शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

ऐतिहासिक रामाळा तलाव वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 22:35 IST

शहरातील ऐतिहासिक रामाळा तलावाचे जलप्रदुषण टाळण्याकरिता तलावात येणारा मच्छीनाला त्वरित वळते करून जल शुद्धीकरण संयत्र उभारणे गरजेचे आहे. परंतु, याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्या जात आहे.

ठळक मुद्देनागरिकांची मागणी : तलाव परिसर फेरी उपक्रमातून वेधले प्रशासनाचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील ऐतिहासिक रामाळा तलावाचे जलप्रदुषण टाळण्याकरिता तलावात येणारा मच्छीनाला त्वरित वळते करून जल शुद्धीकरण संयत्र उभारणे गरजेचे आहे. परंतु, याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्या जात आहे.चंद्रपूर शहर हे गोंडकालिन शहर आहे. गोंडराजांनी शहरात किल्ला परकोट व रामाळा तलावाची निर्मिती केली. सुमारे ५०० वर्षांपेक्षा अधिक प्राचीन इतिहास असलेला रामाळा तलाव शहराच्या मध्यभागी असल्याने आकर्षणाचे केंद्र आहे. मात्र तलावाचे सौंदर्य व व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाले. तलावातील पाणी प्रदुषित होण्याला मच्छीनाला व शहराच्या उत्त्तरेकडून वाहणारे नाल्यातील सांडपाणी कारणीभूत आहे. बाजुला बायपास नाला असतानाही हे सांडपाणी तलावात येत आहे. जागतिक जलदिनाचे औचित्य साधून इको-प्रोने तलावातील प्रदुषणाला कारणीभुत घटक नागरिकांच्या प्रतिक्रीया जाणुन घेण्याकरिता 'तलाव परिसर फेरी' कार्यक्रम घेण्यात आला.ही फेरी रामाळा तलाव ते प्रदुषित करणाऱ्या स्त्रोतांपर्यत काढण्यात आली. रामाळा तलावाच्या वरील भागातील वेकोलि खाण परिसरातुन वाहणाऱ्या मच्छीनाला व त्याला पर्यायी असलेल्या नाल्याच्या बाजुने फिरून वस्तुस्थिती जाणुन घेतली. यामध्ये कार्यकर्ते सहभागी झाले.रामाळा तलाव इकोर्नियामुक्त करातलावातील पाणी अधिक प्रदुषित होत असल्याने ते नदीच्या प्रवाहात सोडता येणार नाही, असे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने स्पष्ट केले. यामुळे तलाव खोलीकरणाच्या कामात अडचण निर्माण झाल्या. त्यामुळे तलावात येणारे मच्छीनाला व दुषित सांडपाणी किमान तलावाला लागुन असलेल्या नाल्यात सोडल्यास तलाव सुरक्षित राहिल. शिवाय इकोर्निया वनस्पतीमुक्त रामाळा तलाव ही मोहीम सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.विहीर, हातपंपावर अनिष्ट परिणाम२००८ रोजी रामाळा तलावात इकोर्निया वनस्पती वाढले असता स्वच्छता अभियान राबविण्यात आली होती. शासन, सामाजिक संस्था व नागरिकांच्या पुढाकाराने तलाव इकॉर्नियामुक्त झाला होता. मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. तलावातील पाण्याची दुर्गधी सुटली. नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन होत आहे. तलावालगतच्या विहिरी व हातपंपावर अनिष्ट परिणाम झाला. रामाळा तलावातील प्रदुषित पाण्याबाबत मागील वर्षभरापासुन इको-प्रो सतत प्रयत्नशिल असूल खोलीकरणाची मागणी करत आहे. पत्रके वाटून स्वाक्षरी अभियानही सुरू केले.