शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

गावकऱ्यांचा ठिय्या; तरीही पाणीपुरवठा नाहीच; विसापूर ग्रामपंचायतीचे ढिसाळ नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 15:00 IST

Chandrapur : पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे ग्रामपंचायतीने दिले लेखी आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क विसापूर : पाण्याची कोणतीही कृत्रिम टंचाई नसताना विसापूर ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनापायी मागील दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही विसापूर गावातील पाणीपुरवठा योजना ठप्प आहे. त्यामुळे मुबलक पाऊस पडूनही गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे

याबाबत ठोस उपाययोजना न केल्यामुळे 'लोकमत'ने यापूर्वी गावकऱ्यांचा संयमाचा बांध कधीही फुटून ते मोर्चा काढून संबंधितांना धारेवर धरू शकतात, असे भाकीत केले होते. ते अखेर खरे ठरले व गावकऱ्यांचा संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी संदीप पोडे यांच्या नेतृत्वात गुरुवारी मोर्चा काढून ग्रामपंचायतीत ठिय्या आंदोलन केले. अखेर ग्रामपंचायतीकडून ग्रामसचिव किशोर धकाते यांनी लेखी आश्वासन देत २४ सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची हमी दिल्यावर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु, यापूर्वीही दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीने दिले होते. पण अजूनही पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. यामुळे आतातरी गावकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनमुळे पाणीपुरवठा सुरळीत होईल का? असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थांना पडला आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील पंप हाऊसची इंटक मोटार ही फार जुनी असून, तिचे आयुष्य संपले आहे. ती नवीन घेण्याशिवाय पर्याय नाही, याची माहिती ग्रामपंचायतीत नवीन सत्ता बसली तेव्हाच सर्व सदस्यांना माहीत होते. 

यावर ठरावसुद्धा घेण्यात आला. परंतु, नियोजनाअभावी आजतागायत तीच जुनी मोटार वारंवार दुरुस्त करून तिचा वापर सुरू आहे. यामुळे ग्रामस्थांना नदीला मुबलक पाणी असूनही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याबाबत यापूर्वी 'लोकमत'ने प्रकाश टाकला व गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, असे भाकीत केले होते. परंतु, कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे अखेर गुरुवारी गावकऱ्यांनी भाजपा नेते संदीप पोडे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करून ग्रामपंचायतीला जेरीस आणले. यावेळी सरपंच अनुपस्थित असल्याने उपसरपंच व ग्रामसचिवांना गावकऱ्यांचा रोष पत्करावा लागला. अखेर ग्रामसचिव किशोर धकाते यांनी २४ सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. 

ग्रामपंचायतीचे ढिसाळ नियोजन बल्लारपूर तालुक्यातील सर्वांत मोठे गाव असलेल्या विसापुरात मागील एक वर्षापासून ना त्या कारणाने अधूनमधून पाणीपुरवठा बंद पडत आहे. यावेळी दोन महिन्यांपासून योजना ठप्प पडली आहे. कधी वीज कपातीमुळे तर कधी पंप हाऊसची इंटक मोटरच्या बिघाडामुळे नळपाणी पुरवठा बंद असते. ग्रामपंचायतीचे ढिसाळ नियोजन याला कारणीभूत असल्याचे गावकऱ्यांचे मत आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात