शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

रेल्वेची वाय-फाय सुविधा हवेतच; प्रवासीच आहेत अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 05:00 IST

रेल्वे प्रवाशांना रेल्वेची वाट बघताना कंटाळा येऊ नये, म्हणून रेल्वेस्थानकावर वाय-फाय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र याबाबत पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती झाली नाही. तसेच बहुतेकदा ही वाय-फाय सेवा बंद असते. त्यातच अनेकांच्या मोबाइलमध्ये तीन ते सहा महिन्यांचे अनलिमिटेड नेट उपलब्ध असल्याने या वाय-फायचा वापर करताना दिसून येत नाही. 

परिमल डोहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रमुख रेल्वेस्थानकावर मोफत वाय-फाय सेवा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यांतर्गत बल्लारपूर रेल्वे जंक्शन येथे वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र बरेचदा ही वाय-फाय सेवा बंदच राहत असल्याचे दिसून येते. प्रवाशांनादेखील या वाय-फाय सेवेची माहिती नसल्याने ही वाय-फाय सेवा  नावालाच असल्याचे बोलले जाते. रेल्वे प्रवाशांना रेल्वेची वाट बघताना कंटाळा येऊ नये, म्हणून रेल्वेस्थानकावर वाय-फाय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र याबाबत पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती झाली नाही. तसेच बहुतेकदा ही वाय-फाय सेवा बंद असते. त्यातच अनेकांच्या मोबाइलमध्ये तीन ते सहा महिन्यांचे अनलिमिटेड नेट उपलब्ध असल्याने या वाय-फायचा वापर करताना दिसून येत नाही. 

प्रवाशांना वाय-फाय ठाऊकच नाही

अनेकदा रेल्वेने प्रवास केला. मात्र रेल्वेस्थानकावर रेल्वे विभागातर्फे वाय-फाय सेवा मोफत आहे. याबाबत आपणाला पुसटशी कल्पनाही नाही. तसेच कुठे फलकही लावला नसल्याने कधीच या वाय-फाय सेवेचा उपभोग घेतला नाही.-प्रशांत खोब्रागडे

आजपर्यंत अनेक छोटमोठ्या स्टेशनवरून रेल्वेने प्रवास केला. मात्र याबाबत माहितीच नाही. तसेच रेल्वेस्थानकावर असताना कधी मोबाइलवर वाय-फायसंदर्भात तशा प्रकारचे नोटिफिकेशन आल्याची माहिती नाही. त्यामुळे कधीच रेल्वेस्थानकावर वायफाय सेवेचा वापर आपण केला नाही.-प्रतिश मोटघरे

पॅसेंजर अद्यापही बंदसद्य:स्थितीत बल्लारपूर जंक्शनवरून २८ रेल्वे धावत आहेत. मात्र या रेल्वेला पाहिजे त्या प्रमाणात प्रवाशांचा प्रतिसाद दिसून येत नाही. त्यामुळे रेल्वे रिकाम्याच धावत असल्याचे दिसून येतात. त्यातच पॅसेंजर रेल्वे अद्यापही सुरू करण्यात आली नसल्याने प्रवाशांची मोठी पंचायत होत आहे.

रेल्वेस्थानकावर येणाऱ्या सर्वांसाठी वाय-फाय सुविधा उपलब्ध आहे. बहुतांश प्रवासी या सेवेचा उपभोग घेतात. रेल्वे कर्मचाऱ्यांपासून अधिकारीसुद्धा या सेवेचा वापर करतात. ही वाय-फाय सेवा सुरळीत सुरू आहे. रामलाल सिंग, स्टेशन मास्तर

 

टॅग्स :railwayरेल्वेWiFiवायफाय