शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

चंद्रपूर जिल्ह्याला धानाच्या बोनससाठी नऊ कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:19 IST

नागभीड : एकदाची धानाच्या बोनसची रक्कम चंद्रपूर जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. बोनसची ही रक्कम ८ कोटी ९२ लाख ५ ...

नागभीड : एकदाची धानाच्या बोनसची रक्कम चंद्रपूर जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. बोनसची ही रक्कम ८ कोटी ९२ लाख ५ हजार २८५ रुपये आहे. हे बोनस लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. मात्र हे बोनस शेतकऱ्यांना ५० टक्केच मिळणार आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांना दुधाची तहान ताकावर भागवावी लागणार आहे.

हंगाम तोंडावर आला आहे. मात्र विक्री केलेल्या धानाच्या बोनसची रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकरी वर्गात अस्वस्थता आहे. रोवणीला सुरुवात होत असल्याने शेतकऱ्यांना खत, ट्रॕॅक्टर भाडे, रोवणीची मजुरी आदी बाबींसाठी पैशांची नितांत गरज आहे. म्हणून शासनाने धानाच्या बोनसचे त्वरित वितरण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात होती. माध्यमातून शेतकऱ्यांची ही अस्वस्थता व्यक्त झाल्यानंतर शासनाने बोनसची निम्मी रक्कम देण्याचे मान्य केले.

चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या चिमूर २८ आणि गोंडपिपरी प्रकल्पात ४ अशा ३२ आदिवासी सोसायट्यांमार्फत यावर्षी ९ हजार ५१३ शेतकऱ्यांकडून २ लाख ६१ हजार ७१६ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. या शेतकऱ्यांना त्यांच्या धानाची देयके देण्यात आली असली तरी या शेतकऱ्यांना या खरेदीपोटी १८ कोटी ३२ लाख १ हजार रुपये बोनस रक्कम शासनाकडून देय आहे. मात्र यापैकी ८ हजार ५७२ शेतकरी बोनससाठी पात्र ठरले असून या शेतकऱ्यांसाठी सध्या ८ कोटी ९२ लाख ५ हजार २८५ रुपये प्राप्त झाले असल्याची माहिती चिमूरचे प्रकल्प व्यवस्थापक जी. आर. राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असेही राठोड म्हणाले.

चिमूर आदिवासी प्रकल्पात नागभीड, चिमूर, सिंदेवाही, भद्रावती व वरोरा तालुक्यांचा समावेश आहे. मात्र, नागभीड, सिंदेवाही व चिमूर या तालुक्यांतच धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येते. त्यानंतर शेतकरी धान विक्रीला सोसायट्यांमध्ये आणतात. दोन वर्षापूर्वी शासनाने आदिवासी विविध कार्यकारी सोसायट्यांना खरेदीचे अधिकार दिले. सोसायट्यांकडून हमीभाव १८६८ रुपये अधिक ५०० बोनस व सानुग्रह अनुदान २०० रुपये दिला जातो. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांनी आदिवासी महामंडळाच्या केंद्राकडे धान विक्री केली आहे.