शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हताश शेतकऱ्यांच्या जनावरांची कवडीमोल भावात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : शेतकऱ्यांच्या जीवाभावाचा सखा म्हणजे बैल. शेतकरी वर्षभर बैलाला जिवापाड जपतो. कसदार मातीतून सोनं पिकविण्यासाठी बैलाचे मोठे योगदान असते. परंतु, यावर्षी बोंडअळी व विविध रोगांनी पिकांना ग्रासल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी यावर्षी शेती करण्यालाच ब्रेक दिला. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी वर्षभर जीवापाड जपलेल्या ढवळ्या-पवळ्याची कवडीमोल भावात विक्री करीत आहे. ...

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : बैलबाजारावर मंदीचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : शेतकऱ्यांच्या जीवाभावाचा सखा म्हणजे बैल. शेतकरी वर्षभर बैलाला जिवापाड जपतो. कसदार मातीतून सोनं पिकविण्यासाठी बैलाचे मोठे योगदान असते. परंतु, यावर्षी बोंडअळी व विविध रोगांनी पिकांना ग्रासल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी यावर्षी शेती करण्यालाच ब्रेक दिला. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी वर्षभर जीवापाड जपलेल्या ढवळ्या-पवळ्याची कवडीमोल भावात विक्री करीत आहे. बैलबाजारावर सध्या मंदीचे सावट असून याचा फायदा दलाल घेत आहेत.जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना नेहमीच संकटाचा सामना करावा लागत आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकरी पूर्णत: काकुळतीला आला आहे. शेतात वर्षभर राबूनही शेवटी हाती काहीच लागले नाही. हा गेल्या अनेक वर्षापासूनचा अनुभव शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. यावर्षी शेतकऱ्यांवर ओढविलेली परिस्थिती अतिशय भयावह आहे. शेतकऱ्यांना यावर्षी पूर्णत: बोंडअळीने हैराण करून सोडल. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आणि बहुतांश शेतकऱ्यांनी यावर्षी शेती करण्यालाच ब्रेक दिला आहे.शेतकºयांसमोर कर्जाचा डोंगर वाढत असताना दरवर्षी शेतीला येणारा तोटा शेतकऱ्यांनी कुठपर्यंत सहन करायचा म्हणून नाईलाजाने शेती करण्यालाच नकार देत आहे. अशातच पाळीव जनावरांचा खर्च पेलत नसल्याने व त्याच्या चाऱ्याचा प्रश्न असल्याने वर्षानुवर्षे जीवापाड जपलेल्या बैलांची कवडीमोल दरात विक्री केली जात आहे. त्याचा पुरेपूर फायदा खासगी दलाल घेत असून अत्यंत कमी दरात शेतकऱ्यांकडून बैलाची खरेदी करण्यात येत आहे.बैलजोडीच्या किंमती एक लाख रुपयापर्यंत गेल्या आहेत. परंतु, खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्या दलालांनी बैलांच्या किमती कमी करून शेतकºयांकडून मिळेल त्या पडत्या भावात बैलांची खरेदी करणे सुरू केले आहे.परप्रांतात बैलाची विक्रीशेतकºयांकडून कमी दरात बैलजोडी खरेदी करून परप्रांतात त्या बैलाला विकणारी टोळी या भागात सक्रिय झाली आहे. यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असून बैलांची अर्धी किंमतही दिली जात नसल्याचे दिसून येते.