शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वीज खांब हटविण्याचे काम अडगळीत

By admin | Updated: April 20, 2015 01:14 IST

शहरातील अनेक रस्त्यांच्या मधोमध वीज खांब उभे असल्याने या खांबामुळे शहरात अपघात वाढून वाहतुकीची कोंडी होत आहे.

वरोरा : शहरातील अनेक रस्त्यांच्या मधोमध वीज खांब उभे असल्याने या खांबामुळे शहरात अपघात वाढून वाहतुकीची कोंडी होत आहे. हे वीज खांब हटविण्याकरिता जिल्हा नियोजन समितीने ४२ लाखांचा निधी दिला. परंतु वीज खांब हटविण्याचे काम मागील दोन वर्षापासून रेंगाळले आहे. परिणामी आजही वरोरा शहरातून दुचाकी व चारचाकी वाहन घेऊन जाताना रस्त्यावरील वीज खांबाचा सामना करावा लागत आहे.वरोरा शहरातील प्रभाग-१ पोलीस ठाणे ते रेल्वे पूल, प्रभाग दोन मध्ये जाजू हॉस्पिटल ते पोलीस ठाणे, जिल्हा सहकारी बँक ते माढेळी रोड, पाण्याची टाकी ते जुने बसस्थानक, वणी नाका बायपास, विश्रामगृह ते रेल्वे पूल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते माढेळी रोड, शिवाजी चौक ते विश्रामगृहापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर एल.टी. लाईन व ११ केव्हीचे वीज खांब रस्त्याच्या मधोमध उभे आहेत. यामध्ये काही रोहीत्रांचाही समावेश आहे. शहरातील मुख्य मार्गावर विद्युत पोल असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. रात्रीच्या वेळी या खांबांवर वाहने आदळून अपघात होत आहेत. अनेकदा या खांबांना जडवाहनांची धडक बसली. त्यामुळे खांबावरील वीज तारा तुटून तासन्तास विद्युत पुरवठा खंडीत होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. याबाबत वरोरा नगरपालिकेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वीज खांब हटविण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेतला. तत्कालिन पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नही केले. त्यानंतर सन २०१२-२०१३ मध्ये जिल्हा नियोजन समितीमध्ये मान्यता मिळून एलटी लाईन व ११ केव्ही लाईनचे वीज खांब हटविण्यासाठी ४२ लाख रुपये मंजूर करण्यात आले. या कामाचा प्रस्ताव व अंदाजपत्रक तयार करुन नगरपालिकेच्यावतीने २४ एप्रिल २०१३ रोजी तांत्रिक मंजुरीसाठी तो प्रस्ताव महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याकडे पाठविण्यात आला. त्यानंतर वीज वितरण कंपनीकडे न.प.ने पत्र व्यवहार केला. या कामासाठी एक वर्षापूर्वी निविदा काढून कंत्राटदाराला वर्कआॅर्डर देण्यात आली. परंतु दोन वर्षांचा कालावधी लोटूनही वरोरा शहरातील विद्युत खांब हटविण्याच्या कामाला आजपर्यंत सुरुवात करण्यात आली नाही. नगरपालिका प्रशासनाने पत्रव्यवहार व ेनिविदा काढीत कंत्राटदारांची नेमणूक केल्यानंतरही अशा कामात विलंब होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)