शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या महामारीत राईसमिल संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:01 IST

देशभरातून तांदूळ निर्यातीत १५ टक्के वाटा पूर्व विदर्भाचा आहे. तेथे धानातून तांदूळ निर्माण केले जाते. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचांदूर, चंद्रपूर जिल्ह्यात धान पिकावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. ९५ टक्के शेतकऱ्यांच्या घरातील चुल धान पिकांवर पेटते. जयश्रीराम एचएमटी, सोनालिका, पारस, आयआर ३६ या धानाची लागवड परिसरात केली जाते.

ठळक मुद्देकर्जाचा डोंगर वाढला : वीज बिलाने व्यवसाय डबघाईस

रवी रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : शेतकऱ्यांना चांगले उत्पादन झाले तर राईसमिलला चांगले दिवस येतात. परंतु कोरोनाच्या महामारीत सध्या राईसमिल संकटात सापडल्या आहे. राईस मिल मालकांवर कर्जाचे डोंगर वाढत असून अवाढव्य वीज बिलाने व्यवसाय डबघाईस आला आहे.देशभरातून तांदूळ निर्यातीत १५ टक्के वाटा पूर्व विदर्भाचा आहे. तेथे धानातून तांदूळ निर्माण केले जाते. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचांदूर, चंद्रपूर जिल्ह्यात धान पिकावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. ९५ टक्के शेतकऱ्यांच्या घरातील चुल धान पिकांवर पेटते. जयश्रीराम एचएमटी, सोनालिका, पारस, आयआर ३६ या धानाची लागवड परिसरात केली जाते.चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने राईसमिल आहेत. यापैकी ब्रम्हपुरी नागभीड, सिंदेवाही, मूल या पट्ट्यात राईस मिलची संख्या सर्वाधिक आहे. मागील पाच महिन्यांपासून कोरोनाचे वादळ आल्याने याचा फटका राईसमिल व्यवसायाला बसला आहे. मजूर वर्गाशिवाय कोणत्याही व्यवसायाचा विकास होत नाही. कोरोनाच्या महामारीने सुरूवातीला व दरम्यानच्या काळात मजूर वर्ग बाहेर गेल्याने भात उत्पादनावर काही काळ मोठा फरक पडला. त्याचप्रमाणे शासनाने मोफत दरात मजुरवर्गांना तांदूळ, गहू दिल्यामुळे याचाही फटका या उद्योगाला बसला. कोरोनाच्या संकटात राईसमिल जीवनावश्यक वर्गात येत असल्याने सुरू होत्या. परंतु उत्पादित झालेला माल मात्र लॉकडाऊनमुळे बाहेर गेलाच नसल्याने राईसमिल मालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. राईसमिल उद्योगाचे भवितव्य उत्पादित झालेल्या मालाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळामध्ये झालेल्या आर्थिक कोंडीमुळे व्यवसाय चालविणे कठीण झाले आहे.कुकुस स्थिरावला, मात्र कोंढ्याचे भाव घसरलेलॉकडाऊ नच्या काळात कुकुसाला भाव होता. तो आजही कायम आहे. कुकुसाला स्थानिक नागरिकांकडूनही मोठी मागणी आहे. नागपूर, आंध्रप्रदेश व छत्तीसगढ येथे ऑइस फ्लॅक्टीमध्ये कुकुसची मागणी आहे. कोंढ्याचे दर मात्र, घसरले आहे. कोढ्यांची मागणी करणारे पॉवर प्लॅन्ट लॉकडाऊनमध्ये बंद होते. बहुतांश पॉवर प्लॅन्टची मुदत वाढवून न दिल्याने कोंढ्याच्या मागणीत घसरण झाली.त्याचाही फटका या उद्योगाला बसला आहे.लॉकडाऊ नमुळे निर्यातीवरही परिणामजिल्ह्यातील तांदूळ देशात वितरीत होते. परंतु सततच्या लॉकडाऊ नमुळे निर्यातीवर मोठा परिणाम पडला आहे. सध्या १५ ते २० टक्क््यांवर हा व्यवसाय आला आहे. उष्ण तांदूळ ७ ते ८ विदेशात जातो. त्यावरही परिणाम पडला आहे.बँकांनी २० टक्के कॅश के्रटीड वाढवून दिली आहे. परंतु ते उपयोगाचे नाही. त्याऐवजी व्याजाचा दर कमी केल्यास व्यवसायात वृध्दी होऊ शकते. तशी विनंती राईसमिल असोशिएनकडून करण्यात आली.