शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बरांज तांडा परिसरात सर्रास दारू विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:36 IST

शहरातील विविध वॉर्डात छुप्या मार्गाने देशी व विदेशी दारूची सर्रास विक्री होत आहे. परंतु या दारूचा दर अधिक असल्याने मद्यपींनी बरांज तांडा परिसरातील हातभट्टीकडे जात असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देयुवापिढी व्यसनांच्या विळख्यात : सायंकाळी मद्यपींची चंगळ

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : शहरातील विविध वॉर्डात छुप्या मार्गाने देशी व विदेशी दारूची सर्रास विक्री होत आहे. परंतु या दारूचा दर अधिक असल्याने मद्यपींनी बरांज तांडा परिसरातील हातभट्टीकडे जात असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात दारूबंदी जिल्हा असली तरी भद्रावती तालुक्यात देशी व विदेशी दारू सहजपणे उपलब्ध होते. तर दुसरीकडे बरांज तांडा परिसरातील हातभट्टीवर दारू काढण्याचे प्रमाण वाढले. देशी व विदेशी दारूच्या किमती वाढविल्याने मद्यपींनी बरांज तांडाकडे मोर्चा वळविला. दरम्यान, पोलिसांनी अनेकदा धाडी टाकून आरोपींना जेरबंद केले. कित्येकदा विशेष मोहीमसुद्धा राबविली. परंतु दारु काढणाऱ्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढतच आहे. या परिसरातील बºयाच दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल झाले. काहींनी तुरूंगवास भोगला पण दारूचा व्यवसाय अजुनही बंद केला नाही.तालुक्यात रोजंदारी करणाºया कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अंगमेहनतीची कामे करीत असल्याने बहुतेकांना दारूचे व्यसन जडले. गावठी दारू सहज मिळू लागल्याने युवापिढी व्यसनाच्या आहारी गेली. तालुक्यात मिळणारी देशी व विदेशी दारूचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने मद्यपी आता बरांज तांडा येथे जात आहेत. यामध्ये बेरोजगार युवकांची संख्या अधिक असल्याचे वास्तव पुढे आले आहे. तांड्यावरील दारूची मागणी वाढली आहे. हातभट्टीची दारू काढण्यासाठी प्रामुख्याने मोह फुलाची आवश्यकता असते. परंतु हातभट्टी दारूची मागणी लक्षात घेऊन जंगलातील सळलेला पाला पोचाळा, विशिष्ट झाडांच्या साली तसेच विविध प्रकारच्या रासायनांचा वापर केला जात आहे. परंतु मद्यपी या प्रकाराकडे दुर्लक्ष करून केवळ नशेसाठी हातभट्टीची दारू पित असल्याची माहिती या परिसरातील नागरिकांनी दिली. गावठी दारूमुळे परिसरातील शेकडो मद्यपींना वेगवेगळे आजार जडले. कुटुंबांमध्ये भांडणे वाढली. मुलाबाळांच्या शिक्षणावर खर्च होणारा पैसा वाममार्गाला जाऊ लागला. परिणामी, शेकडो कुटुंबातील महिला हैराण झाल्या आहेत. ही दारू केवळ १० ते २० रूपये ग्लास मिळत असल्याने पिणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. यातून शेकडो कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आले आहेत. पोलिसांकडून कारवाई होऊनही दारू का बंद झाली नाही, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.व्यसन मुक्ती शिबिर सुरू कराजिल्हा दारुबंदी होवून पाच वर्षे होत आहे. दारूबंदीपूर्वी नागरिकांच्या आरोग्याचा विषय पुढे करून तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी प्रशंसा व मते मिळविलजी. पण, बंदीनंतरही सुरू असलेल्या दारु विक्रीच्या प्रश्नावरून पोलिसांवर दबाव वाढविला नाही. बरांज तांडा येथील हातभट्टीची दारु पिऊन शेकडो नागरिकांचे आरोग्य बिघडले. काही व्यक्तींचा मृत्यू झाला. परंतु शासनाने या पाच वर्षात एकही व्यसन मुक्ती शिबिर राबविले नाही. यामुळे कागदावरील दारूबंदीविषयी महिला संताप व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :liquor banदारूबंदी