शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

वीज खांब हटविण्याचे काम अडगळीत

By admin | Updated: April 20, 2015 01:14 IST

शहरातील अनेक रस्त्यांच्या मधोमध वीज खांब उभे असल्याने या खांबामुळे शहरात अपघात वाढून वाहतुकीची कोंडी होत आहे.

वरोरा : शहरातील अनेक रस्त्यांच्या मधोमध वीज खांब उभे असल्याने या खांबामुळे शहरात अपघात वाढून वाहतुकीची कोंडी होत आहे. हे वीज खांब हटविण्याकरिता जिल्हा नियोजन समितीने ४२ लाखांचा निधी दिला. परंतु वीज खांब हटविण्याचे काम मागील दोन वर्षापासून रेंगाळले आहे. परिणामी आजही वरोरा शहरातून दुचाकी व चारचाकी वाहन घेऊन जाताना रस्त्यावरील वीज खांबाचा सामना करावा लागत आहे.वरोरा शहरातील प्रभाग-१ पोलीस ठाणे ते रेल्वे पूल, प्रभाग दोन मध्ये जाजू हॉस्पिटल ते पोलीस ठाणे, जिल्हा सहकारी बँक ते माढेळी रोड, पाण्याची टाकी ते जुने बसस्थानक, वणी नाका बायपास, विश्रामगृह ते रेल्वे पूल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते माढेळी रोड, शिवाजी चौक ते विश्रामगृहापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर एल.टी. लाईन व ११ केव्हीचे वीज खांब रस्त्याच्या मधोमध उभे आहेत. यामध्ये काही रोहीत्रांचाही समावेश आहे. शहरातील मुख्य मार्गावर विद्युत पोल असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. रात्रीच्या वेळी या खांबांवर वाहने आदळून अपघात होत आहेत. अनेकदा या खांबांना जडवाहनांची धडक बसली. त्यामुळे खांबावरील वीज तारा तुटून तासन्तास विद्युत पुरवठा खंडीत होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. याबाबत वरोरा नगरपालिकेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वीज खांब हटविण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेतला. तत्कालिन पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नही केले. त्यानंतर सन २०१२-२०१३ मध्ये जिल्हा नियोजन समितीमध्ये मान्यता मिळून एलटी लाईन व ११ केव्ही लाईनचे वीज खांब हटविण्यासाठी ४२ लाख रुपये मंजूर करण्यात आले. या कामाचा प्रस्ताव व अंदाजपत्रक तयार करुन नगरपालिकेच्यावतीने २४ एप्रिल २०१३ रोजी तांत्रिक मंजुरीसाठी तो प्रस्ताव महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याकडे पाठविण्यात आला. त्यानंतर वीज वितरण कंपनीकडे न.प.ने पत्र व्यवहार केला. या कामासाठी एक वर्षापूर्वी निविदा काढून कंत्राटदाराला वर्कआॅर्डर देण्यात आली. परंतु दोन वर्षांचा कालावधी लोटूनही वरोरा शहरातील विद्युत खांब हटविण्याच्या कामाला आजपर्यंत सुरुवात करण्यात आली नाही. नगरपालिका प्रशासनाने पत्रव्यवहार व ेनिविदा काढीत कंत्राटदारांची नेमणूक केल्यानंतरही अशा कामात विलंब होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)