शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

हनुमान चालीसा, भोंगा वादावर बच्चू कडूंची टीका; म्हणाले, अशांना मुर्ख म्हटलं तरी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2022 18:38 IST

स्वातंत्र्यानंतर एखाद्या मंत्र्यांनी भेट देऊन आदिवासी गुड्यावर मुक्कामी राहण्याची ही जिवती तालुक्यातील पहिलीच घटना आहे. राज्यमंत्र्यांनी आदिवासी बांधवासोबत चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

ठळक मुद्देकोलामगुड्यावर स्वातंत्र्यानंतर प्रथमच मंत्र्यांचा मुक्काम

जिवती (चंद्रपूर) : महाराष्ट्रातून सुरू झालेला भोंगावाद आणि हनुमान चालीसा वाद देशभर गाजत आहे. या प्रकरणावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. हनुमान चालीसा व भोंग्याचा प्रश्न उपस्थित करणे हे राजकीय अपयश आहे. यांना मूर्ख म्हटले तरी हरकत नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

 जिल्ह्यातील आदिवासीबहुल व दुर्गम अशा जिवती तालुक्यातील लोकांशी संवाद साधण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बातचित केली. हनुमान चालिसा किंवा भोंग्याचा मुद्दा उपस्थित करणे, औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहणे हे या लोकांचे राजकीय अपयश आहे. यांची आपण मूर्ख म्हणून गगना केली तरी काही हरकत नाही, असे कडू म्हणाले. तसेच, आज विधायक कार्यक्रम कमी आणि चालीसासारखे ब्रेकिंग कार्यक्रम अधिक दाखवले जात असल्याचा टोलाही त्यांनी प्रसारमाध्यमांना लगावला. 

स्वातंत्र्यानंतर एखाद्या मंत्र्यांनी भेट देऊन आदिवासी गुड्यावर मुक्कामी राहण्याची ही जिवती तालुक्यातील पहिलीच घटना आहे. राज्यमंत्र्यांनी आदिवासी बांधवासोबत चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच सितागुड्यावर मोकळ्या जागेत एका खाटेवर निवांत झोप घेतली, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची झोप उडाली.

आज (दि. १८) सकाळी खडकी रायपूर या गुड्यावर भेट घेऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी माजी आमदार वामनराव चटप,तालुक्यातील विविध शासकीय अधिकारी कर्मचारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांच्या विविध समस्या ऐकून बच्चू कडू यांनी आपल्या स्टाईलने संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचा खरपूस समाचारही घेतला.

टॅग्स :PoliticsराजकारणBacchu Kaduबच्चू कडूSocialसामाजिकchandrapur-acचंद्रपूर