शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

वनांचे रक्षण करणे सर्वांचीच जबाबदारी - आक्केवार

By admin | Updated: November 10, 2015 01:37 IST

मानवी जीवन सुखी राहण्यासाठी वनाची नितांत गरज आहे. असलेले वन अतिक्रमणासाठी व इतर कामासाठी तोडल्या जात आहे.

शंकरपूर : मानवी जीवन सुखी राहण्यासाठी वनाची नितांत गरज आहे. असलेले वन अतिक्रमणासाठी व इतर कामासाठी तोडल्या जात आहे. वनच जर नसेल तर या पृथ्वीतलावर मानवी जीवन राहणार नाही. त्यामुळे वनाचे रक्षण करणे सर्वांचीच जवाबदारी आहे, असे प्रतिपादन चिमूरचे वनपरिक्षेत्राधिकारी के.आर. आक्केवार यांनी केले.ते शंकरपूर जवळील चकजाटेपार येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्यावतीने शुक्रवारी आयोजित सभेत बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून तरुण पर्यावरणवादी मंडळ शंकरपूरचे अमोद गौरकर, वनपाल एस.डी. डांगे चकजाटेपवार संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय नागोसे, डोंगरगावचे मनोहर राणे, सरपंच लिला राणे, वनरक्षक भवने, जयदेव मून आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी श्रमदानातून गावालगत असलेल्या झुडपी जंगलातील झाडांची छाटणी केली. गावातील जनतेने वन व वन्यप्राण्यांचे रक्षण करणे व वन जागेवर अतिक्रमण करणार नाही याची जवाबदारी त्यांनी स्वीकारली.कार्यक्रमाचे संचालन व आभार वनरक्षक भवरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण गावकऱ्यांनी प्रयत्न केले. (वार्ताहर)