शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

पहाडावरील रब्बी पिकाला अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 05:00 IST

सध्या कोरोनाची दहशत आहे. प्रत्येकजण घरात बसून आहे. त्यामुळे कामे ठप्प पडली आहे. शेतातसुद्धा काम करण्यासाठी मजूर येत नसल्याची स्थिती आहे. त्यातच शेतमालाला बाजारपेठही उपलब्ध नाही आणि मागणीही थांबली आहे. या संकटात आणखी वादळी वाºयाची भर पडली आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून दुसारच्या सुमारास वादळी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेतात असलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंतातूर : कोरोनाच्या दहशतीने डोळ्यात आणले पाणी

शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : खरीप हंगामातील उत्पादनात झालेली घट भरून काढण्यासाठी यावर्षी पहाडावरील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामाकडे लक्ष केंद्रीत केले. अनुकूल वातावरणामुळे यावर्षी पिकेही दमदार आली. मात्र दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. कोरोनाच्या दहशतीत शेतकऱ्यांवर आणखी एक संकट कोसळले आहे.सेवादासनगर येथील शेतकऱ्यांच्या ज्वारी व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तर पहाडावरील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरापाई द्यावी, अशी मागणी येथील सरपंच विमल राठोड यांनी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.सध्या कोरोनाची दहशत आहे. प्रत्येकजण घरात बसून आहे. त्यामुळे कामे ठप्प पडली आहे. शेतातसुद्धा काम करण्यासाठी मजूर येत नसल्याची स्थिती आहे. त्यातच शेतमालाला बाजारपेठही उपलब्ध नाही आणि मागणीही थांबली आहे. या संकटात आणखी वादळी वाºयाची भर पडली आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून दुसारच्या सुमारास वादळी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेतात असलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उभे असलेले पीक आडवे झाले आहे. खरीप हंगामातील पिके काढणीला आली तेव्हा परतीच्या पावसाने नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. ही तुट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी पिकाकडे अधिक लक्ष दिले. यासाठी खत, कीटकनाशक आदींचा मोठ्या प्रमाणात वापर केला. मात्र हा हंगामही शेतकऱ्यांच्या हातून गेला. त्यामुळे रब्बीनेही शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण केले नसल्याचे स्थिती आहे. एकिकडे कोरोनाची दहशत आणि दुसरीकडे निसर्गाची अवकृपा यामध्ये पहाडावरील शेतकरी अक्षरश: दबला गेला आहे.यंदा रब्बी हंगामातील पिके चांगली आली होती. मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.- संजय चव्हाणशेतकरी, सेवादासनगर.अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करून मदत देण्याची गरज आहे.- विमल राठोड,सरपंच, नोकेवाडा

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती