शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
5
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
6
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
7
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
8
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
9
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
10
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
11
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
12
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
13
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
14
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
15
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
16
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
17
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
18
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
19
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
20
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?

निवडून आलेल्या सदस्यातुन सरपंच निवडायचा असल्याने चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:28 IST

राजू गेडाम मूल : मागील पाच वर्षापूर्वी थेट सरपंचाला जनतेतून निवडून द्यायचे होते तसेच सरपंचपदाचे आरक्षण ...

राजू गेडाम

मूल : मागील पाच वर्षापूर्वी थेट सरपंचाला जनतेतून निवडून द्यायचे होते तसेच सरपंचपदाचे आरक्षण पूर्वीच माहीत असल्याने पाहिजे त्या प्रमाणात चढाओढ नसल्याचे दिसून आले. मात्र यावर्षी सरपंचपदाचे कुठले आरक्षण पडेल हे माहीत नसल्याने सर्व पक्षाचे उमेदवार डोक्याला बाशिंग बांधून निवडणुकीत आपले नशीब आजमावायचा प्रयत्न चालविला आहे. शासनाने थेट ग्रामपंचायतीला निधी मिळत असल्याने या निवडणुकीत चुरस वाढण्याचे संकेत मिळू लागले आहे. महाराष्ट्र शासनाने १५ जानेवारीला होत असलेल्या निवडणुकीसाठी जनतेतून निवडून द्यायच्या सरपंच पदासाठीचा निर्णय रद्द करून निवडुन आलेल्या सदस्यातून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला. तसेच सरपंचपदाचे आरक्षण देखील निवडणुकीनंतर ठरणार असल्याने या निवडणुकीत चढाओढ दिसत आहे. या निवडणुकीत प्रमुख्याने भाजपा काँग्रेस या पक्षात चुरस असली तरी राकाँ ,बसपा, शिवसेना व अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावायचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहेत. सध्या ३७ ग्रामपंचायतीपैकी जवळपास १७ ग्रामपंचायतीमध्ये भाजपा तर १७ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसची सत्ता आहे तर तीन ग्रामपंचायतीवर बसपा व मित्रपक्ष आहेत. यात राजोली,डोंगरगाव ,मोरवाही, टेकाडी,विरई, नलेश्वर ,जानाळा,केळझर,बोंडाळा,बुज.,येरगाव,चिखली,भादुर्णी,चिमढा,फिस्कूटी, चिरोली,नांदगाव ,गोवर्धन, पिपरी दीक्षित, मुरमाडी, मारोडा, काटवन, चितेगाव, बोरचादली, चांदापूर, जुनासुर्ला, चिचाळा, हळदी, सुशी दाबगाव,दाबगाव मक्ता,नवेगाव, भूजला, गांगलवाडी, कोसंबी, मरेगाव, राजगड, भवराळा, खालवसपेठ,उथडपेठ आदी गावांचा समावेश आहे. या निवडणुकीत ५४,९०६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात २६८९८ महिला तर २८००८ पुरुष मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जवळपास ५५ हजार मतदाराच्या हातात ३७ सरपंच व २८० सदस्याचे भवितव्य अवलंबून आहे.