शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी व्यसनमुक्त मंचचे राज्यपालांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:18 IST

व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचच्या शिष्टमंडळाने राज्यपाल यांच्याशी दि. २७ मे रोजी महाराष्ट्र राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाद्वारे चंद्रपूर जिल्ह्याची ...

व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचच्या शिष्टमंडळाने राज्यपाल यांच्याशी दि. २७ मे रोजी महाराष्ट्र राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाद्वारे चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठविण्यात आली आहे. या जिल्ह्यात मागील सरासरी सहा वर्षांपासून दारूबंदी होती. यासाठी नागरिक व महिलांकडून मोठ्या संख्येने दीर्घकालीन लढा देण्यात आला होता. लाखो महिलांनी रस्त्यावर उतरून दारूबंदीची मागणी केली होती. याची दखल घेऊन तत्कालीन युती सरकारने दारूबंदी लागू केली होती.

मात्र चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या राज्यमंत्रिमंडळाने घेतला आहे. भारतीय राज्यघटनेतील तत्त्वांच्या खुले आम विरोधात जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचे आश्वासन देत निवडणूक लढवली होती, असा आरोप या मंचने केला आहे.

कोरोना महामारीमुळे सामान्य जनता, विशेषतः महिलावर्ग, मागास जाती-जमाती अभावग्रस्त, हवालदिल आहेत. शासकीय बंधनांमुळे विरोध व्यक्त करण्यासाठी एकत्र येणेसुद्धा अशक्य आहे. अशा कोंडीत सापडलेल्या गोरगरिबांचे जिणे आणखी अवघड करणारा हा निर्णय लादला गेला आहे. तसेच चंद्रपूर जिल्हा दारूबंदी हटविताना संतापजनक व खेदजनक कारणे दाखवली गेली, असे या मंचचे म्हणणे आहे. याबाबत व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचच्या शिष्टमंडळाने राज्यपाल यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

दरम्यान, मंचच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस करत ते स्वत: दारूबंदी, व्यसनमुक्तीच्या बाजूने असल्याचे सांगितले. महाराष्ट्र शासनाला चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याबाबतचे पत्र देणार, राज्याचे व्यसनमुक्ती धोरण २०११च्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा तयार करण्‍याचे तसेच व्यसनमुक्ती प्रचार- प्रसारबंदी- उपचार यासाठी काम करणाऱ्यांना शासनाने पाठिंबा व मदत करण्याविषयीचे आश्‍वासन दिले. मंचतर्फे मागणी करण्‍यात आलेल्या रमानाथ झा समितीचा अहवाल जनतेसाठी खुला करून देण्‍याबाबतचे आश्‍वासन यावेळी दिले. यावेळी मंचचे राज्य निमंत्रक अविनाश पाटील, राज्य निमंत्रक वर्षा विद्या विलास, सामाजिक कार्यकर्त्या वसुधाताई सरदार, ॲड. रंजना गवांदे, मार्गदर्शक वैकुंठ आत्मानुसंधान अड्याळ टेकडी (ब्रह्मपुरी)चे संचालक सुबोधदादा उपस्थित होते.