शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास

By admin | Updated: September 21, 2015 01:12 IST

नुकत्याच झालेल्या पावसाने कोरपना व जिवती तालुक्यातील कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले.

नगदी पिके अस्मानी संकटात : शेतकऱ्यांना मदतीची आसनांदाफाटा : नुकत्याच झालेल्या पावसाने कोरपना व जिवती तालुक्यातील कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. यातच कवठाळा, पिंपळगाव, नांदा, बाखर्डी, भोयगाव, वनसडी, कोरपना आदी भागातील मिरचीचे पीक संकटात आले आहे. हवा व पाण्यामुळे फळाला आलेली झाडे कोलमडून पडली असून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हरावला असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे. अनेक शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कापसासह मिरचीची लागवड केली. कापूस पिकाच्या तुलनेत मिरचीचा उत्पादन खर्च अधिक आहे. या महिन्यात पीक फळावर आले असताना अचानक आलेल्या मुसळधार पावसाने पिकाची हानी झाली. मिरची व इतर नगदी पिकांसाठी शेतकऱ्यांनी बि-बियाणे, खते, औषधी व मजूर लावून निंदणही उरकवून टाकले. पिकांच्या वार्षिक उत्पादन खर्चापैकी अंदाजे ७५ टक्के खर्च यावर्षी शेतकऱ्यांनी आतापर्यंत केला आहे. कापसाची वेचणी एका महिन्यानंतर करायची तयारी शेतकऱ्यांनी केली तर मिरचीच्या उत्पादनासाठीही मोठा खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. याचबरोबर काही शेतकऱ्यांनी यावर्षी नव्याने ठिंबक सिंचनाचाही खर्च केलेला आहे. शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, औषधे आदींची उधारी देणे बाकी असताना पिकांची ही अवस्था झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. याचबरोबर सोयाबीन, उडीद, मूग, तूर याही नगदी पिकांना काही भागात मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. (वार्ताहर)उसगावातील कपाशीवर लाल्या अज्ञात रोगाचा प्रादूर्भावशेतकरी हवालदिलघुग्घूस नजीकच्या उसगाव पंचक्रोशीतील कापसाच्या झाडावर लाल्या नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव व त्याबरोबरच अज्ञात रोगाचे आक्रमण झाले आहे. अडीच ते तीन हजार एकर जमिनीवर कपाशीचे झाडे करपत असल्याने उत्पन्नात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या परिसरातील वर्धा नदीच्या काठावर असलेल्या शंभर एकरवरील पीक नदीच्या पाण्यात बुडाले आहे. शेतकरी वर्ग हवालदिल झाले आहेत. अगोदरच नापिकी त्यात वेळेवर पाऊस नाही, शेतात जंगली जनावरांचा धुमाकूळ याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. सध्या कपाशीच्या झाडांची जोमाने वाढ होत असून फुले, बोंड लागले आहे. मात्र त्यावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. कृषी अधिकारी भोये यांच्या मार्गदर्शनानुसार हजारो रुपये खर्च करून औषधांची फवारणी केली. त्या माध्यमातून काही शेतकऱ्यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या काही दिवसांपासून कपाशीची झाडे पिवळी पडत असून त्याची फुले गळू लागली आहेत. याचा परिणाम उत्पन्नावर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अनेक संकटांनी अगोदरच बेजार असलेला शेतकरी अधिक चिंतातूर झाला आहे. नुकताच वर्धा नदीच्या काठावरील शेतीतील उसगाव, वढा, पांढरकवडा या शेत शिवारातील सुमारे शंभरपेक्षा अधिक एकर जमिनीवरील पिके पाण्याखाली आल्याने संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कृषी विभागाने सदरच्या अज्ञात रोगाचा शोध घेऊन तातडीने उपाययोजना कराव्या, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दरम्यान, चंद्रपूर पंचायत समितीचे सभापती नामदेव ठाकरे, सरपंच निवेता ठाकरे, उपसरपंच माया जुमनाके, धनंजय ठाकरे, उपसरपंच मंगेश आसुटकर आदींनी या गावातील शेतांना भेटी देऊन पाहणी केली.