयडी व पासवर्ड प्राप्त होतो. त्यानंतर शिष्यवृत्तीचे फॉर्म दिलेल्या रकान्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन माहिती भरावी लागते. ही प्रक्रिया पूर्ण होताच महाविद्यालयाचे प्राचार्य व क्लर्क लॉगिन केली जाते. त्यानंतरच समाजकल्याण अधिकारी व आदिवासी विकास विभागाकडे अर्ज सादर होतो. ही प्रक्रिया अत्यंत क्लिष्ठ आहे.

ठळक मुद्देशिक्षण संस्थाही अडचणीत : किचकट प्रक्रियेने वाढविली डोकेदुखी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आर्थिक दुर्बल घटक, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना यापूर्वी व्यावसायिक प्रशिक्षणाकरिता महाई-स्कॉलरशिप यंत्रणेद्वारे शिष्यवृत्ती दिली जात होती. मात्र, २०१८-१९ या शैक्षणिक सत्रापासून ही पद्धत बंद करून नवीन महाडीबीटी पोर्टल पद्धत सुरू केली. मात्र, या किचकट पद्धतीमुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यास अडचणी येत आहेत. शिवाय, शिष्यवृत्ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिक्षण संस्थांची डोकेदुखी वाढली. त्यामुळे महाडीबीटी पोर्टल प्रक्रियेबाबत विद्यार्थी, पालक व शिक्षण संस्था चालकांनीकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.प्रथम शासनाच्या महाडीबीटी पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईलवर मॅसेजव्दारे युजर आयडी व पासवर्ड प्राप्त होतो. त्यानंतर शिष्यवृत्तीचे फॉर्म दिलेल्या रकान्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन माहिती भरावी लागते. ही प्रक्रिया पूर्ण होताच महाविद्यालयाचे प्राचार्य व क्लर्क लॉगिन केली जाते. त्यानंतरच समाजकल्याण अधिकारी व आदिवासी विकास विभागाकडे अर्ज सादर होतो. ही प्रक्रिया अत्यंत क्लिष्ठ आहे. शिष्यवृत्ती अर्ज महाडीबीटी पोर्टल माध्यमातून आॅनलाईन मिळत नाही. यासाठी प्रदिर्घ कालावधी लागतो. १० ते २० विद्यार्थी अशा टप्प्याने शिष्यवृत्तीचे वाटप करावे लागते. सर्व विद्यार्थ्यांना एकाचवेळी शिष्यवृत्ती मिळत नाही. त्यामुळे वर्षभर त्रास सहन करावा लागतो.जुन्या पध्दतीनुसार समाजकल्याण विभाग व आदिवासी विभागामधून अर्ज मंजूर झाल्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थी व महाविद्यालयाला मिळत होती‘महाडीबीटी’ तील दोषशिष्यवृत्तीची रक्कम महाविद्यालयाला प्राप्त झाल्यानंतर ती नेमक्या कोणत्या विद्यार्थ्यांची आहे, हे या यंत्रणेतून कळत नाही. विशेष म्हणजे समाजकल्याण आणि आदिवासी विभागालाही शिष्यवृत्तीची शोधाशोध करावी लागते.विद्यार्थ्यांमध्ये संतापविद्यार्थ्यांना २०१८-१९ व २०१९-२० या शैक्षणिक सत्रातील शिष्यवृत्ती अद्याप मिळाली नाही. त्यामुळे विद्यार्थी शिक्षण संस्थेकडे तर संस्थाचालक समाज कल्याण व आदिवासी विभागाकडे वारंवार विचारणा करीत आहेत.