शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स जीओला विरोध वाढला

By admin | Updated: June 29, 2014 23:49 IST

नगरसेवकांना विश्वासात न घेता रिलायन्स जीओला ४ जी केबल टाकण्यासाठी परवानगी देणे महापौर व स्थायी समिती सभापतींना चांगले भोवले आहे. सत्तारुढ काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनीच याविरोधात बंड

आजची आमसभा गाजणार : ४ जुलैला बंदचे आवाहनचंद्रपूर: नगरसेवकांना विश्वासात न घेता रिलायन्स जीओला ४ जी केबल टाकण्यासाठी परवानगी देणे महापौर व स्थायी समिती सभापतींना चांगले भोवले आहे. सत्तारुढ काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनीच याविरोधात बंड पुकारले आहे. आता तर भाजपाने याला आपला विरोध दर्शविला असून ३० जूनच्या आमसभेत रिलायन्स जीओची परवानगी रद्द करावी, अशी आग्रही मागणी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी केली आहे. असे न केल्यास ४ जुलैला चंद्रपूर बंद ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे उद्याची आमसभा चांगलीच गाजणार, हे निश्चित झाले आहे.२९ मे रोजी झालेल्या आमसभेत १०० मोबाईल टॉवर्सना मंजुरी देण्यात आली. याशिवाय भूमिगत केबल व चेंबर टाकण्यासाठी रिलायन्स जीओ मंजुरी देण्यात आली. यामुळे शहरात पुन्हा नवीन झालेल्या रस्त्यांचे बारा वाजणार आहे. या मोबाईल टॉवर्समुळे जनतेच्या आरोग्याला व पशुपक्ष्यांच्या जिविताला धोका निर्माण होणार आहे. याशिवाय अनेक समस्याही निर्माण होणार आहे. असे असताना यावर सविस्तर चर्चा न करता घाईगर्दीत ठराव पारित करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवकांच्या वतीने प्रशांत दानव व महेंद्र जयस्वाल यांनी केला आहे. नगर अभियंता बारई यांनी सभेत याबाबत चुकीची माहिती दिली, असाही त्यांचा आरोप आहे. शहरात नवीन रस्ते पूर्णत्वास येत आहेत. त्यात भूमिगत केबल टाकण्यामुळे दर ३० मीटरवर एक चेंबर बांधले जाणार आहे. त्यामुळे १०० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या नवीन रस्त्यांची दुर्दशा होणार आहे.२७ मे रोजी नगरसेवकांची सभा झाली होती. या सभेला महापौरही उपस्थित होत्या. त्याचवेळी रिलायन्स जीओला खोदकाम करण्याची परवानगी देण्यात येऊ नये, असे ठरविण्यात आले. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत २९ मेच्या आमसभेत मनपाचे काही नगरसेवक, विरोधी पक्षाचे नगरसेवक व काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने मंजुरी देण्यात आली. वास्तविक महानगरपालिकेच्या नियमानुसार सभेमध्ये कोणताही ठराव मंजूर झाल्यानंतर दुसऱ्या आमसभेत त्यावर पुन्हा चर्चा करण्यात येते. या सभेत कोणाचा विरोध नाही, याची खात्री झाल्यानंतर तो ठराव मंजूर केला जातो. असे असताना ३० जून रोजी होणाऱ्या आमसभेची वाट न बघता रिलायन्स जीओकडून अतिशय घाईत धनादेश जमा करून घेतले व त्यांना कामाचे वर्कआॅर्डरसुध्दा दिले, असे दानव यांनी म्हटले आहे. रिलायन्स कंपनीनेही आपल्या धनशक्तीचा वापर करून शहरावासियांच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे. त्यामुळे हा ठराव उद्याच्या आमसभेत नामंजूर करावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)