शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पद्धतीने शाळा प्रवेशासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 05:01 IST

कोरोनाचे संकट देशावर आले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. याचा परिणाम शिक्षण विभागावरही पडला. यावर्षी प्रथमच पहिली ते नववीपर्यंत परीक्षा न होताच निकाल लागले. एवढेच नाही तर, शाळांना मार्च महिन्यामध्येच सुट्या लागल्या. सध्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये जिल्ह्यातील काही शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेश घेत आहेत, तर काही शाळांमध्ये विद्यार्थीच मिळत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देमुख्याध्यापकांना चिंता : शाळांत मर्यादेपेक्षा अतिरिक्त विद्यार्थ्यांना दिला जात आहे प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये काही शाळा अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देत असल्याने भविष्यात सोशल डिस्टन्सिंगअभावी धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यावर्षी केंद्रीय पद्धतीने शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवावी, जेनेकरून विद्यार्थी संख्या मर्यादित राहिल तसेच अन्य शाळांनाही विद्यार्थी मिळेल, अशी मागणी जिल्ह्यातील काही मुख्याध्यापकांनी केली आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी तसेच शिक्षक संघटनांनाही निवेदन देण्यात आले आहे.कोरोनाचे संकट देशावर आले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. याचा परिणाम शिक्षण विभागावरही पडला. यावर्षी प्रथमच पहिली ते नववीपर्यंत परीक्षा न होताच निकाल लागले. एवढेच नाही तर, शाळांना मार्च महिन्यामध्येच सुट्या लागल्या. सध्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये जिल्ह्यातील काही शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेश घेत आहेत, तर काही शाळांमध्ये विद्यार्थीच मिळत नसल्याचे चित्र आहे. ज्या शाळांमध्ये अतिरित्त विद्यार्थी आहे त्या शाळांमध्ये कोरोनाच्या दहशतीत सोशल डिस्टन्सिंग पाळणे कठीण जाणार आहे. तर ज्या शाळांना विद्यार्थीच मिळाले नाही, त्या शाळांतील शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केंद्रीय पद्धतीने शाळांत प्रवेश प्रक्रिया राबविण्याची मागणी सध्या जोर धरत आहे.शाळांसाठी सोशल डिस्टन्सिंगची डोकेदुखीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुरेशी मोकळी जागा असणे गरजेचे आहे. मात्र चंद्रपूरसह जिल्ह्यातील काही शाळांमध्ये मोकळे मैदानच नसल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थीसध्या विविध शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये वाट्टेल तेवढ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. इयत्ता पहिली,पाचवी तसेच इतर वर्गांसाठी प्रवेश देताना विद्यार्थी संख्या मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षण विभागाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.काही शाळांना विद्यार्थीच नाहीजिल्ह्यातील काही शाळा विद्यार्थ्यांना विविध आमिष दाखवित आहे. त्यामुळे या शाळांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. तर दुसरीकडे काही शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शाळा कशा चालवायच्या, असा प्रश्न सध्या संस्थाप्रमुख तसेच शिक्षकांना पडला आहे.एका बेंचवर एकच विद्यार्थी बसण्याची व्यवस्था करावीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी बसण्याची व्यवस्था वेगळी करणे आवश्यक आहे. जर प्रत्येक बाकावर एक प्रमाणे विद्यार्थी बसविले तर कोरोनाचे संकट काही प्रमाणात टाळता येणे शक्य आहे.केंद्रीय पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास सोशल डिस्टन्सिंग पाळून भविष्यातील धोके टाळता येईल. त्यामुळे शिक्षण विभागाने यावर विचार करून प्रत्येक शाळांतील तसेच वर्गातील विद्यार्थी मर्यादा ठरवून देणे गरजेचे आहे.- हरिहर भांडवलकरप्राचार्य, न्यू इंग्लिश हायस्कूल, चंद्रपूरकाही मुख्याध्यापकांनी आपल्याकडे यासंदर्भात निवेदन दिले आहे. मात्र शासनस्तरावर अजूनपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.-संजय डोर्लीकरशिक्षणाधिकारी, माध्यमिक

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा