शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातील बँकवॉटरचा शेतीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:00 IST

राजुरा तालुका काळ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. गोवरी, सास्ती, धोपटाळा, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, साखरी परिसरात दगडी कोळशाचे साठे मुबलक प्रमाणात असल्याने वेकोलिने खुल्या खाणी निर्माण केल्या. परंतु, पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसविले, असा आरोप परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनातून केला आहे.

ठळक मुद्देवेकोलिचे उपाययोजनेकडे दुर्लक्ष : ढिगाऱ्यांमुळे नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : तालुक्यात बल्लारपूर क्षेत्रांतर्गत वेकोलिच्या भूमीगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. कोळसा खननासाठी गोवरी, सास्ती, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, धोपटाळा व साखरी परिसरात वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे नदी व नाल्याच्या किनाऱ्यावर टाकले. त्यामुळे नैसर्गिक प्रवाह बदलला. पावसाळ्यात दरवर्षी परिसरातील अनेक गावांना बॅकवॉटरचा फटका बसतो. मात्र वेकोलिने यंदाही कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही.राजुरा तालुका काळ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. गोवरी, सास्ती, धोपटाळा, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, साखरी परिसरात दगडी कोळशाचे साठे मुबलक प्रमाणात असल्याने वेकोलिने खुल्या खाणी निर्माण केल्या. परंतु, पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसविले, असा आरोप परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनातून केला आहे.मातीचे ढिगारे नदी नाल्याच्या काठावर टाकल्याने नैसर्गिक नाल्याचे पात्र बदलले. पावसाळ्यातील पाणी नाल्या न जाता शेतात शिरते. यातून दरवर्षी मोठे नुकसान होत आहे. वेकोलिने ३० वर्षांपूर्वी गोवरी-सास्ती परिसरात कोळसा खाण सुरू केली. तेव्हापासून हा परिसर डेंजरझोन म्हणून गणल्या जात आहे.कोळशाचे उत्पादन घेत असताना जिल्हा प्रशासनाकडून वेकोलिला अनेकदा नोटीसा दिल्या. परंतु, शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे मातीचे ढिगारे कर्दनकाळ ठरले आहेत पावसाळ्यात गोवरी, सास्ती, पोवनी परिसरातील बहुसंख्य गावांना बॅक वॉटरचा फटका बसतो. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली येते. वेकोलिचे हे सारे दुष्परिणाम गावकऱ्यांना सहन करावे लागतात. जल, वायु प्रदूषण वाढले. परंतु वेकोलिने गावकऱ्यांच्या समस्यांवर अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही. परिणामी यंदाच्या पावसाळ्यात बॅकवॉटरमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होऊ शकते.सात गावांतील शेतकऱ्यांमध्ये चिंतावेकोलिने कोळसा खनन करून टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे दरवर्षी गोवरी, सास्ती, पोवनी, मानोली, बाबापूर, कढोली, कोलगाव परिसरातील गावांना बॅक वॉटरचा फटका बसतो. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. पिकांची उत्पादकता घटते. पुराच्या पाण्यामुळे शेतीकडे जाणारे रस्ते बंद होतात. अनेक गावांचा संपर्क तुटतो. यंदाही हीच वेळ येऊ शकते.

टॅग्स :Rainपाऊस