शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

वाळू उपशामुळे जीवनदायिणी वर्धा नदीचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 05:00 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : गेल्या दोन वर्षांपासून रेती तस्करी होत आहे. लाखोंचा दंड महसूल विभागाने वसुली केला ...

ठळक मुद्देबंद असतानाही रोजरोसपणे नदीपात्रातून वाळूचा उपसा

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या दोन वर्षांपासून रेती तस्करी होत आहे. लाखोंचा दंड महसूल विभागाने वसुली केला असला तरी त्या प्रमाणात कितीतरी पटीने रेती चोरी झाली. घुग्घुसजवळील वर्धा नदीच्या नकोडा, घुग्घुस, घोडेघाट, नायगाव, चिंचोली घाटावरून सातत्याने रेतीचा उपसा केला जात आहे. त्यामुळे नदीचे पात्र रुंद आणि खोल होत आहे. नदीपात्रातच खोल खड्डे पडले आहेत. यामुळे या ठिकाणच्या नदीचे अस्तित्व धोक्यात येऊ पाहत आहे. घुग्घुस परिसरातून वर्धा नदी वाहते. त्यात नकोडा, घुग्घुस, घोडेघाट, नायगाव व अन्य घाट आहेत.  गेल्या दोन वर्षांपासून शासनाने या घाटांचा नव्हे तर जिल्ह्यातील कोणत्याच घाटांचा लिलाव केला नाही. तरीही घुग्घुस परिसरातील घाटावरून मोठया प्रमाणावर दिवसरात्र रेतीचा उपसा करून त्याची तस्करी केली जात आहे. लोडर, जेसीबीच्या साहाय्याने रेतीचा उपसा केला जात आहे. यामुळे वर्धा नदीचे नैसर्गिक पात्र बदलत चालले आहे. पात्र रुंद आणि खोल झाले आहे. नदीपात्रात खोल खड्डे पडले आहेत. यामुळे नदीचे अस्तित्वही धोक्यात आहे.

शेकडो ब्रास रेतीचा उपसा वर्धा नदीवरील नकोडा, घुग्घुस, घोडाघाट, नायगाव, चिंचोली असे विविध घाट आहेत. या घाटांवरून पे लोडर, जेसीबींच्या सहाय्याने रेतीचे दररोज उत्खनन केले जात आहे. मोठ मोठ्या हायवा ट्रक, ट्रॅक्टरने रेतीची वाहतूक केली जात आहे. या घाटांवरून दररोज शेकडो ब्रास रेतीचा उपसा होत आहे. यातून अनेक रेती तस्कर गब्बर बनले आहेत. तरीही याकडे प्रशासनाचे लक्ष नाही.

आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची   असणार नजर पोलीस ठाणे, पटवारी व मंडळ आधिकाºयांच्या कार्यालयासमोरूनच रात्रंदिवस दररोज रेती तस्करी होत आहे. त्यामुळे पोलीस व महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर शंका व्यक्त केली जात आहे. आता दोन दिवसांपूर्वी पोलीस ठाण्याच्या मुख्य गेटवर दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून त्याची लिंक थेट तहसीलदार यांच्या भ्रमणसेवेला जोडण्यात आली आहे. 

नदीपात्रातील रेतीचा अवैधपणे उपसा केल्यानंतर निशि्चतच नदीचे नैसर्गिक पात्र बदलते. ज्या भागातून रेतीचा उपसा केला जातो, त्या भागात पावसाळ्यात पाणी शिरते. त्यामुळे पुराचा धोका असतो. याशिवाय रेतीचा वारंवार उपसा केल्याने जलजन्य वनस्पती व किटके आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या प्राण्यांवर परिणाम होत आहे.- प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरण तज्ज्ञ

टॅग्स :sandवाळूriverनदी