शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

पावसाने दुबार पेरणीचे संकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:19 IST

गेल्या १० ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते. मात्र बुधवारी व गुरूवारी जिल्हाभर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. बुधवारी जिल्ह्यात २५.५७ च्या सरासरीने ३८३.६ मिमी पावसाची नोंद झाली.

ठळक मुद्देशेतकरी सुखावला : जिल्हाभर पावसाची रिमझिम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या १० ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते. मात्र बुधवारी व गुरूवारी जिल्हाभर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. बुधवारी जिल्ह्यात २५.५७ च्या सरासरीने ३८३.६ मिमी पावसाची नोंद झाली.जिल्ह्यात १२ ते १३ जूनला पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी धान पऱ्हे व कापूस बियाण्यांची पेरणी केली. मात्र त्यानंतर पाऊस गायब झाल्याने बियाणे अंकुरण्याआधीच करपण्याचा धोका निर्माण झाला होता. परिणामी अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. मात्र दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असल्याने शेतकरी सुखावला आहे. तर उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.धान पºहे, कापूस पिकाला जीवदानयेनबोडी : बल्लारपूर तालुक्यात कळमना, आमडी, पळसगाव, किन्ही, इटोली, मानोरा आदी गावातील शेतकºयांनाी धान पऱ्हे व कापूस पिकाची लागवड केली होती. मात्र पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता होता. धान पऱ्हे पाण्याविना करपण्यावर होते. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट होते. मात्र दोन दिवसांपासून रिमझीम पाऊस सुरू असल्याने धानपऱ्हे व कापूस पिकाला जिवदान मिळाले आहे.शेतकऱ्यांची चिंता दूरनागभीड : बुधवारपासून रिमझिम पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. नागभीड तालुक्यात धानाचे पीक घेतल्या जाते. बहुतांश शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले होते. मात्र पावसाच्या दडीने शेतकऱ्यांत चिंता पसरली होती. दुबार पेरणीच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त असताना बुधवारपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.१५ दिवसानंतर पाऊसमारोडा : या परिसरात बुधवारी रात्री व गुरुवारी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांत आनंद पसरला आहे. सुरुवातीला आलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी महागडे बियाणे पेरले. परंतु गेली १५ दिवस पाऊस पडला नाही. त्यामुळे धान पऱ्हे करपू लागले होते. परंतु, बुधवार रात्री व गुरुवारला आलेल्या पावसाने धान पऱ्ह्यांना संजीवनी मिळाली आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी