शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

आमदारांना विश्वासात न घेणे ही मनमानीच !

By admin | Updated: June 7, 2015 01:13 IST

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू केली यासाठी आपला विरोध नाही. मात्र जिल्ह्यातील कुण्याही आमदरांना विश्वासात न घेता आणि दारूबंदी समितीच्या अहवालावर ....

धानोरकरांनी दर्शविला विरोध : दारूबंदी मुद्यावरून वित्तमंत्र्यांना घरचा अहेरचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू केली यासाठी आपला विरोध नाही. मात्र जिल्ह्यातील कुण्याही आमदरांना विश्वासात न घेता आणि दारूबंदी समितीच्या अहवालावर विधानसभेत जराही चर्चा न करता वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतला. आमदरानना विशफ्वासात न घेऊन जाहीर केलेला हा निर्णय म्हणजे मनमानीच आहे, अशी टीका शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून केली.जिल्ह्यातील दारूबंदी निर्णयाच्या विरोधात शिवसेना आमदार धानोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना पत्र लिहिले असून, दारूबंदीचा निर्णय योग्यपणे न झाल्याला वित्तमंत्र्यांना जबाबदार ठरविले आहे. ते म्हणाले, राज्य सरकारने वित्तमंत्र्यांच्या दबावाखाली हा निर्णय घेतला आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. मात्र जिल्ह्यातील कुण्याही आमदाराला यात विश्वासात घेण्याची गरज त्यांना वाटली नाही.दारूबंदीच्या निर्णयासाठी गठीत करण्यात आलेल्या देवतळे समितीकडून दारूबंदीची तीन टप्प्यात शिफारस केली होती. विधानसभेत या अहवालावर चर्चा होऊन निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र अहवालावर कसलीही चर्चा न करता राज्य सरकारने निर्णय जाहीर करून मनमानी चालविली आहे.आमदार बाळू धानोरकर म्हणाले, दारूबंदीला आपला विरोध नाही. दारूची सर्वाधिक समस्या ग्रामीण भागात होती. त्यामुळे, गाव-तालुका आणि जिल्हा अशी टप्प्याने दारूबंदी करणे गरजेचे होते.यामुळे पोलिसांवरही ताण पडला नसता. दारूबंदीच्या अंमलबजावणीतील अडचणीही यातून दूर करता आल्या असत्या.दारूबंदीच्या यशस्वीतेमध्ये अडचणी दिसत असल्याने या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली असल्याचे सांगून ते म्हणाले, बळजबरीने दारूबंदी शक्य नाही. दारूबंदी आणि व्यसनमुक्तीसाठी सुनियोजितपणे अंमलबजावणी व्हायला हवी होती. यातील कमतरतेमुळे शेकडो युवक अवैध दारू व्यवसायात जुळले असून यातून नवे माफिया जन्मास येण्याची भीती बळावल्याचे ते यावेळी म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)