शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

संततधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 01:01 IST

उशिरा आगमन झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असतानाच मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले तुंडुंब भरले आहेत. दरम्यान, मागील पंधरा दिवसांपासून सूर्यनारायणाचे दर्शनच झाले नाही. परिणामी शेतपिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव वाढला आहे. तर दुसरीकडे धान रोवणीच्या कामाला वेग आला आहे.

ठळक मुद्देधान रोवणीला वेग : जिल्ह्यात सरासरी ६६१ मि.मी. पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उशिरा आगमन झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असतानाच मागील काही दिवसांपासून कोसळणाºया पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले तुंडुंब भरले आहेत. दरम्यान, मागील पंधरा दिवसांपासून सूर्यनारायणाचे दर्शनच झाले नाही. परिणामी शेतपिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव वाढला आहे. तर दुसरीकडे धान रोवणीच्या कामाला वेग आला आहे. बुधवारपर्यंत जिल्ह्यात ६६१.५५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली.यावर्षी जून महिन्यामध्ये पावसाने हूलकावणी दिल्याने कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढवले. तर धान उत्पादक शेतकऱ्यांनाही रोवणीसाठी आवश्यक असलेला पाऊस वेळेत आला नसल्याने रोवण्या लांबणीवर गेल्या. दरम्यान, जूलै महिन्यामध्ये पुन्हा पावसाने मोठी विश्रांती घेतल्यामुळे अंकुरलेले पिके कोमेजली. त्यानंतर गावागावांत वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी पुजाअर्चनाही करण्यात आली. मात्र पावसाची विश्रांती दीर्घकालीन ठरल्याने अनेक शेतकऱ्यांचे शेतातील पिके करपली. दरम्यान, मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. सततच्या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. बुधवारपर्यंत जिल्ह्यात ६६१.५५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. मागील वर्षीय ७ आॅगस्टपर्यंत ७४७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. दरम्यान पावसाची अशीच रिपरीप सुरुच राहिल्यास जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासाजिल्ह्यातील सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, मूल, नागभीड, पोंभूर्णा आदी तालुक्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे. यावर्षी पावसाने प्रथम हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र मागील पंधरा दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे रोवणीसाठी आवश्यक असलेला पाऊस कोसळल्यामुळे आता रोवणीच्या कामाला वेग आला आहे. दोन पाळ्यांमध्ये रोवणीचे काम सध्या सुरु असून सकाळी ६ ते ११ आणि १० ते ५ वाजेपर्यंत रोवणी केली जात आहे. दरम्यान, मजुरीही काही प्रमाणात वाढली आहे.नदी-नाल्यांना पूरमागील काही दिवसांपासुन सुरु असलेल्या पावसामुळे नदी-नाले दुथळी भरून वाहत आहे. इरई धरणातील जलसाठा वाढल्यामुळे शनिवारी सातही दरवाज्यांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला.कापूस, सोयाबीन पिकांवर रोगांचा प्रादुर्भावप्रथम दीर्घ विश्रांती आणि त्यानंतर सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कापूस, सोयाबीन, तूर पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेने वातावरण आहे. सततच्या पावसामुळे शेतातील कामावरही परिणाम झाला आहे. ढगाळी वातावरणामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. दोन वर्षापूर्वी लष्कळी अळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. यावर्षीसुद्धा पिकांवर प्रादूर्भाव होऊ शकेल, असेच वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन पिकांची पाहणी केली आहे. यावेळी त्यांना विविध रोगांची प्राथमिक लक्षणे आढळल्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सोबतच विविध औषधांची फवारणी करण्याचे आवाहनही केले आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर