शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

अंधारी नदीचे पात्र कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:53 IST

अंधारी नदीचे पात्र फेब्रुवारी महिन्यांमध्येच कोरडे पडले आहे. परिणामी स्थानिक नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दरवर्षी पाणी टंचाईवर मात करण्याकरिता पुरक अशी कुठलीही उपाययोजना प्रशासनाकडून होत नसल्याने महिलांमध्ये स्थानिक प्रशासनाविरोधात तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता : उपाययोजना करणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : अंधारी नदीचे पात्र फेब्रुवारी महिन्यांमध्येच कोरडे पडले आहे. परिणामी स्थानिक नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दरवर्षी पाणी टंचाईवर मात करण्याकरिता पुरक अशी कुठलीही उपाययोजना प्रशासनाकडून होत नसल्याने महिलांमध्ये स्थानिक प्रशासनाविरोधात तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द या गावाला ग्रामीण पाणी पुरवठा योजने अंतर्गत अंधारी नदीचे पात्रातून नळाद्वारे पाणी दिले जाते. गावात व जवळच्या परिसरात पाण्याचे स्त्रोत फार खोलवर असल्याने मार्च-एप्रिल महिन्यातच हॅन्डपंप व विहिरी कोरड्या पडत असतात. दरवर्षी अंधारी नदीचे पाणी एप्रिल-मे महिन्यापर्यंत पुरत होते. परंतु, यावर्षी अंधारी नदी फेब्रुवारी महिन्यातच कोरडी पडली असल्याने देवाडा खुर्द वासियांना नळाद्वारे पाणी मिळणे दुरापास्त होणार चिन्हे दिसून येत असून भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.दरवषी येथील नागरिक शेतशिवारातील विहिर व तलावाचे पाणी बैलबंडीद्वारे किंवा दोर- बादलीच्या सहय्याने खोलवर विहिरीचे पाणी काढून तहाण भागवावी लागते. त्यामुळे उन्हाळ्यात विहिरीवर पाण्यासाठी गर्दी होत असते. अनेक महिला तर रात्रीच्या वेळी झोपमोळ करुन पाणी भरत असतात. याबाबत स्थानिक प्रशासनाला माहिती होत असूनही कुठलीच पर्यायी व्यवस्था होत नसल्याने नागरिकांत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने गांभीर्यान लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.पाण्यासाठी बंधाऱ्याचा वापरदेवाडा खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत अंधारी नदीच्या पात्रात सिमेंट पिशवीद्वारे बंधारा बांधण्यात आला असून या बंधाऱ्यातील पाणी नळाद्वारे देण्यात येत आहे. हे पाणी काही दिवसातच संपणार असल्याचे बोलले जात आहे.