शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास

By admin | Updated: September 21, 2015 01:12 IST

नुकत्याच झालेल्या पावसाने कोरपना व जिवती तालुक्यातील कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले.

नगदी पिके अस्मानी संकटात : शेतकऱ्यांना मदतीची आसनांदाफाटा : नुकत्याच झालेल्या पावसाने कोरपना व जिवती तालुक्यातील कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. यातच कवठाळा, पिंपळगाव, नांदा, बाखर्डी, भोयगाव, वनसडी, कोरपना आदी भागातील मिरचीचे पीक संकटात आले आहे. हवा व पाण्यामुळे फळाला आलेली झाडे कोलमडून पडली असून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हरावला असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे. अनेक शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कापसासह मिरचीची लागवड केली. कापूस पिकाच्या तुलनेत मिरचीचा उत्पादन खर्च अधिक आहे. या महिन्यात पीक फळावर आले असताना अचानक आलेल्या मुसळधार पावसाने पिकाची हानी झाली. मिरची व इतर नगदी पिकांसाठी शेतकऱ्यांनी बि-बियाणे, खते, औषधी व मजूर लावून निंदणही उरकवून टाकले. पिकांच्या वार्षिक उत्पादन खर्चापैकी अंदाजे ७५ टक्के खर्च यावर्षी शेतकऱ्यांनी आतापर्यंत केला आहे. कापसाची वेचणी एका महिन्यानंतर करायची तयारी शेतकऱ्यांनी केली तर मिरचीच्या उत्पादनासाठीही मोठा खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. याचबरोबर काही शेतकऱ्यांनी यावर्षी नव्याने ठिंबक सिंचनाचाही खर्च केलेला आहे. शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, औषधे आदींची उधारी देणे बाकी असताना पिकांची ही अवस्था झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. याचबरोबर सोयाबीन, उडीद, मूग, तूर याही नगदी पिकांना काही भागात मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. (वार्ताहर)उसगावातील कपाशीवर लाल्या अज्ञात रोगाचा प्रादूर्भावशेतकरी हवालदिलघुग्घूस नजीकच्या उसगाव पंचक्रोशीतील कापसाच्या झाडावर लाल्या नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव व त्याबरोबरच अज्ञात रोगाचे आक्रमण झाले आहे. अडीच ते तीन हजार एकर जमिनीवर कपाशीचे झाडे करपत असल्याने उत्पन्नात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या परिसरातील वर्धा नदीच्या काठावर असलेल्या शंभर एकरवरील पीक नदीच्या पाण्यात बुडाले आहे. शेतकरी वर्ग हवालदिल झाले आहेत. अगोदरच नापिकी त्यात वेळेवर पाऊस नाही, शेतात जंगली जनावरांचा धुमाकूळ याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. सध्या कपाशीच्या झाडांची जोमाने वाढ होत असून फुले, बोंड लागले आहे. मात्र त्यावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. कृषी अधिकारी भोये यांच्या मार्गदर्शनानुसार हजारो रुपये खर्च करून औषधांची फवारणी केली. त्या माध्यमातून काही शेतकऱ्यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या काही दिवसांपासून कपाशीची झाडे पिवळी पडत असून त्याची फुले गळू लागली आहेत. याचा परिणाम उत्पन्नावर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अनेक संकटांनी अगोदरच बेजार असलेला शेतकरी अधिक चिंतातूर झाला आहे. नुकताच वर्धा नदीच्या काठावरील शेतीतील उसगाव, वढा, पांढरकवडा या शेत शिवारातील सुमारे शंभरपेक्षा अधिक एकर जमिनीवरील पिके पाण्याखाली आल्याने संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कृषी विभागाने सदरच्या अज्ञात रोगाचा शोध घेऊन तातडीने उपाययोजना कराव्या, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दरम्यान, चंद्रपूर पंचायत समितीचे सभापती नामदेव ठाकरे, सरपंच निवेता ठाकरे, उपसरपंच माया जुमनाके, धनंजय ठाकरे, उपसरपंच मंगेश आसुटकर आदींनी या गावातील शेतांना भेटी देऊन पाहणी केली.