शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

‘महाडीबीटी’ने अडकली विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 05:00 IST

प्रथम शासनाच्या महाडीबीटी पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईलवर मॅसेजव्दारे युजर आयडी व पासवर्ड प्राप्त होतो. त्यानंतर शिष्यवृत्तीचे फॉर्म दिलेल्या रकान्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन माहिती भरावी लागते. ही प्रक्रिया पूर्ण होताच महाविद्यालयाचे प्राचार्य व क्लर्क लॉगिन केली जाते. त्यानंतरच समाजकल्याण अधिकारी व आदिवासी विकास विभागाकडे अर्ज सादर होतो. ही प्रक्रिया अत्यंत क्लिष्ठ आहे.

ठळक मुद्देशिक्षण संस्थाही अडचणीत : किचकट प्रक्रियेने वाढविली डोकेदुखी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आर्थिक दुर्बल घटक, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना यापूर्वी व्यावसायिक प्रशिक्षणाकरिता महाई-स्कॉलरशिप यंत्रणेद्वारे शिष्यवृत्ती दिली जात होती. मात्र, २०१८-१९ या शैक्षणिक सत्रापासून ही पद्धत बंद करून नवीन महाडीबीटी पोर्टल पद्धत सुरू केली. मात्र, या किचकट पद्धतीमुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यास अडचणी येत आहेत. शिवाय, शिष्यवृत्ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिक्षण संस्थांची डोकेदुखी वाढली. त्यामुळे महाडीबीटी पोर्टल प्रक्रियेबाबत विद्यार्थी, पालक व शिक्षण संस्था चालकांनीकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.प्रथम शासनाच्या महाडीबीटी पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईलवर मॅसेजव्दारे युजर आयडी व पासवर्ड प्राप्त होतो. त्यानंतर शिष्यवृत्तीचे फॉर्म दिलेल्या रकान्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन माहिती भरावी लागते. ही प्रक्रिया पूर्ण होताच महाविद्यालयाचे प्राचार्य व क्लर्क लॉगिन केली जाते. त्यानंतरच समाजकल्याण अधिकारी व आदिवासी विकास विभागाकडे अर्ज सादर होतो. ही प्रक्रिया अत्यंत क्लिष्ठ आहे. शिष्यवृत्ती अर्ज महाडीबीटी पोर्टल माध्यमातून आॅनलाईन मिळत नाही. यासाठी प्रदिर्घ कालावधी लागतो. १० ते २० विद्यार्थी अशा टप्प्याने शिष्यवृत्तीचे वाटप करावे लागते. सर्व विद्यार्थ्यांना एकाचवेळी शिष्यवृत्ती मिळत नाही. त्यामुळे वर्षभर त्रास सहन करावा लागतो.जुन्या पध्दतीनुसार समाजकल्याण विभाग व आदिवासी विभागामधून अर्ज मंजूर झाल्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थी व महाविद्यालयाला मिळत होती‘महाडीबीटी’ तील दोषशिष्यवृत्तीची रक्कम महाविद्यालयाला प्राप्त झाल्यानंतर ती नेमक्या कोणत्या विद्यार्थ्यांची आहे, हे या यंत्रणेतून कळत नाही. विशेष म्हणजे समाजकल्याण आणि आदिवासी विभागालाही शिष्यवृत्तीची शोधाशोध करावी लागते.विद्यार्थ्यांमध्ये संतापविद्यार्थ्यांना २०१८-१९ व २०१९-२० या शैक्षणिक सत्रातील शिष्यवृत्ती अद्याप मिळाली नाही. त्यामुळे विद्यार्थी शिक्षण संस्थेकडे तर संस्थाचालक समाज कल्याण व आदिवासी विभागाकडे वारंवार विचारणा करीत आहेत.