शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समितीचा कारभार रामभरोसे

By admin | Updated: May 29, 2014 02:09 IST

बल्लारपूर पंचायत समितीतील संवर्ग विकास अधिकार्‍यांचा कर्मचार्‍यांवर वचक नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

कोठारी : बल्लारपूर पंचायत समितीतील संवर्ग विकास अधिकार्‍यांचा कर्मचार्‍यांवर वचक नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील कर्मचार्‍यांवर वरिष्ठ अधिकार्‍यांनी कारवाई करुन नागरिकांची पिळवणूक थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सध्या पंचायत समिती घरकुलाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तालुक्यात १५0-२00 घरकुल मंजूर झाले आहेत. ५0 ते ६0 घरकुलाचे काम सुरु आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब घरकुलाचा लाभ मिळविण्यासाठी पंचायत समितीचे उंबरडे झिजवत आहेत. घरकुल धारकांना धनादेश वितरीत होत नाहीत. धनादेशासाठी लाभार्थी दररोज पंचायत समितीच्या बीआरजीएफ कार्यालयातील कर्मचार्‍यांकडे चकरा मारत आहेत. मात्र त्यांना धनादेश देण्यास टाळाटाळ करीत आहे. चिरीमीरी देणार्‍यांची त्वरित वर्णी लागत असल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.

राजीव गांधी निवारा क्र. २ च्या योजनेचे अनेक प्रस्ताव या कार्यालयात एक वर्षापासून धुळखात पडले आहे. मात्र त्यावर संबंधित कर्मचारी कोणतीही कार्यवाही करीत नाही. पंचायत समितीत १७ ग्रामपंचायती असून यात अनेक गावातील राजीव गांधी घरकुलाचे प्रस्ताव रखडले आहेत. बँकेच्या कर्जाने मंजूर होणारे घरकुल बांधून स्वत:च्या घरात राहण्याची लाभार्थ्यांची इच्छा आहे. यासाठी प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी पंचायत समितीकडे पाठविण्यात आले. सदर प्रस्तावावर संवर्ग विकास अधिकारी व तहसीलदार यांच्या स्वाक्षर्‍या लागतात. मात्र यासाठी महिना- दोन महिने लागतात. तहसिलदार सदर प्रस्तावावर स्वाक्षर्‍या करीत नसल्याने प्रस्ताव रखडल्याचे येथील कर्मचारी सांगत आहेत. मात्र इतर पंचायत समिती, तहसिलमध्ये सदर प्रस्तावावर तहसीलदार त्वरित स्वाक्षर्‍या करुन मंजुरीसाठी पाठवितात. बल्लारपूर तहसिलदारांनी याकडे लक्ष घालून राजीव गांधी घरकुल प्रस्तावावर स्वाक्षर्‍या कराव्या, अशी मागणी होत आहे. पंचायत समिती अंतर्गत असणार्‍या काही सरपंचाणी घरकुल योजनेच्या धनादेशासाठी संबंधित कर्मचार्‍यांकडे आर्थिक लॉबी तयार केली असल्याचे समजते. त्यांचा भ्रमणध्वनी संबंधित कर्मचार्‍यांना येतो व घरकुलाचा धनादेश बनवून तयार मिळतो. यात लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक केल्या जात असल्याचा आरोप रमेश पिपरे यांनी केला आहे. घरकुलाच्या धनादेशासाठी लाभार्थी असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी दिलेल्या धनादेशात घरकुलाचे काम सुरु केले किंवा काय, याची तपासणी करुन पुढील धनादेश देण्याचे आदेश असताना अनेक लाभार्थ्यांंनी घरकुलाचे काम न करता धनादेश उचलल्याचे समजते. पंचायत समितीचा कारभार प्रभारी संवर्ग विकास अधिकार्‍यांकडे मागील एक वर्षापासासून आहे. गुरनुले यांची नवृत्ती झाल्यानंतर बाल विकास अधिकारी बल्लारपूर यांच्याकडे प्रभार देण्यात आला.तेव्हा पासूनच पंचायत समितीच्या कारभारात गचाळपणा आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्मचार्‍यांवर त्यांचा वचक नसल्याने कर्मचारी मनमर्जीने वावरतात. त्याचा फटका ग्रामीण नागरिकांना सहन करावा लागत आहे. बांधकाम, कृषी, शिक्षण, आरोग्य, पंचायत, पशुसंवर्धन, सामान्य प्रशासनातील कर्मचारी योग्य काम करीत नसल्याचे पिपरे यांचे म्हणणे आहे. मागील दोन वर्षापासून बचत गटाच्या कामासाठी विस्तार अधिकार्‍यांचे पद निर्माण करण्यात आले. विस्तार अधिकारी बक्षी रुजू झाले. मात्र ते पंचायत समितीत काम करीत नाहीत. जिल्हा परिषदेमध्ये काम करुन पगार मात्र पंचायत समितीच्या आस्थापनेतून घेतात. त्यामुळे बचत गटाच्या महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील समस्या त्वरित सोडवाव्या, अशी मागणी रमेश पिपरे यांनी केली आहे. (वार्ताहर)