शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कृषी उत्पन्न बाजार समितीत ४६ लाखांचा घोटाळा; पर्यवेक्षकासह चौघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 15:09 IST

बाजार समितीमधील प्रकरण : सचिवाची अखेर पोलिस ठाण्यात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल तारण योजनेत शेतमाल न ठेवता बनावट कागदपत्र तयार करून ४६ लाख ५८ हजार ५० रुपये तीन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याचा घोटाळा काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. याप्रकरणी बाजार समितीने अखेर पोलिसात तक्रार केली. त्यावरून वरोरा पोलिसांनी गुरुवारी (दि. ८) निलंबित पर्यवेक्षकासह चार व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केल आहे. निलंबित पर्यवेक्षक कोमल गारघाटे, अनिल तडसे, विजय कळसकर व गुरुदत्त कुळसंगे, अशी आरोपींची नावे आहेत.

वरोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत तत्कालीन पर्यवेक्षक कोमल गारगाटे यांच्याकडे शेतमाल तारण योजनेची जबाबदारी होती. या योजनेत शेतमाल ठेवल्यास शेतकऱ्यांना ७५ टक्के रक्कम ताबडतोब दिली जाते. पर्यवेक्षक गारघाटे याने २१ एप्रिल २०२२ ते २२ एप्रिल २०२४ या कालावधीत शेतमाल तारण योजनेत ठेवला नाही. 

तारण योजनेतील घोटाळ्याबाबत बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे यांनी वरोरा ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून निलंबित पर्यवेक्षक गारघाटे, अनिल तडसे, विजय कळसकर व गुरुदत्त कुळसंगे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता ४०६, ४०९, ४२०, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम वळतीबनावट कागदपत्र तयार करून वरोरा येथील अनिल मधुकर तडसे यांच्या बँक खात्यावर ३१ लाख ७७ हजार २५८, परसोडाचे विजय पुंजाराम कळसकर यांच्या बँक खात्यात १९ लाख ८५ हजार ३७२ आणि गुरुदत्त कुळसंगे यांच्या खात्यात चार लाख ९५ हजार ३४, असे एकूण ४६ लाख ५८ हजार ५० रुपये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बँक खात्यातून वळते. परंतु, तारण योजनेत सोयाबीन ठेवल्याची नोंदच दिसून आली नाही. त्यामुळे पर्यवेक्षक कोमल गारघाटे याला निलंबित करण्यात आले.

यापूर्वी राज्यभरात गाजला होता कांदा घोटाळाचंद्रपूर जिल्ह्यात कांदा हे पीक अतिशय नगण्य प्रमाणात घेतले जाते. मात्र, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या ६७६ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारे २ कोटी ३० लाख रुपये अनुदान जमा झाल्याचे प्रकरण यापूर्वी राज्यभरात गाजले होते. वरोरा तालुक्यात कांद्याचे पीक कृषी विभागाच्या मते, ७५ हेक्टरवर होते. परंतु, बाजार समितीत ६५ हजार क्विंटल कांदा कसा काय विकला गेला, असा प्रश्न त्यावेळी नागरिकांनी विचारला होता.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर