शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

त्या अपहरण नाट्यात पोलिसांचीच भूमिका संशयास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 05:00 IST

संबंधित विद्यार्थिनी दहाव्या वर्गात आहे. गुरुवारी ती शाळेत जायला निघाली. जांभूळघाट बस स्थनकापासून तिची शाळा काही अंतरावर आहे. शाळेला लागून वस्ती आहे. तो मार्गही रहदारीचा आहे. याच मार्गावर रस्त्यात अज्ञात टाटा सुमो आडवी करून गाडीतील दोन पुरुष व महिलेने कोरोनाची लस घेतली का म्हणून गाडी थांबवतात. मुलीचा हात पकडतात.

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : जांभूळघाट येथील एका विद्यार्थिनीला गुरुवारी सकाळी अज्ञात टाटा सुमोतील व्यक्तीने रस्त्यात अडवून कोरोनाची लस द्यायची आहे म्हणून थांबविले. हा गैरप्रकार तिच्या लक्षात येताच त्या व्यक्तींना झटका मारून तिने पळ काढला. याविषयीचे वृत्त प्रकाशित होताच सर्वत्र खळबळ उडाली. आधी असेच बयाण पीडित मुलीने व कुटुंबीयांनीही दिले. नंतर पोलिसांनी त्यांना विचारपूस करण्यासाठी नेल्यानंतर हे बयाण अचानक बदलले. आता पोलीस असा प्रकार घडलाच नाही, असे सांगत आहे. मात्र गावकरी व पीडित कुटुंबीयांच्या आधीच्या सांगण्यावरून असा प्रकार घडला असावा, असे दिसते. या प्रकरणातील सत्यता समोर येण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आता या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.संबंधित विद्यार्थिनी दहाव्या वर्गात आहे. गुरुवारी ती शाळेत जायला निघाली. जांभूळघाट बस स्थनकापासून तिची शाळा काही अंतरावर आहे. शाळेला लागून वस्ती आहे. तो मार्गही रहदारीचा आहे. याच मार्गावर रस्त्यात अज्ञात टाटा सुमो आडवी करून गाडीतील दोन पुरुष व महिलेने कोरोनाची लस घेतली का म्हणून गाडी थांबवतात. मुलीचा हात पकडतात. मात्र इंजेक्शन देत असताना झटका मारून मुलगी पळ काढते. त्यानंतर ती टाका सुमो सुसाट वेगाने पुढे जाते. ही बाब गावात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर खुद्द आरोग्य विभागाच पोलिसात तक्रार करतो. असा प्रकार गुरुवारी घडला. या प्रकारानंतर पोलिसांनी संबंधित मुलगी व तिच्या कुटुंबातील सदस्यांना विचारपूस करण्यासाठी आपल्यासोबत भिसी येथे नेले. मात्र पीडित मुलीच्या आजोबांनी आम्हाला भिसी येथे नेलेच नसल्याचे सांगितले. अर्ध्या रस्त्यातूनच आम्हाला परत गावी आणल्याचेही त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले. याचाच अर्थ पोलिसांनी त्यांचे बयाण रस्त्यातच नोंदविले. मात्र पोलीस सांगत असलेल्या बयाणात आणि आधीच्या बयाणात तफावत दिसत असल्याने पोलिसांचीच भूमिका या प्रकरणात संशयास्पद दिसून येत आहे. विशेष म्हणजे, पीडित मुलीला, तिच्या आईला व आजोबाला पोलीस वाहनातून नेत असताना तिथे महिला पोलीस कर्मचारीदेखील नव्हती, अशीही माहिती आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे गेले कुठे?गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी भिसी, शंकरपूर, खडसंगी, जांभूळघाट गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मात्र यातील किती कॅमरे सुरू आहेत, हे माहीत नाही. हे कॅमेरे सुरू असल्यास संबंधित टाटा सुमो येताना किंवा पळताना निश्चितच या कॅमेऱ्यात येऊ शकेल.

संबंधित विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांचे बयाण नोंदविण्यात आले आहे. यामध्ये असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे त्यांनी कबूल केले. त्यामुळे गुन्हा नोंद करण्याची आवश्यकता नाही. शुक्रवारी जांभूळघाट येथे सर्चिंग ऑफरेशन राबविण्यात आले. जिथे प्रकार घडला त्या परिसरात नागरिकांची विचारपूस केली असता असा प्रकार घडला नसून या मार्गाने कोणतीही गाडी त्यावेळी गेली नसल्याचे नागरिकांनी सांगितले.- प्रकाश राऊत, ठाणेदार,पोलीस स्टेशन, भिसी.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस