शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

केंद्रीय पद्धतीने शाळा प्रवेशासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 05:01 IST

कोरोनाचे संकट देशावर आले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. याचा परिणाम शिक्षण विभागावरही पडला. यावर्षी प्रथमच पहिली ते नववीपर्यंत परीक्षा न होताच निकाल लागले. एवढेच नाही तर, शाळांना मार्च महिन्यामध्येच सुट्या लागल्या. सध्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये जिल्ह्यातील काही शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेश घेत आहेत, तर काही शाळांमध्ये विद्यार्थीच मिळत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देमुख्याध्यापकांना चिंता : शाळांत मर्यादेपेक्षा अतिरिक्त विद्यार्थ्यांना दिला जात आहे प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये काही शाळा अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देत असल्याने भविष्यात सोशल डिस्टन्सिंगअभावी धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यावर्षी केंद्रीय पद्धतीने शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवावी, जेनेकरून विद्यार्थी संख्या मर्यादित राहिल तसेच अन्य शाळांनाही विद्यार्थी मिळेल, अशी मागणी जिल्ह्यातील काही मुख्याध्यापकांनी केली आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी तसेच शिक्षक संघटनांनाही निवेदन देण्यात आले आहे.कोरोनाचे संकट देशावर आले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. याचा परिणाम शिक्षण विभागावरही पडला. यावर्षी प्रथमच पहिली ते नववीपर्यंत परीक्षा न होताच निकाल लागले. एवढेच नाही तर, शाळांना मार्च महिन्यामध्येच सुट्या लागल्या. सध्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये जिल्ह्यातील काही शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेश घेत आहेत, तर काही शाळांमध्ये विद्यार्थीच मिळत नसल्याचे चित्र आहे. ज्या शाळांमध्ये अतिरित्त विद्यार्थी आहे त्या शाळांमध्ये कोरोनाच्या दहशतीत सोशल डिस्टन्सिंग पाळणे कठीण जाणार आहे. तर ज्या शाळांना विद्यार्थीच मिळाले नाही, त्या शाळांतील शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केंद्रीय पद्धतीने शाळांत प्रवेश प्रक्रिया राबविण्याची मागणी सध्या जोर धरत आहे.शाळांसाठी सोशल डिस्टन्सिंगची डोकेदुखीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुरेशी मोकळी जागा असणे गरजेचे आहे. मात्र चंद्रपूरसह जिल्ह्यातील काही शाळांमध्ये मोकळे मैदानच नसल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थीसध्या विविध शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये वाट्टेल तेवढ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. इयत्ता पहिली,पाचवी तसेच इतर वर्गांसाठी प्रवेश देताना विद्यार्थी संख्या मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षण विभागाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.काही शाळांना विद्यार्थीच नाहीजिल्ह्यातील काही शाळा विद्यार्थ्यांना विविध आमिष दाखवित आहे. त्यामुळे या शाळांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. तर दुसरीकडे काही शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शाळा कशा चालवायच्या, असा प्रश्न सध्या संस्थाप्रमुख तसेच शिक्षकांना पडला आहे.एका बेंचवर एकच विद्यार्थी बसण्याची व्यवस्था करावीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी बसण्याची व्यवस्था वेगळी करणे आवश्यक आहे. जर प्रत्येक बाकावर एक प्रमाणे विद्यार्थी बसविले तर कोरोनाचे संकट काही प्रमाणात टाळता येणे शक्य आहे.केंद्रीय पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास सोशल डिस्टन्सिंग पाळून भविष्यातील धोके टाळता येईल. त्यामुळे शिक्षण विभागाने यावर विचार करून प्रत्येक शाळांतील तसेच वर्गातील विद्यार्थी मर्यादा ठरवून देणे गरजेचे आहे.- हरिहर भांडवलकरप्राचार्य, न्यू इंग्लिश हायस्कूल, चंद्रपूरकाही मुख्याध्यापकांनी आपल्याकडे यासंदर्भात निवेदन दिले आहे. मात्र शासनस्तरावर अजूनपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.-संजय डोर्लीकरशिक्षणाधिकारी, माध्यमिक

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा