शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

साऊंड गनच्या साहाय्याने शेतपिकांचे रक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST

मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र होत आहे. यामध्ये प्रामुख्याने वन्यजीवांचे बळी जात असले तरी मानव व पाळीव प्राण्यांचे बळी जाण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. शिवाय वन्यप्राण्याच्या या वाढत्या उपद्रवामुळे शेती व्यवसायही धोक्यात आला आहे. ही समस्या गंभीर बनली आहे तर शेकडो शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी वनविभागाकडे अर्ज केले आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : आवाजाने वन्यप्राणी होतात पसार, वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका नाही

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन जंगलालगत आहे. त्यामुळे जंगली प्राण्याद्वारे शेतकºयांचे मोठया प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी व वन्यप्राणी, पक्षी यांना शेतातून हाकलून लावून जंगली प्राण्यांपासून शेत पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकºयांनी आता प्लास्टिक पाईपपासून बनवलेली गन हातात घेतली आहे. हीच गन शेतकऱ्यांना वन्यजिवाकडून होणाºया पिकाच्या नुकसानीपासून वाचवणार आहे.मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र होत आहे. यामध्ये प्रामुख्याने वन्यजीवांचे बळी जात असले तरी मानव व पाळीव प्राण्यांचे बळी जाण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. शिवाय वन्यप्राण्याच्या या वाढत्या उपद्रवामुळे शेती व्यवसायही धोक्यात आला आहे. ही समस्या गंभीर बनली आहे तर शेकडो शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी वनविभागाकडे अर्ज केले आहेत. शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी या गनचा पर्याय चांगला यशस्वी ठरत आहे.वाघ, बिबट यांची संख्या वाढल्यापासून ही समस्या गंभीर बनली आहे. वाघाबरोबरच गवे, माकड, मोर, हरीण, नीलगाई, डुक्कर, बिबटे अशा अनेक वन्यप्राण्यांचे शेती व पाळीव जनावरांवर आक्रमण होत असल्याने येथील शेतकरी त्रस्त आहेत. याशिवाय गवे, माकड, बिबटे व चितळ या प्राण्यांच्या उपद्रवात कमालीची वाढ झाली आहे. मात्र या पाईपपासून बनवलेली ‘साऊंड गन’ पासून कुठल्याही प्राण्यांची जीवित हानी न होता फक्त शेतातून आवाजाने हुसकावून लावण्यासाठी होतो.चिमूर तालुक्यातील खडसंगी, माकड, भानसुली, बोथली, वाहानगाव या गावातील काही शेतकºयांनी शेतात या तोफचा आवाज करणे सुरू केले. त्यामुळे शेतात येणाऱ्या रानडुकर, माकड आणि नीलगाई पळून गेल्या तर काही शेतमालकांनी या प्रयोगानंतर वन्यप्राणी शेतात आलेच नसल्याचे सांगितले. साऊंड गनमुळे शेतपिकाचे नुकसान बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आल्याचेही ते म्हणाले. ही साउंड गन शेतकºयांना दिलासा देणारी असून येत्या काळात वनविभागातील वन्यजीवग्रस्त भागात या गनचा उपयोग करण्याचा निर्णय शेतकºयांनी घेतला आहे. त्यामुळे जंगलाजवळील शेतकऱ्यांच्या हातात आता गन दिसणार आहे.ही गन असा करते आवाजप्लास्टिक पाईपपासून तयार केलेल्या या गनमध्ये मोठ्या व्यासापासून निमुळत्या व्यासाचे पाईप वापरले आहेत. त्या पाईपमध्ये वर केलेल्या छिद्रातून कारबाईट टाकून त्यावर पाण्याचे काही थेंब टाकल्यानंतर त्याला बंद केले जाते. त्यामुळे पाईपमध्ये गॅस तयार होते. नंतर गॅसला मागून लायटरद्वारे ठिणगी पडल्यानंतर यामध्ये मोठा आवाज निर्माण होतो.गनसाठी वापरले जाणारे साहित्यया गनसाठी शेतात सिंचनासाठी वापरले जाणारे कमी जाडीचे प्लास्टिक पाईप, कापलिंग, कॅप, गॅस लायटर व कारबाईट चे तुकडे वापरले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना ही गन किफायतशीर दरात मिळत आहे.प्रक्रियेमुळे होतो आवाजजेव्हा कॅल्शियम कारबाईटची प्रक्रिया पाण्यासोबत होते, तेव्हा अत्यंत ज्वलनशील गॅस तयार होते. असिटीलीन गॅसची आॅक्सिजनसोबत प्रक्रिया करून ज्वलनशील गॅस तयार होतो. जेव्हा आग लावल्या जाते, तेव्हा हे मोठा आवाज होऊन स्फोट होतो. आवाज हा पाईपच्या व्यासावर अवलंबून असतो.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती