शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

आधी निधी उभारा; नंतर योजना सुरू करा

By admin | Updated: July 6, 2017 00:43 IST

नागरिकांना मुबलक पाणी देणारी महत्त्वाकांक्षी अमृत योजना महापालिकेने हाती घेतली आहे.

जलबिरादरीचे आमदारांना निवेदन : अमृत योजनेसाठी तज्ज्ञांच्या समितीची गरज लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नागरिकांना मुबलक पाणी देणारी महत्त्वाकांक्षी अमृत योजना महापालिकेने हाती घेतली आहे. मात्र या योजनेसाठी मनपाला ६५ ते ७० कोटींचा निधी उभारावा लागणार आहे. मनपाचे उत्पन्न लक्षात घेता एवढा मोठा निधी योजनेच्या कालावधीत उभारणे कठीण आहे. निधीअभावी योजनेची वाट लागण्याची शक्यता असल्याने मनपाने आधी निधी उभारावा, नंतरच योजनेची सुरूवात करावी. सोबतच या योजनेसाठी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करावी, या मागणीचे निवेदन आमदार नाना श्यामकुळे यांना दिल्याची माहिती जलबिरादरीचे जिल्हा संयोजक संजय वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली. महानगरपालिकेद्वारे केंद्र व राज्य शासनाकडे ‘अमृत’ पाणी पुरवठा योजनेचा जो प्रस्ताव पाठविला आहे, त्यामध्ये शहराच्या तीन लाखांवर असलेल्या लोकसंख्येला दरडोई १३५ लिटर पाणी दररोज उपलब्ध होणार आहे. योजनेचा पहिला टप्पा २३१ कोटी रुपये अंदाजपत्रकाचा आहे. या योजनेत केंद्र शासनाचा ५० टक्के, राज्य शासनाचे २५ टक्के व मनपाचे २५ टक्के म्हणजे ५७ कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्याच्या कामासाठी लागणार आहे. या व्यतिरिक्त सदर प्रस्ताव शासनाकडे सादर करताना अंदाजपत्रकाचे दर हे जुने देण्यात आल्यामुळे निविदेचा जो जादा दर आला, त्याच्या फरकाची रक्कम ही सुमारे सहा ते आठ कोटी असणार आहे व हा बोझा मनपालासहन करावा लागणार आहे. याशिवाय सुमारे ५० हजार नळधारकांना मीटर लावण्यासाठी प्रति मीटर २२०० रुपये प्रमाणे ११ कोटींची तरतूद करावी लागणार आहे. एकंदरीत अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात करताना महानगरपालिकेला ६५ ते ७० कोटींचा निधी उभा करावा लागेल. हा निधी मनपा कसा उभारेल, असा प्रश्नही त्यांनी निवेदनात केला आहे.१९९८ ची पुनरावृत्ती होऊ नये१९९८ मध्ये अशीच वाढीव पाणी पुरवठा योजना मनपाने हाती घेतली होती. ३८ कोटींची ही योजना होती. या योजनेसाठी साहित्यही खरेदी केले होते. मात्र ही योजना आजतागयत पूर्ण होऊ शकली नाही. कोट्यवधींच्या भूमिगत मल:निस्सारण योजनेचीही तसेच झाले. त्यामुळे अमृत योजनेसाठी शहरातील अनुभवी व तज्ज्ञ नागरिकांची समिती स्थापन करावी, अशी मागणीही संजय वैद्य यांनी आमदारांकडे केली आहे.