शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

जिल्ह्यात पोहोचली शेतकरी संपाची धग

By admin | Updated: June 3, 2017 00:29 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मनातही असंतोष खदखदत आहे. पश्चिम महाराष्ट्रात पेटलेला शेतकऱ्यांचा संप विदर्भाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

गांधी चौकात आज धरणे : उद्या शेतकरी संघटना करणार सीमा सीललोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मनातही असंतोष खदखदत आहे. पश्चिम महाराष्ट्रात पेटलेला शेतकऱ्यांचा संप विदर्भाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ आदी जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही आंदोलनाची धग पोहोचत आहे. शनिवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात गांधी चौकात धरणे देण्यात येणार आहेत. तर रविवारी शेतकरी संघटनेने महाराष्ट्र-तेलंगणा सीमा सील करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमुक्तीसह शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव, विजेचा पुरेसा पुरवठा, सिंचनाच्या सुविधा आदी विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या समन्वय समितीने १ ते ७ जून या कालावधीत संप पुरकारला. शेतकऱ्यांनी प्रथमच संपाचे हत्यार उपसले आहे. त्याला उत्स्फूत प्रतिसाद मिळत आहेत. शेतकऱ्यांचा संप पहिल्या दिवसापासूनच हिंसक झाला आहे. मुंबई शहराला होणारा दूध व पालेभाज्याचा पुरवठा रोखण्यात आला आहे. आंदोलनाची तीव्रता सर्वाधिक अहमदनगर जिल्ह्यात आहे. त्यामुळे शेतकरी नेत्यांसह सर्वसामान्य शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहे. त्याची पर्वा न करता चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांनी ‘लोकमत’कडे सरकारविरोधात राग व्यक्त केला. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची शेकडो क्विंटल तूर पडलेली आहे. नाफेडच्या ग्रेडरनी तूर गाळणी वारंवार केल्याने तूर खरेदीची गती मंद होती. परिणामी ३१ जूनपर्यंत तुरीची पूर्ण खरेदी होऊ शकलेली नाही. शेतकऱ्यांना टोकन देऊन परत पाठविण्यात आले आहे. तुरीचे पोते बाजार समितीत पडून आहेत. टोकन दिलेल्या तुरीबाबत सरकारने अद्याप भूमिका घेतलेली नाही. एकीकडे मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांकडील तुरीचा शेवटचा दाणा खरेदी करण्याची घोषणा केली आहेत. दुसरीकडे चंद्रपूर बाजार समितीत आठ दिवसांपूर्वी तूर आणल्यानंतरही त्या पोत्यांचे वजन झालेले नाही. त्याला शेतकरी वैतागले आहेत. त्यांनी सरकारच्या भूमिकेविरोधात जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.तेलंगणा-मध्य प्रदेशातील पालेभाज्यांची आवकचंद्रपूरमध्ये पालेभाज्यांचा पुरवठा शेजारच्या तेलंगणा व मध्य प्रदेशातून होत असतो. त्यामुळे सध्या पालेभाज्यांची आवक नेहमीप्रमाणे कायम आहे. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी सकाळी तेलंगणामधील पालेभाज्यांचे ट्रक व मिनी ट्रक आले होते. शेतकरी शेती मशागतीच्या कामात गुंतला असल्याने पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत. वांगी, भेेंडी, फ्लॉवर, कोबी आदी भाज्यांच्या भावामध्ये दीडपट वाढ झाली आहे. एकीकडे शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात असंतोष निर्माण होत असताना सर्वसामान्य ग्राहकांना महागड्या पालेभाज्या खरेदी कराव्या लागत आहेत.तेलंगणातील शेतकऱ्यांना सहकार्याचे आवाहनशेतकरी संघटनेचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी तेलंगणातून येणारे दूध आणि पालेभाज्या महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवरील लक्कडकोट येथे रविवारी रोखण्याची घोषणा केली. तसेच त्यांनी तेलंगणामधील शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील संपाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. तेलंगणाच्या सीमेवर पडणारी ठिणगी पुढे वणव्याचे रूप धारण करेल, असा इशाराही अ‍ॅड. चटप यांनी दिला. आज विविध किसान संघटनांचे धरणेशेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसतर्फे चंद्रपूर येथील गांधी चौकात धरणे देण्यात येणार आहे. या आंदोलनाला शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदू नागरकर यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच या धरणे आंदोलनाला शेतकरी संघटना व राष्ट्रवादी किसान सभेने पाठिंबा दिला आहे.