शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

फुलोऱ्यावरील धानाला पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 06:00 IST

दुसरीकडे उच्चप्रतीचा धानही किडींच्या आक्रमणात सापडला आहे. विविध किडींचे आक्रमण झाले आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकरी महागडे किटकनाशक फवारत आहे. परंतु फवारणी होत नाही तोच पावसाची सर कोसळते. त्यामुळे फवारणीचा कोणताही परिणाम किडींवर होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हमणे आहे.

ठळक मुद्देफवारणीचा उपयोग नाही : धानावर कीडीचे आक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: सततच्या पावसाचा फुलोऱ्यावर आलेल्या धानाला फटका बसत आहे. धानाचे फूल जळत असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उच्च प्रतीच्या धानावर कीडीचे आक्रमण झाले आहे. पावसामुळे फवारणीही निष्प्रभ ठरत असून शेतकरी हवालदिल झाले आहे.गत २५ दिवसांपासून जिल्ह्यात दररोज पाऊस कोसळत आहे. सध्या हलक्या प्रतीचा धान निसरला असून काही ठिकाणी तो फुलोऱ्यांवर आला आहे. सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने झालेला पाऊस पिकांसाठी समाधानकारक असला तरी आता मात्र सततच्या पावसाचा फटका हलक्याप्रतीच्या धानाला बसत आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात हलक्याप्रतीच्या धानाची लागवड करण्यात आली. सध्या फुलोºयावरील धानाला पावसाचा फटका बसत आहे. निसवून १५ ते २० दिवस झालेल्या धानाचे सर्वाधिक नुकसान होत आहे. फूल जळत असल्याने धान भरत नाही. त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.दुसरीकडे उच्चप्रतीचा धानही किडींच्या आक्रमणात सापडला आहे. विविध किडींचे आक्रमण झाले आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकरी महागडे किटकनाशक फवारत आहे. परंतु फवारणी होत नाही तोच पावसाची सर कोसळते. त्यामुळे फवारणीचा कोणताही परिणाम किडींवर होत नसल्याचे शेतकºयांचे म्हमणे आहे. सातत्याने महागडी फवारणी करावी लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.सुरुवातीला पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले होते. या परिस्थितीतही शेतकºयांनी सिंचन करुन धान जगविला. सप्टेंबर महिन्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली. शेतकºयांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. मात्र १५ दिवसांपासून पाऊस थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतकरी धास्तावलेला दिसत आहे.तीन वर्षांपासून नापिकीमागील तीन वर्षांपासून सततच्या नापिकीला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावर्षी नाही, तर पुढल्यावर्षी तरी चांगले पिक येईल, या आशेने शेतकरी राबराब राबून कष्ट करीत. मात्र लहरी निसर्गामुळे सर्व व्यर्थ गेल्यागत परिस्थिती बळीराजासमोर निर्माण झाली आहे. शासनाने खरीप पिकांच्या लागवडीसाठी बी-बियाणे पुरविण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात त्याचा लाभ शेतकºयांना मिळाला नाही. त्यामुळे याही वर्षी शेतकºयांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार आहे.कृषी विभागाने करावे मार्गदर्शनकाही भागात धान पिकावर किडीचे आक्रमण झाले आहे. शेतकरी आपल्या पद्धतीने महागडी औषधी फवारत आहे. मात्र त्याचा फारसा परिणाम होत नाही. कीड नियंत्रणासाठी कोणते औषध फवाराचे, याबाबत कृषी विभाग मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.पावसामुळे खरीप पिके धोक्यातसाधारणत: दीड ते दोन महिन्यांपासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे खरीप पिकांना फटका बसला आहे. पीक व्यवस्थापनावरील खर्चातवाढ झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती