शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

ऐतिहासिक रामाळा तलाव वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 22:35 IST

शहरातील ऐतिहासिक रामाळा तलावाचे जलप्रदुषण टाळण्याकरिता तलावात येणारा मच्छीनाला त्वरित वळते करून जल शुद्धीकरण संयत्र उभारणे गरजेचे आहे. परंतु, याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्या जात आहे.

ठळक मुद्देनागरिकांची मागणी : तलाव परिसर फेरी उपक्रमातून वेधले प्रशासनाचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील ऐतिहासिक रामाळा तलावाचे जलप्रदुषण टाळण्याकरिता तलावात येणारा मच्छीनाला त्वरित वळते करून जल शुद्धीकरण संयत्र उभारणे गरजेचे आहे. परंतु, याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्या जात आहे.चंद्रपूर शहर हे गोंडकालिन शहर आहे. गोंडराजांनी शहरात किल्ला परकोट व रामाळा तलावाची निर्मिती केली. सुमारे ५०० वर्षांपेक्षा अधिक प्राचीन इतिहास असलेला रामाळा तलाव शहराच्या मध्यभागी असल्याने आकर्षणाचे केंद्र आहे. मात्र तलावाचे सौंदर्य व व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाले. तलावातील पाणी प्रदुषित होण्याला मच्छीनाला व शहराच्या उत्त्तरेकडून वाहणारे नाल्यातील सांडपाणी कारणीभूत आहे. बाजुला बायपास नाला असतानाही हे सांडपाणी तलावात येत आहे. जागतिक जलदिनाचे औचित्य साधून इको-प्रोने तलावातील प्रदुषणाला कारणीभुत घटक नागरिकांच्या प्रतिक्रीया जाणुन घेण्याकरिता 'तलाव परिसर फेरी' कार्यक्रम घेण्यात आला.ही फेरी रामाळा तलाव ते प्रदुषित करणाऱ्या स्त्रोतांपर्यत काढण्यात आली. रामाळा तलावाच्या वरील भागातील वेकोलि खाण परिसरातुन वाहणाऱ्या मच्छीनाला व त्याला पर्यायी असलेल्या नाल्याच्या बाजुने फिरून वस्तुस्थिती जाणुन घेतली. यामध्ये कार्यकर्ते सहभागी झाले.रामाळा तलाव इकोर्नियामुक्त करातलावातील पाणी अधिक प्रदुषित होत असल्याने ते नदीच्या प्रवाहात सोडता येणार नाही, असे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने स्पष्ट केले. यामुळे तलाव खोलीकरणाच्या कामात अडचण निर्माण झाल्या. त्यामुळे तलावात येणारे मच्छीनाला व दुषित सांडपाणी किमान तलावाला लागुन असलेल्या नाल्यात सोडल्यास तलाव सुरक्षित राहिल. शिवाय इकोर्निया वनस्पतीमुक्त रामाळा तलाव ही मोहीम सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.विहीर, हातपंपावर अनिष्ट परिणाम२००८ रोजी रामाळा तलावात इकोर्निया वनस्पती वाढले असता स्वच्छता अभियान राबविण्यात आली होती. शासन, सामाजिक संस्था व नागरिकांच्या पुढाकाराने तलाव इकॉर्नियामुक्त झाला होता. मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. तलावातील पाण्याची दुर्गधी सुटली. नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन होत आहे. तलावालगतच्या विहिरी व हातपंपावर अनिष्ट परिणाम झाला. रामाळा तलावातील प्रदुषित पाण्याबाबत मागील वर्षभरापासुन इको-प्रो सतत प्रयत्नशिल असूल खोलीकरणाची मागणी करत आहे. पत्रके वाटून स्वाक्षरी अभियानही सुरू केले.