शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

देवीच्या दर्शनासाठी रांगत प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 10:09 PM

देवीचा नवरात्रोत्सव प्रत्येकाला ओढ लावणारा आहे. उपास व व्रतवैकल्य जोपासून आदिशक्तीला नतमस्तक होऊन मनोकामना पूर्ण करण्याचा संकल्प भाविकांकडून केला जातो. दरम्यान देवीचा जागर होतो.

ठळक मुद्देबल्लारपुरातून दर्शनवारी: १२ किमी प्रवासाला ३६ तासांचा कालावधी

अनेकश्वर मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : देवीचा नवरात्रोत्सव प्रत्येकाला ओढ लावणारा आहे. उपास व व्रतवैकल्य जोपासून आदिशक्तीला नतमस्तक होऊन मनोकामना पूर्ण करण्याचा संकल्प भाविकांकडून केला जातो. दरम्यान देवीचा जागर होतो. याला धार्मिकतेची जोडही मिळाली आहे. भक्तीच्या ओढीने बल्लारपूर येथील भाविकांची सहा वर्षांपासूनची दर्शनवारी सुरू आहे. बल्लारपूर ते चंद्रपूरपर्यंत १२ किमी अंतर केवळ श्रद्धेमुळे रांगत-रांगत ३६ तासांत पूर्ण करून महाकालीच्या दर्शन घेतल्या जात आहे.राणी लक्ष्मी वॉर्डातील तारा बरमैय्या यांच्या कुटुंबीयांची देवी महाकालीच्या दर्शनवारीचे वास्तवातील चित्र आहे. देवी महाकालीवर त्यांची अपार श्रद्धा आहे. कौटुंबीक परिस्थिती जेमतेम. मात्र सप्तमीला देवी महाकालीचे दर्शन घेण्याचा संकल्प भक्तीभाव उजागर करणारा आहे. १२ किलोमीटर अंतर रांगत प्रवास करून आदिशक्तीचा जागर धार्मिक भावना जोपासणारा आहे. किसन बरमय्या, आकाश बरमय्या, अविनाश गेडाम व गणेश तेलसे यांनी पंचमीला म्हणजे रविवारी रात्री ८ वाजता वाघाचे रूप धारण करून घरून देवी महाकालीच्या दर्शनासाठी वारी सुरू केली आहे.महाकाली आराध्य दैवत आहे. नवरात्रोत्सवा दरम्यान आदीशक्तीचा जागर केला जातो. संकल्पसिद्धी केली जाते.मंगलमय वातावरण असते. सामान्य नागरिकांना राक्षसी प्रवत्तीपासून वाचविणारी त्राता म्हणून देवीचे रूप आहे. तिचे सशक्त रूप भाविकांना ओढ लावते. यामुळेच ओढीने देवी महाकालीच्या दर्शनासाठी वाघाचे रूप धारण करून रांगत प्रवास करतो, अशी माहिती किसन बरमैय्या यांनी ‘लोकमत’ला दिली. आमची देवीवर श्रद्धा आहे. भक्तीभाव जोपासतो. दैवी शक्तीचे वरदान लाभावे हीच मनिषा बाळगून सप्तमीला दर्शन घेतो, असेही त्यांनी सांगितले.मूर्ती घडविण्यातूनच जागा झाला भक्तीभावआकाश बरमय्या हे विविध देवीदेवता व गणेश मूर्ती घडवितात. मूर्ती घडविण्याच्या निमित्ताने भक्तीभाव जागृत झाला. साक्षात्कार झाल्याने वाघाचे उग्ररूप धारण करून देवीपुढे नतमस्तक होण्यासाठी दर्शनवारी केल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी सकाळी ६ वाजता विसापूर टोल नाक्यावरुन महाकालीच्या दर्शनासाठी रांगतरांगत वारी सुरु केली. चार जण देवीची रांगत दर्शनवारी करतात तर कुटुंबातील अन्य सदस्य सोबतीला आहेत. पंचमीला सुरू झालेला भाविकांचा हा प्रवास सप्तमीला महाकालीच्या दर्शनाने पूर्ण होणार आहे. भाविकांच्या अंगी सत्वगुणांचा संचार व्हावा. मनोकामना पूर्ण व्हावी, हाच या प्रवासामागील हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले.