शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या एकरात कारल्याचे विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 05:01 IST

राजुरा तालुक्यातील वरोडा येथील प्रगतशील शेतकरी किशोर नांदेकर हे आपल्या शेतात दरवर्षी नवनव्या पध्दतीने विविध पिकांची लागवड करीत असतात. शेतकरी किशोर नांदेकर यांची वरोडा-नवेगाव या मुख्य रस्त्यालगत सात एकर शेती आहे. नांदेकर यांचे संयुक्त कुटुंब असल्याने घरातील मंडळी शेतात दिवसरात्र राबत असतात. घरातील प्रत्येक सदस्याला शेतीची कामे वाटून देण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देशेतीत आधुनिकतेची सांगड : वरोडा येथील शेतकऱ्यांची यशोगाथा

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : अस्मानी आणि सुलतानी संकटांनी शेतीची अवस्था अधिकच बिकट होत असतानाच राजुरा तालुक्यातील वरोडा येथील शेतकरी किशोर नांदेकर यांनी आपल्या शेतातील अर्ध्या एकरात कारल्याची लागवड केली होती. यात त्यांनी आधुनिक पध्दतीचा अवलंब केला. या शेतीतून त्यांना यंदा विक्रमी उत्पादन मिळत आहे.राजुरा तालुक्यातील वरोडा येथील प्रगतशील शेतकरी किशोर नांदेकर हे आपल्या शेतात दरवर्षी नवनव्या पध्दतीने विविध पिकांची लागवड करीत असतात. शेतकरी किशोर नांदेकर यांची वरोडा-नवेगाव या मुख्य रस्त्यालगत सात एकर शेती आहे. नांदेकर यांचे संयुक्त कुटुंब असल्याने घरातील मंडळी शेतात दिवसरात्र राबत असतात. घरातील प्रत्येक सदस्याला शेतीची कामे वाटून देण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापली जबाबदारी समजून शेतीची कामे करतात. त्यांच्या सात एकर शेतीत ते विविध प्रकारच्या पिकांची लागवड करतात. त्यांनी शेतात कापूस, तूर, सोयाबीन या प्रमुख पिकांसह कारली, हळद, ढेमसे, शेंगा, कोबी, टमाटर, वांगे या पिकांसह भाजीपाला पिके घेतली आहेत. किशोर नांदेकर यांनी आपल्या अर्ध्या एकर शेतात कारल्याची लागवड केली आहे.यासाठी त्यांनी शेतात आधुनिक पद्धतीचा वापर केला. त्यांनी सुरुवातीलाच ३५ क्विंटल कारल्याचे उत्पादन घेतले आहे. अजूनही ते कारल्याचे उत्पादन घेत असून कारले लागल्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांना २०० क्विंटल कारल्याचे उत्पादन होणे अपेक्षित आहे. यासाठी ते शेतात मोठी मेहनत घेत असतात. राजुरा तालुका कृषी अधिकारी जी.के. कडलग, कृषी पर्यवेक्षक टी.जी.आडे व कृषी सहाय्यक यांचे यासाठी त्यांना मार्गदर्शन लाभत आहे. एकीकडे शेतीला अवकळा आली असताना वरोडा येथील शेतकºयाने मोठ्या हिंमतीने प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर फुलविलेली शेती नक्कीच हताश झालेल्या शेतकऱ्यांना आशेचा नवा किरण ठरणार आहे.निसर्गाची अवकृपा, शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे दिवसेंदिवस शेतीला अवकळा येत आहे. नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. मात्र शेतकºयांनी हताश न होता आधुनिक पद्धतीने शेतीची कास धरली तर नक्कीच शेतीत भरघोस उत्पादन येईल. आजपर्यंत ३५ क्विंटल कारल्याचे उत्पादन घेतले असून पुन्हा २०० क्विंटलपर्यंत कारल्याचे उत्पादन होऊ शकते.-किशोर नांदेकर ,प्रगतशील शेतकरी, वरोडा.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती