शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पावसाने दुबार पेरणीचे संकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:19 IST

गेल्या १० ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते. मात्र बुधवारी व गुरूवारी जिल्हाभर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. बुधवारी जिल्ह्यात २५.५७ च्या सरासरीने ३८३.६ मिमी पावसाची नोंद झाली.

ठळक मुद्देशेतकरी सुखावला : जिल्हाभर पावसाची रिमझिम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या १० ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते. मात्र बुधवारी व गुरूवारी जिल्हाभर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. बुधवारी जिल्ह्यात २५.५७ च्या सरासरीने ३८३.६ मिमी पावसाची नोंद झाली.जिल्ह्यात १२ ते १३ जूनला पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी धान पऱ्हे व कापूस बियाण्यांची पेरणी केली. मात्र त्यानंतर पाऊस गायब झाल्याने बियाणे अंकुरण्याआधीच करपण्याचा धोका निर्माण झाला होता. परिणामी अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. मात्र दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असल्याने शेतकरी सुखावला आहे. तर उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.धान पºहे, कापूस पिकाला जीवदानयेनबोडी : बल्लारपूर तालुक्यात कळमना, आमडी, पळसगाव, किन्ही, इटोली, मानोरा आदी गावातील शेतकºयांनाी धान पऱ्हे व कापूस पिकाची लागवड केली होती. मात्र पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता होता. धान पऱ्हे पाण्याविना करपण्यावर होते. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट होते. मात्र दोन दिवसांपासून रिमझीम पाऊस सुरू असल्याने धानपऱ्हे व कापूस पिकाला जिवदान मिळाले आहे.शेतकऱ्यांची चिंता दूरनागभीड : बुधवारपासून रिमझिम पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. नागभीड तालुक्यात धानाचे पीक घेतल्या जाते. बहुतांश शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले होते. मात्र पावसाच्या दडीने शेतकऱ्यांत चिंता पसरली होती. दुबार पेरणीच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त असताना बुधवारपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.१५ दिवसानंतर पाऊसमारोडा : या परिसरात बुधवारी रात्री व गुरुवारी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांत आनंद पसरला आहे. सुरुवातीला आलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी महागडे बियाणे पेरले. परंतु गेली १५ दिवस पाऊस पडला नाही. त्यामुळे धान पऱ्हे करपू लागले होते. परंतु, बुधवार रात्री व गुरुवारला आलेल्या पावसाने धान पऱ्ह्यांना संजीवनी मिळाली आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी