शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी व्यसनमुक्त मंचचे राज्यपालांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:18 IST

व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचच्या शिष्टमंडळाने राज्यपाल यांच्याशी दि. २७ मे रोजी महाराष्ट्र राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाद्वारे चंद्रपूर जिल्ह्याची ...

व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचच्या शिष्टमंडळाने राज्यपाल यांच्याशी दि. २७ मे रोजी महाराष्ट्र राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाद्वारे चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठविण्यात आली आहे. या जिल्ह्यात मागील सरासरी सहा वर्षांपासून दारूबंदी होती. यासाठी नागरिक व महिलांकडून मोठ्या संख्येने दीर्घकालीन लढा देण्यात आला होता. लाखो महिलांनी रस्त्यावर उतरून दारूबंदीची मागणी केली होती. याची दखल घेऊन तत्कालीन युती सरकारने दारूबंदी लागू केली होती.

मात्र चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या राज्यमंत्रिमंडळाने घेतला आहे. भारतीय राज्यघटनेतील तत्त्वांच्या खुले आम विरोधात जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचे आश्वासन देत निवडणूक लढवली होती, असा आरोप या मंचने केला आहे.

कोरोना महामारीमुळे सामान्य जनता, विशेषतः महिलावर्ग, मागास जाती-जमाती अभावग्रस्त, हवालदिल आहेत. शासकीय बंधनांमुळे विरोध व्यक्त करण्यासाठी एकत्र येणेसुद्धा अशक्य आहे. अशा कोंडीत सापडलेल्या गोरगरिबांचे जिणे आणखी अवघड करणारा हा निर्णय लादला गेला आहे. तसेच चंद्रपूर जिल्हा दारूबंदी हटविताना संतापजनक व खेदजनक कारणे दाखवली गेली, असे या मंचचे म्हणणे आहे. याबाबत व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचच्या शिष्टमंडळाने राज्यपाल यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

दरम्यान, मंचच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस करत ते स्वत: दारूबंदी, व्यसनमुक्तीच्या बाजूने असल्याचे सांगितले. महाराष्ट्र शासनाला चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याबाबतचे पत्र देणार, राज्याचे व्यसनमुक्ती धोरण २०११च्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा तयार करण्‍याचे तसेच व्यसनमुक्ती प्रचार- प्रसारबंदी- उपचार यासाठी काम करणाऱ्यांना शासनाने पाठिंबा व मदत करण्याविषयीचे आश्‍वासन दिले. मंचतर्फे मागणी करण्‍यात आलेल्या रमानाथ झा समितीचा अहवाल जनतेसाठी खुला करून देण्‍याबाबतचे आश्‍वासन यावेळी दिले. यावेळी मंचचे राज्य निमंत्रक अविनाश पाटील, राज्य निमंत्रक वर्षा विद्या विलास, सामाजिक कार्यकर्त्या वसुधाताई सरदार, ॲड. रंजना गवांदे, मार्गदर्शक वैकुंठ आत्मानुसंधान अड्याळ टेकडी (ब्रह्मपुरी)चे संचालक सुबोधदादा उपस्थित होते.