शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 23:53 IST

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे चंद्रपूर-मूल महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. या कामादरम्यान चंद्रपूरला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. यामुळे मंगळवारी शहरातील बहुतांश भागातील पाणी पुरवठा ठप्प होता. दरम्यान, मनपाचे अधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी २१ तास युध्दस्तरावर दुरुस्तीचे काम करून काही भागातील पाणी पुरवठा सुरू केला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे चंद्रपूर-मूल महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. या कामादरम्यान चंद्रपूरला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. यामुळे मंगळवारी शहरातील बहुतांश भागातील पाणी पुरवठा ठप्प होता. दरम्यान, मनपाचे अधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी २१ तास युध्दस्तरावर दुरुस्तीचे काम करून काही भागातील पाणी पुरवठा सुरू केला. मात्र शहरातील इतर भागातील पाणी पुरवठा पूर्ववत होण्यास आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.आधीच चंद्रपूरकर पाणी टंचाईने त्रस्त आहेत. अशातच आता ही समस्या उदभवल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे सावरकर चौक ते बंगाली कॅम्प (मूल रोड) येथील रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरु आहे याच भागातून चंद्रपूर शहर महानगरपालिकेची तुकूम जलशुद्धीकरण केंद्र ते बाबुपेठ येथील पाणीपुरवठा करणारी ५०० एमएम व्यासाची जलवाहिनी गेली आहे. सोमवारी चंद्रपूर-मूल महामार्गाचे बांधकाम सुरू असताना शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईनच जेसीबीने विस्कळीत करण्यात आली. त्यामुळे शहरातील अनेक भागातील पाणी पुरवठा करण्यासाठी जमा होणारे पाणी टाकीत जमा झाले नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी याची माहिती महानगरपालिकेला सोमवारी दिली नाही. मंगळवारी सकाळी टाकीत पाणी जमा न झाल्याचे दिसून आले. त्यानंतर पाईपलाईन फुटल्याचे मनपा अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. माहिती मिळताच महापौर अंजली घोटेकर, आयुक्त संजय काकडे, उपायुक्त विजय देवळीकर, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता महेश बारई, अभियंता विजय बोरीकर व उज्ज्वल कन्स्ट्रक्शनचे योगेश समरीत हे घटनास्थळी गेले. पाण्याची टंचाई लक्षात घेत तत्काळ दुरुस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली. तब्बल सतत २१ तास हे काम करण्यात आले. त्यामुळे पाण्याच्या टाकीत पाणी पोहचले. यामुळे बुधवारी काही भागात पाणी पुरवठा होऊ शकला. संपूर्ण भागातील पाणी पुरवठा सुरुळीत होण्यास आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.दूषित पाण्याचा पुरवठासोमवारी पाईपलाईन फुटल्यानंतर मंगळवारी युध्दस्तरावर दुरुस्तीचे काम करण्यात आले. त्यानंतर बुधवारी टाकीत पाणी तर पोहचले. मात्र बांधकामातील माती या पाईपलाईनमध्ये गेल्याने हे पाणी दूषित झाले. दरम्यान, बुधवारी सकाळी वॉर्डांमध्ये पाणी पुरवठा केल्यानंतर बराच वेळ दूषित व लालसर पाणी आले. तुकूम प्रभागात २०-२५ मिनिटे नळाद्वारे पाणी आले. मात्र दूषित पाणी आल्याचे नगरसेवक सुरेश पचारे यांनी सांगितले.पाईपलाईन फुटल्याचे माहीत झाल्यानंतर दुरुस्तीचे काम युध्दस्तरावर करण्यात आले. रात्री ३ वाजेपर्यंत हे काम सतत सुरू राहिले. त्यानंतर टाकीत पाणी पोहचले. त्यामुळे बुधवारी सकाळी काही भागात पाणी पुरवठा करण्यात आला.- महेश बारई,मुख्य अभियंता, बांधकाम विभाग, मनपा.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई