शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

रत्नापुरात साकारलाय दिल्लीचा लाल किल्ला

By admin | Updated: October 15, 2015 01:08 IST

सिंदेवाही तालुक्यातील श्री गुरुदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी दिल्लीच्या लालकिल्याची प्रतिकृती आणि आदर्श ग्राम संकल्पनेपवर आधारित ...

नवरगाव: सिंदेवाही तालुक्यातील श्री गुरुदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी दिल्लीच्या लालकिल्याची प्रतिकृती आणि आदर्श ग्राम संकल्पनेपवर आधारित विविध आकर्षक देखाव्याची निर्मिती केली आहे. जिल्ह्यातून बहुसंख्य नागरिक दर्शनासाठी येत आहेत.मागील १० वर्षापासून विविध देखावे या मंडळाने तयार केले असून ते आकर्षणाचे केंद्र ठरले होते. दरवर्षी लाखो भाविक या मंडळाचा दुर्गोत्सव पाहण्यासाठी येत असतात. मात्र यावेळी ११ वे वर्ष असून दिल्लीच्या लाल किल्ल्याचा देखावा तयार केलेला आहे. ८००० चौरस फूट जागेवर भद्रावतीचे भास्कर फाये यांनी ही कलाकृती तयार केली असून किल्ल्याच्या पटांगणात बगीचा तयार करण्यात आला आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आदर्श गावाची संकल्पना विविध मूर्तीच्या माध्यमातून दर्शविलेली आहे. ग्रामसभा, शिक्षण, पूर्वीच्या काळात असलेली बारा बलुतेदार पद्धती, सांडपाण्याचे व्यवस्थापन, जलसंधारण, खतनिर्मिती, दारूमुक्ती, व्यसनमुक्ती, वाचनालय, वृक्षसंवर्धन या सर्व घटकांचे मानवी जीवनातील महत्व मूर्तीमधून सजीव केले आहे. आणि गाभाऱ्यामध्ये मुख्य दुर्गामातेची मूर्ती बसविली आहे.या दुर्गात्सवाच्या निमित्ताने विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजनही केले आहे. अंधश्रद्धा निर्मूनल, रक्तदान शिबिर, किशोरवयीन मुलींचे हिमोग्लोबिन तपासणी व सिकलसेल तपासणी, १६ आॅक्टोबरला विदर्भस्तरीय एकल व समूहनृत्य स्पर्धा, १८ आॅक्टोबरला विनामुल्य मोतीबिंदू व डोळे तपासणी, शस्त्रक्रिया शिबिर असे चांगले उपक्रम घेतलेले आहेत.तसेच मेला लागलेला असून विविध झुल्यांसह, प्रात्यक्षिक बघायला मिळत आहे. गाढव म्हणजेच अज्ञान असे समजले जात असलेतरी मेल्यामध्ये आणलेले गाढव आपल्या सज्ञानामुळे आकर्षण ठरत आहे. या सर्व प्रकारामुळे भाविकांचे मनोरंजन होत आहे. भाविकांनी दुर्गोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक पं.स. उपसभापती रमाकांत लोधे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे. (वार्ताहर)