शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

बरांज तांडा परिसरात सर्रास दारू विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:36 IST

शहरातील विविध वॉर्डात छुप्या मार्गाने देशी व विदेशी दारूची सर्रास विक्री होत आहे. परंतु या दारूचा दर अधिक असल्याने मद्यपींनी बरांज तांडा परिसरातील हातभट्टीकडे जात असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देयुवापिढी व्यसनांच्या विळख्यात : सायंकाळी मद्यपींची चंगळ

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : शहरातील विविध वॉर्डात छुप्या मार्गाने देशी व विदेशी दारूची सर्रास विक्री होत आहे. परंतु या दारूचा दर अधिक असल्याने मद्यपींनी बरांज तांडा परिसरातील हातभट्टीकडे जात असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात दारूबंदी जिल्हा असली तरी भद्रावती तालुक्यात देशी व विदेशी दारू सहजपणे उपलब्ध होते. तर दुसरीकडे बरांज तांडा परिसरातील हातभट्टीवर दारू काढण्याचे प्रमाण वाढले. देशी व विदेशी दारूच्या किमती वाढविल्याने मद्यपींनी बरांज तांडाकडे मोर्चा वळविला. दरम्यान, पोलिसांनी अनेकदा धाडी टाकून आरोपींना जेरबंद केले. कित्येकदा विशेष मोहीमसुद्धा राबविली. परंतु दारु काढणाऱ्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढतच आहे. या परिसरातील बºयाच दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल झाले. काहींनी तुरूंगवास भोगला पण दारूचा व्यवसाय अजुनही बंद केला नाही.तालुक्यात रोजंदारी करणाºया कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अंगमेहनतीची कामे करीत असल्याने बहुतेकांना दारूचे व्यसन जडले. गावठी दारू सहज मिळू लागल्याने युवापिढी व्यसनाच्या आहारी गेली. तालुक्यात मिळणारी देशी व विदेशी दारूचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने मद्यपी आता बरांज तांडा येथे जात आहेत. यामध्ये बेरोजगार युवकांची संख्या अधिक असल्याचे वास्तव पुढे आले आहे. तांड्यावरील दारूची मागणी वाढली आहे. हातभट्टीची दारू काढण्यासाठी प्रामुख्याने मोह फुलाची आवश्यकता असते. परंतु हातभट्टी दारूची मागणी लक्षात घेऊन जंगलातील सळलेला पाला पोचाळा, विशिष्ट झाडांच्या साली तसेच विविध प्रकारच्या रासायनांचा वापर केला जात आहे. परंतु मद्यपी या प्रकाराकडे दुर्लक्ष करून केवळ नशेसाठी हातभट्टीची दारू पित असल्याची माहिती या परिसरातील नागरिकांनी दिली. गावठी दारूमुळे परिसरातील शेकडो मद्यपींना वेगवेगळे आजार जडले. कुटुंबांमध्ये भांडणे वाढली. मुलाबाळांच्या शिक्षणावर खर्च होणारा पैसा वाममार्गाला जाऊ लागला. परिणामी, शेकडो कुटुंबातील महिला हैराण झाल्या आहेत. ही दारू केवळ १० ते २० रूपये ग्लास मिळत असल्याने पिणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. यातून शेकडो कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आले आहेत. पोलिसांकडून कारवाई होऊनही दारू का बंद झाली नाही, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.व्यसन मुक्ती शिबिर सुरू कराजिल्हा दारुबंदी होवून पाच वर्षे होत आहे. दारूबंदीपूर्वी नागरिकांच्या आरोग्याचा विषय पुढे करून तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी प्रशंसा व मते मिळविलजी. पण, बंदीनंतरही सुरू असलेल्या दारु विक्रीच्या प्रश्नावरून पोलिसांवर दबाव वाढविला नाही. बरांज तांडा येथील हातभट्टीची दारु पिऊन शेकडो नागरिकांचे आरोग्य बिघडले. काही व्यक्तींचा मृत्यू झाला. परंतु शासनाने या पाच वर्षात एकही व्यसन मुक्ती शिबिर राबविले नाही. यामुळे कागदावरील दारूबंदीविषयी महिला संताप व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :liquor banदारूबंदी