शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

२२६ वनहक्क प्रकरणांची पुनर्विलोकन प्रक्रिया रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 12:55 IST

सद्यस्थितीत २२६ पीक कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत. पुराव्यांची पुर्तता केल्यानंतर जिल्हा समितीने पुनर्विलोकनाचीही तयारी केली. परंतु, लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया रखडल्याने आदिवासी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा फटकाखरीप हंगामासाठी कर्ज मिळण्याचे मार्ग बंद

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्काची मान्यता) अधिनियम अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील २२६ दाव्यांची तहसील व उपविभागीय समितीने पडताळणी केल्यानंतर त्रुटी आढळल्या होत्या. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर जिल्हा समितीने पुनर्विलोकनाला मंजुरी दिली होती. मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया रखडल्याने मालकी हक्काअभावी आदिवासी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बँकेकडून पीक कर्ज घेण्याचे मार्ग बंद झाले आहेत.अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियम २००६ व नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२ नुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासींनी कलम ३ (१) नुसार चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ४ हजार १२ वैयक्तिक दाव्यांना जिल्हा समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे ४ हजार ९६१. ८१ हेक्टर जमिनीवर शेतकऱ्यांना शेती करण्याचा अधिकार मिळाला. यामध्ये चंद्रपूर उपविभागात १५२.४२ हेक्टर, बल्लारपूर २९३.४१, मूल ११२.०८, गोंडपिपरी ४१८.७८, वरोरा ३३५.०८, चिमूर ३८९.२२ , ब्रह्मपुरी ४३१.५३ आणि राजुरा उपविभागात सर्वाधिक २८२९.२९ हेक्टर जमिनीचा समावेश आहे. तालुका, उपविभाग आणि जिल्हा समितीने प्रलंबित वनहक्क दावे मंजूर करण्यासाठी जनरेट्यामुळे लक्ष दिल्याने लाभार्थ्यांना सदर जमिनीचा सातबाराही वाटप करण्यात आला. २८२९.२९ हेक्टर जमीन ताब्यात असणाऱ्या वनहक्क लाभार्थ्यांकडून कुणालाही हस्तांतरीत करता येत नाही. शिवाय, सातबारावर शासकीय विभागाचा उल्लेख असल्याने गतवर्षी खरीप हंगामादरम्यान राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांनी पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली. शेतकऱ्यांनी हा प्रकार जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्याने जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी वनहक्क दावे मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची अडवणूक न करता तात्काळ पीक कर्ज देण्याचे निर्देश जारी केले. परिणामी, शेकडो शेतकऱ्यांना मागील हंगामात पीक कर्ज घेता आले. सद्यस्थितीत २२६ प्रकरणे प्रलंबित आहेत. पुराव्यांची पुर्तता केल्यानंतर जिल्हा समितीने पुनर्विलोकनाचीही तयारी केली. परंतु, लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया रखडल्याने आदिवासी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.विभागीय आयुक्तांकडे मागता येणार दादभारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचीतील प्राप्त अधिकारांचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १८ मे २०२१ रोजी एका अधिसूचनेद्वारे वनहक्क कायद्याच्या कलम ६ मध्ये सुधारणा केली. त्यानुसार जिल्हा समितीने दावा नामंजूर केल्यास आता विभागीय आयुक्तांकडे पेसा क्षेत्रातील आदिवासींना दाद मागता येणार आहे. यापूर्वी तालुका, उपविभाग व जिल्हा समिती अशी त्रिस्तरीय रचना होती. या समित्यांनी दावा फेटाळल्यास दाद मागण्याचा मार्गच बंद करण्यात आला होता.

टॅग्स :agricultureशेती