शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

वाळू उपशामुळे जीवनदायिणी वर्धा नदीचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 05:00 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : गेल्या दोन वर्षांपासून रेती तस्करी होत आहे. लाखोंचा दंड महसूल विभागाने वसुली केला ...

ठळक मुद्देबंद असतानाही रोजरोसपणे नदीपात्रातून वाळूचा उपसा

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या दोन वर्षांपासून रेती तस्करी होत आहे. लाखोंचा दंड महसूल विभागाने वसुली केला असला तरी त्या प्रमाणात कितीतरी पटीने रेती चोरी झाली. घुग्घुसजवळील वर्धा नदीच्या नकोडा, घुग्घुस, घोडेघाट, नायगाव, चिंचोली घाटावरून सातत्याने रेतीचा उपसा केला जात आहे. त्यामुळे नदीचे पात्र रुंद आणि खोल होत आहे. नदीपात्रातच खोल खड्डे पडले आहेत. यामुळे या ठिकाणच्या नदीचे अस्तित्व धोक्यात येऊ पाहत आहे. घुग्घुस परिसरातून वर्धा नदी वाहते. त्यात नकोडा, घुग्घुस, घोडेघाट, नायगाव व अन्य घाट आहेत.  गेल्या दोन वर्षांपासून शासनाने या घाटांचा नव्हे तर जिल्ह्यातील कोणत्याच घाटांचा लिलाव केला नाही. तरीही घुग्घुस परिसरातील घाटावरून मोठया प्रमाणावर दिवसरात्र रेतीचा उपसा करून त्याची तस्करी केली जात आहे. लोडर, जेसीबीच्या साहाय्याने रेतीचा उपसा केला जात आहे. यामुळे वर्धा नदीचे नैसर्गिक पात्र बदलत चालले आहे. पात्र रुंद आणि खोल झाले आहे. नदीपात्रात खोल खड्डे पडले आहेत. यामुळे नदीचे अस्तित्वही धोक्यात आहे.

शेकडो ब्रास रेतीचा उपसा वर्धा नदीवरील नकोडा, घुग्घुस, घोडाघाट, नायगाव, चिंचोली असे विविध घाट आहेत. या घाटांवरून पे लोडर, जेसीबींच्या सहाय्याने रेतीचे दररोज उत्खनन केले जात आहे. मोठ मोठ्या हायवा ट्रक, ट्रॅक्टरने रेतीची वाहतूक केली जात आहे. या घाटांवरून दररोज शेकडो ब्रास रेतीचा उपसा होत आहे. यातून अनेक रेती तस्कर गब्बर बनले आहेत. तरीही याकडे प्रशासनाचे लक्ष नाही.

आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची   असणार नजर पोलीस ठाणे, पटवारी व मंडळ आधिकाºयांच्या कार्यालयासमोरूनच रात्रंदिवस दररोज रेती तस्करी होत आहे. त्यामुळे पोलीस व महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर शंका व्यक्त केली जात आहे. आता दोन दिवसांपूर्वी पोलीस ठाण्याच्या मुख्य गेटवर दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून त्याची लिंक थेट तहसीलदार यांच्या भ्रमणसेवेला जोडण्यात आली आहे. 

नदीपात्रातील रेतीचा अवैधपणे उपसा केल्यानंतर निशि्चतच नदीचे नैसर्गिक पात्र बदलते. ज्या भागातून रेतीचा उपसा केला जातो, त्या भागात पावसाळ्यात पाणी शिरते. त्यामुळे पुराचा धोका असतो. याशिवाय रेतीचा वारंवार उपसा केल्याने जलजन्य वनस्पती व किटके आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या प्राण्यांवर परिणाम होत आहे.- प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरण तज्ज्ञ

टॅग्स :sandवाळूriverनदी