शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

गावकऱ्यांचा ठिय्या; तरीही पाणीपुरवठा नाहीच; विसापूर ग्रामपंचायतीचे ढिसाळ नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 15:00 IST

Chandrapur : पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे ग्रामपंचायतीने दिले लेखी आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क विसापूर : पाण्याची कोणतीही कृत्रिम टंचाई नसताना विसापूर ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनापायी मागील दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही विसापूर गावातील पाणीपुरवठा योजना ठप्प आहे. त्यामुळे मुबलक पाऊस पडूनही गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे

याबाबत ठोस उपाययोजना न केल्यामुळे 'लोकमत'ने यापूर्वी गावकऱ्यांचा संयमाचा बांध कधीही फुटून ते मोर्चा काढून संबंधितांना धारेवर धरू शकतात, असे भाकीत केले होते. ते अखेर खरे ठरले व गावकऱ्यांचा संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी संदीप पोडे यांच्या नेतृत्वात गुरुवारी मोर्चा काढून ग्रामपंचायतीत ठिय्या आंदोलन केले. अखेर ग्रामपंचायतीकडून ग्रामसचिव किशोर धकाते यांनी लेखी आश्वासन देत २४ सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची हमी दिल्यावर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु, यापूर्वीही दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीने दिले होते. पण अजूनही पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. यामुळे आतातरी गावकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनमुळे पाणीपुरवठा सुरळीत होईल का? असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थांना पडला आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील पंप हाऊसची इंटक मोटार ही फार जुनी असून, तिचे आयुष्य संपले आहे. ती नवीन घेण्याशिवाय पर्याय नाही, याची माहिती ग्रामपंचायतीत नवीन सत्ता बसली तेव्हाच सर्व सदस्यांना माहीत होते. 

यावर ठरावसुद्धा घेण्यात आला. परंतु, नियोजनाअभावी आजतागायत तीच जुनी मोटार वारंवार दुरुस्त करून तिचा वापर सुरू आहे. यामुळे ग्रामस्थांना नदीला मुबलक पाणी असूनही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याबाबत यापूर्वी 'लोकमत'ने प्रकाश टाकला व गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, असे भाकीत केले होते. परंतु, कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे अखेर गुरुवारी गावकऱ्यांनी भाजपा नेते संदीप पोडे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करून ग्रामपंचायतीला जेरीस आणले. यावेळी सरपंच अनुपस्थित असल्याने उपसरपंच व ग्रामसचिवांना गावकऱ्यांचा रोष पत्करावा लागला. अखेर ग्रामसचिव किशोर धकाते यांनी २४ सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. 

ग्रामपंचायतीचे ढिसाळ नियोजन बल्लारपूर तालुक्यातील सर्वांत मोठे गाव असलेल्या विसापुरात मागील एक वर्षापासून ना त्या कारणाने अधूनमधून पाणीपुरवठा बंद पडत आहे. यावेळी दोन महिन्यांपासून योजना ठप्प पडली आहे. कधी वीज कपातीमुळे तर कधी पंप हाऊसची इंटक मोटरच्या बिघाडामुळे नळपाणी पुरवठा बंद असते. ग्रामपंचायतीचे ढिसाळ नियोजन याला कारणीभूत असल्याचे गावकऱ्यांचे मत आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात