शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

दारूबंदीसाठी व्यसनमुक्त मंचचे राज्यपालांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:18 IST

व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचच्या शिष्टमंडळाने राज्यपाल यांच्याशी दि. २७ मे रोजी महाराष्ट्र राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाद्वारे चंद्रपूर जिल्ह्याची ...

व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचच्या शिष्टमंडळाने राज्यपाल यांच्याशी दि. २७ मे रोजी महाराष्ट्र राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाद्वारे चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठविण्यात आली आहे. या जिल्ह्यात मागील सरासरी सहा वर्षांपासून दारूबंदी होती. यासाठी नागरिक व महिलांकडून मोठ्या संख्येने दीर्घकालीन लढा देण्यात आला होता. लाखो महिलांनी रस्त्यावर उतरून दारूबंदीची मागणी केली होती. याची दखल घेऊन तत्कालीन युती सरकारने दारूबंदी लागू केली होती.

मात्र चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या राज्यमंत्रिमंडळाने घेतला आहे. भारतीय राज्यघटनेतील तत्त्वांच्या खुले आम विरोधात जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचे आश्वासन देत निवडणूक लढवली होती, असा आरोप या मंचने केला आहे.

कोरोना महामारीमुळे सामान्य जनता, विशेषतः महिलावर्ग, मागास जाती-जमाती अभावग्रस्त, हवालदिल आहेत. शासकीय बंधनांमुळे विरोध व्यक्त करण्यासाठी एकत्र येणेसुद्धा अशक्य आहे. अशा कोंडीत सापडलेल्या गोरगरिबांचे जिणे आणखी अवघड करणारा हा निर्णय लादला गेला आहे. तसेच चंद्रपूर जिल्हा दारूबंदी हटविताना संतापजनक व खेदजनक कारणे दाखवली गेली, असे या मंचचे म्हणणे आहे. याबाबत व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचच्या शिष्टमंडळाने राज्यपाल यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

दरम्यान, मंचच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस करत ते स्वत: दारूबंदी, व्यसनमुक्तीच्या बाजूने असल्याचे सांगितले. महाराष्ट्र शासनाला चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याबाबतचे पत्र देणार, राज्याचे व्यसनमुक्ती धोरण २०११च्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा तयार करण्‍याचे तसेच व्यसनमुक्ती प्रचार- प्रसारबंदी- उपचार यासाठी काम करणाऱ्यांना शासनाने पाठिंबा व मदत करण्याविषयीचे आश्‍वासन दिले. मंचतर्फे मागणी करण्‍यात आलेल्या रमानाथ झा समितीचा अहवाल जनतेसाठी खुला करून देण्‍याबाबतचे आश्‍वासन यावेळी दिले. यावेळी मंचचे राज्य निमंत्रक अविनाश पाटील, राज्य निमंत्रक वर्षा विद्या विलास, सामाजिक कार्यकर्त्या वसुधाताई सरदार, ॲड. रंजना गवांदे, मार्गदर्शक वैकुंठ आत्मानुसंधान अड्याळ टेकडी (ब्रह्मपुरी)चे संचालक सुबोधदादा उपस्थित होते.