शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

संततधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 01:01 IST

उशिरा आगमन झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असतानाच मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले तुंडुंब भरले आहेत. दरम्यान, मागील पंधरा दिवसांपासून सूर्यनारायणाचे दर्शनच झाले नाही. परिणामी शेतपिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव वाढला आहे. तर दुसरीकडे धान रोवणीच्या कामाला वेग आला आहे.

ठळक मुद्देधान रोवणीला वेग : जिल्ह्यात सरासरी ६६१ मि.मी. पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उशिरा आगमन झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असतानाच मागील काही दिवसांपासून कोसळणाºया पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले तुंडुंब भरले आहेत. दरम्यान, मागील पंधरा दिवसांपासून सूर्यनारायणाचे दर्शनच झाले नाही. परिणामी शेतपिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव वाढला आहे. तर दुसरीकडे धान रोवणीच्या कामाला वेग आला आहे. बुधवारपर्यंत जिल्ह्यात ६६१.५५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली.यावर्षी जून महिन्यामध्ये पावसाने हूलकावणी दिल्याने कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढवले. तर धान उत्पादक शेतकऱ्यांनाही रोवणीसाठी आवश्यक असलेला पाऊस वेळेत आला नसल्याने रोवण्या लांबणीवर गेल्या. दरम्यान, जूलै महिन्यामध्ये पुन्हा पावसाने मोठी विश्रांती घेतल्यामुळे अंकुरलेले पिके कोमेजली. त्यानंतर गावागावांत वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी पुजाअर्चनाही करण्यात आली. मात्र पावसाची विश्रांती दीर्घकालीन ठरल्याने अनेक शेतकऱ्यांचे शेतातील पिके करपली. दरम्यान, मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. सततच्या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. बुधवारपर्यंत जिल्ह्यात ६६१.५५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. मागील वर्षीय ७ आॅगस्टपर्यंत ७४७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. दरम्यान पावसाची अशीच रिपरीप सुरुच राहिल्यास जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासाजिल्ह्यातील सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, मूल, नागभीड, पोंभूर्णा आदी तालुक्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे. यावर्षी पावसाने प्रथम हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र मागील पंधरा दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे रोवणीसाठी आवश्यक असलेला पाऊस कोसळल्यामुळे आता रोवणीच्या कामाला वेग आला आहे. दोन पाळ्यांमध्ये रोवणीचे काम सध्या सुरु असून सकाळी ६ ते ११ आणि १० ते ५ वाजेपर्यंत रोवणी केली जात आहे. दरम्यान, मजुरीही काही प्रमाणात वाढली आहे.नदी-नाल्यांना पूरमागील काही दिवसांपासुन सुरु असलेल्या पावसामुळे नदी-नाले दुथळी भरून वाहत आहे. इरई धरणातील जलसाठा वाढल्यामुळे शनिवारी सातही दरवाज्यांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला.कापूस, सोयाबीन पिकांवर रोगांचा प्रादुर्भावप्रथम दीर्घ विश्रांती आणि त्यानंतर सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कापूस, सोयाबीन, तूर पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेने वातावरण आहे. सततच्या पावसामुळे शेतातील कामावरही परिणाम झाला आहे. ढगाळी वातावरणामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. दोन वर्षापूर्वी लष्कळी अळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. यावर्षीसुद्धा पिकांवर प्रादूर्भाव होऊ शकेल, असेच वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन पिकांची पाहणी केली आहे. यावेळी त्यांना विविध रोगांची प्राथमिक लक्षणे आढळल्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सोबतच विविध औषधांची फवारणी करण्याचे आवाहनही केले आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर