शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

आधी निधी उभारा; नंतर योजना सुरू करा

By admin | Updated: July 6, 2017 00:43 IST

नागरिकांना मुबलक पाणी देणारी महत्त्वाकांक्षी अमृत योजना महापालिकेने हाती घेतली आहे.

जलबिरादरीचे आमदारांना निवेदन : अमृत योजनेसाठी तज्ज्ञांच्या समितीची गरज लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नागरिकांना मुबलक पाणी देणारी महत्त्वाकांक्षी अमृत योजना महापालिकेने हाती घेतली आहे. मात्र या योजनेसाठी मनपाला ६५ ते ७० कोटींचा निधी उभारावा लागणार आहे. मनपाचे उत्पन्न लक्षात घेता एवढा मोठा निधी योजनेच्या कालावधीत उभारणे कठीण आहे. निधीअभावी योजनेची वाट लागण्याची शक्यता असल्याने मनपाने आधी निधी उभारावा, नंतरच योजनेची सुरूवात करावी. सोबतच या योजनेसाठी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करावी, या मागणीचे निवेदन आमदार नाना श्यामकुळे यांना दिल्याची माहिती जलबिरादरीचे जिल्हा संयोजक संजय वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली. महानगरपालिकेद्वारे केंद्र व राज्य शासनाकडे ‘अमृत’ पाणी पुरवठा योजनेचा जो प्रस्ताव पाठविला आहे, त्यामध्ये शहराच्या तीन लाखांवर असलेल्या लोकसंख्येला दरडोई १३५ लिटर पाणी दररोज उपलब्ध होणार आहे. योजनेचा पहिला टप्पा २३१ कोटी रुपये अंदाजपत्रकाचा आहे. या योजनेत केंद्र शासनाचा ५० टक्के, राज्य शासनाचे २५ टक्के व मनपाचे २५ टक्के म्हणजे ५७ कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्याच्या कामासाठी लागणार आहे. या व्यतिरिक्त सदर प्रस्ताव शासनाकडे सादर करताना अंदाजपत्रकाचे दर हे जुने देण्यात आल्यामुळे निविदेचा जो जादा दर आला, त्याच्या फरकाची रक्कम ही सुमारे सहा ते आठ कोटी असणार आहे व हा बोझा मनपालासहन करावा लागणार आहे. याशिवाय सुमारे ५० हजार नळधारकांना मीटर लावण्यासाठी प्रति मीटर २२०० रुपये प्रमाणे ११ कोटींची तरतूद करावी लागणार आहे. एकंदरीत अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात करताना महानगरपालिकेला ६५ ते ७० कोटींचा निधी उभा करावा लागेल. हा निधी मनपा कसा उभारेल, असा प्रश्नही त्यांनी निवेदनात केला आहे.१९९८ ची पुनरावृत्ती होऊ नये१९९८ मध्ये अशीच वाढीव पाणी पुरवठा योजना मनपाने हाती घेतली होती. ३८ कोटींची ही योजना होती. या योजनेसाठी साहित्यही खरेदी केले होते. मात्र ही योजना आजतागयत पूर्ण होऊ शकली नाही. कोट्यवधींच्या भूमिगत मल:निस्सारण योजनेचीही तसेच झाले. त्यामुळे अमृत योजनेसाठी शहरातील अनुभवी व तज्ज्ञ नागरिकांची समिती स्थापन करावी, अशी मागणीही संजय वैद्य यांनी आमदारांकडे केली आहे.