शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

चंद्रपूर जिल्ह्यात अपघातांची मालिका; राजुरा बसस्थानकाचे छत कोसळले, वर्धा नदीत ट्रक कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2022 10:55 IST

एक ठार, एक गंभीर

राजुरा (चंद्रपूर) : राजुरा शहरातील विद्यार्थ्यांची गर्दी असणाऱ्या बसस्थानकावरील छत पडल्यामुळे एक व्यक्ती जखमी झाला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. ही घटना सायंकाळी घडली असती तर शेकडो विद्यार्थी जखमी झाले असते.

या बसस्थानकावर वन विभागाने झाडे तोडत असताना एक मोठे झाड बस स्टँडच्या छतावर पडले आणि अतिशय जीर्ण असलेले बसस्थानकाचे छत खाली पडले. यात एक प्रवासी जखमी झाला. बसस्थानकाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे. या ठिकाणी अस्वच्छता असून राजुरा डेपोमधील बसची अवस्था सुद्धा खराब आहे. एकंदरीत प्रवास करणारे जीव मुठीत घेऊन या ठिकाणी थांबतात. बसस्थानकाची दुरुस्ती व्हावी किंवा नवीन बसस्थानक बांधावे ही मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही.

दुसरीकडे, राजुरा ते बल्लारपूर मार्गावर असलेल्या वर्धा नदीत सोमवारी पहाटे एक ट्रक चालकाचे नियंत्रण बिघडल्याने कोसळला. यात एकाच मृत्यू झाला. वैभव पदमाईकर (२२) रा. बल्लारपूर असे मृताचे नाव आहे. बल्लारपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, ट्रकला बाहेर काढण्याचे कार्य सुरू आहे.

वर्धा नदीवर असलेले कठडे पावसाळ्यात काढण्यात आले होते. सध्या कठड्याच्या जागी बारीक पाइप लावण्यात आले आहेत. पूर्वी हा राज्यमार्ग होता. पण, आता हा मार्ग भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे आहे. पावसाळा संपूनदेखील संबंधित अधिकाऱ्यांनी कठडे लावले नसल्याने जनतेत संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सोमवारी पहाटे पुलावरील पाइपचे कठडे तोडून आयचर ट्रक नदीत कोसळला. या घटनेत ट्रकचालक वैभव पदमाईकर याचा मृत्यू झाला. चालकाशिवाय ट्रकमध्ये कुणीही नव्हते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली.

टॅग्स :Accidentअपघातrajura-acराजुराchandrapur-acचंद्रपूर