शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
5
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
6
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
7
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
8
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
9
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
10
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
11
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
12
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
13
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
14
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
15
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
16
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
17
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
18
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
19
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
20
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 

रेल्वेची वाय-फाय सुविधा हवेतच; प्रवासीच आहेत अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2021 5:00 AM

रेल्वे प्रवाशांना रेल्वेची वाट बघताना कंटाळा येऊ नये, म्हणून रेल्वेस्थानकावर वाय-फाय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र याबाबत पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती झाली नाही. तसेच बहुतेकदा ही वाय-फाय सेवा बंद असते. त्यातच अनेकांच्या मोबाइलमध्ये तीन ते सहा महिन्यांचे अनलिमिटेड नेट उपलब्ध असल्याने या वाय-फायचा वापर करताना दिसून येत नाही. 

परिमल डोहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रमुख रेल्वेस्थानकावर मोफत वाय-फाय सेवा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यांतर्गत बल्लारपूर रेल्वे जंक्शन येथे वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र बरेचदा ही वाय-फाय सेवा बंदच राहत असल्याचे दिसून येते. प्रवाशांनादेखील या वाय-फाय सेवेची माहिती नसल्याने ही वाय-फाय सेवा  नावालाच असल्याचे बोलले जाते. रेल्वे प्रवाशांना रेल्वेची वाट बघताना कंटाळा येऊ नये, म्हणून रेल्वेस्थानकावर वाय-फाय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र याबाबत पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती झाली नाही. तसेच बहुतेकदा ही वाय-फाय सेवा बंद असते. त्यातच अनेकांच्या मोबाइलमध्ये तीन ते सहा महिन्यांचे अनलिमिटेड नेट उपलब्ध असल्याने या वाय-फायचा वापर करताना दिसून येत नाही. 

प्रवाशांना वाय-फाय ठाऊकच नाही

अनेकदा रेल्वेने प्रवास केला. मात्र रेल्वेस्थानकावर रेल्वे विभागातर्फे वाय-फाय सेवा मोफत आहे. याबाबत आपणाला पुसटशी कल्पनाही नाही. तसेच कुठे फलकही लावला नसल्याने कधीच या वाय-फाय सेवेचा उपभोग घेतला नाही.-प्रशांत खोब्रागडे

आजपर्यंत अनेक छोटमोठ्या स्टेशनवरून रेल्वेने प्रवास केला. मात्र याबाबत माहितीच नाही. तसेच रेल्वेस्थानकावर असताना कधी मोबाइलवर वाय-फायसंदर्भात तशा प्रकारचे नोटिफिकेशन आल्याची माहिती नाही. त्यामुळे कधीच रेल्वेस्थानकावर वायफाय सेवेचा वापर आपण केला नाही.-प्रतिश मोटघरे

पॅसेंजर अद्यापही बंदसद्य:स्थितीत बल्लारपूर जंक्शनवरून २८ रेल्वे धावत आहेत. मात्र या रेल्वेला पाहिजे त्या प्रमाणात प्रवाशांचा प्रतिसाद दिसून येत नाही. त्यामुळे रेल्वे रिकाम्याच धावत असल्याचे दिसून येतात. त्यातच पॅसेंजर रेल्वे अद्यापही सुरू करण्यात आली नसल्याने प्रवाशांची मोठी पंचायत होत आहे.

रेल्वेस्थानकावर येणाऱ्या सर्वांसाठी वाय-फाय सुविधा उपलब्ध आहे. बहुतांश प्रवासी या सेवेचा उपभोग घेतात. रेल्वे कर्मचाऱ्यांपासून अधिकारीसुद्धा या सेवेचा वापर करतात. ही वाय-फाय सेवा सुरळीत सुरू आहे. रामलाल सिंग, स्टेशन मास्तर

 

टॅग्स :railwayरेल्वेWiFiवायफाय