शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
6
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
8
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
9
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
10
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
11
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
12
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
13
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
14
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
17
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
18
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
19
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
20
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?

फुलोऱ्यावरील धानाला पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 06:00 IST

दुसरीकडे उच्चप्रतीचा धानही किडींच्या आक्रमणात सापडला आहे. विविध किडींचे आक्रमण झाले आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकरी महागडे किटकनाशक फवारत आहे. परंतु फवारणी होत नाही तोच पावसाची सर कोसळते. त्यामुळे फवारणीचा कोणताही परिणाम किडींवर होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हमणे आहे.

ठळक मुद्देफवारणीचा उपयोग नाही : धानावर कीडीचे आक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: सततच्या पावसाचा फुलोऱ्यावर आलेल्या धानाला फटका बसत आहे. धानाचे फूल जळत असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उच्च प्रतीच्या धानावर कीडीचे आक्रमण झाले आहे. पावसामुळे फवारणीही निष्प्रभ ठरत असून शेतकरी हवालदिल झाले आहे.गत २५ दिवसांपासून जिल्ह्यात दररोज पाऊस कोसळत आहे. सध्या हलक्या प्रतीचा धान निसरला असून काही ठिकाणी तो फुलोऱ्यांवर आला आहे. सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने झालेला पाऊस पिकांसाठी समाधानकारक असला तरी आता मात्र सततच्या पावसाचा फटका हलक्याप्रतीच्या धानाला बसत आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात हलक्याप्रतीच्या धानाची लागवड करण्यात आली. सध्या फुलोºयावरील धानाला पावसाचा फटका बसत आहे. निसवून १५ ते २० दिवस झालेल्या धानाचे सर्वाधिक नुकसान होत आहे. फूल जळत असल्याने धान भरत नाही. त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.दुसरीकडे उच्चप्रतीचा धानही किडींच्या आक्रमणात सापडला आहे. विविध किडींचे आक्रमण झाले आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकरी महागडे किटकनाशक फवारत आहे. परंतु फवारणी होत नाही तोच पावसाची सर कोसळते. त्यामुळे फवारणीचा कोणताही परिणाम किडींवर होत नसल्याचे शेतकºयांचे म्हमणे आहे. सातत्याने महागडी फवारणी करावी लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.सुरुवातीला पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले होते. या परिस्थितीतही शेतकºयांनी सिंचन करुन धान जगविला. सप्टेंबर महिन्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली. शेतकºयांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. मात्र १५ दिवसांपासून पाऊस थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतकरी धास्तावलेला दिसत आहे.तीन वर्षांपासून नापिकीमागील तीन वर्षांपासून सततच्या नापिकीला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावर्षी नाही, तर पुढल्यावर्षी तरी चांगले पिक येईल, या आशेने शेतकरी राबराब राबून कष्ट करीत. मात्र लहरी निसर्गामुळे सर्व व्यर्थ गेल्यागत परिस्थिती बळीराजासमोर निर्माण झाली आहे. शासनाने खरीप पिकांच्या लागवडीसाठी बी-बियाणे पुरविण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात त्याचा लाभ शेतकºयांना मिळाला नाही. त्यामुळे याही वर्षी शेतकºयांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार आहे.कृषी विभागाने करावे मार्गदर्शनकाही भागात धान पिकावर किडीचे आक्रमण झाले आहे. शेतकरी आपल्या पद्धतीने महागडी औषधी फवारत आहे. मात्र त्याचा फारसा परिणाम होत नाही. कीड नियंत्रणासाठी कोणते औषध फवाराचे, याबाबत कृषी विभाग मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.पावसामुळे खरीप पिके धोक्यातसाधारणत: दीड ते दोन महिन्यांपासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे खरीप पिकांना फटका बसला आहे. पीक व्यवस्थापनावरील खर्चातवाढ झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती