शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

साऊंड गनच्या साहाय्याने शेतपिकांचे रक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST

मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र होत आहे. यामध्ये प्रामुख्याने वन्यजीवांचे बळी जात असले तरी मानव व पाळीव प्राण्यांचे बळी जाण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. शिवाय वन्यप्राण्याच्या या वाढत्या उपद्रवामुळे शेती व्यवसायही धोक्यात आला आहे. ही समस्या गंभीर बनली आहे तर शेकडो शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी वनविभागाकडे अर्ज केले आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : आवाजाने वन्यप्राणी होतात पसार, वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका नाही

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन जंगलालगत आहे. त्यामुळे जंगली प्राण्याद्वारे शेतकºयांचे मोठया प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी व वन्यप्राणी, पक्षी यांना शेतातून हाकलून लावून जंगली प्राण्यांपासून शेत पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकºयांनी आता प्लास्टिक पाईपपासून बनवलेली गन हातात घेतली आहे. हीच गन शेतकऱ्यांना वन्यजिवाकडून होणाºया पिकाच्या नुकसानीपासून वाचवणार आहे.मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र होत आहे. यामध्ये प्रामुख्याने वन्यजीवांचे बळी जात असले तरी मानव व पाळीव प्राण्यांचे बळी जाण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. शिवाय वन्यप्राण्याच्या या वाढत्या उपद्रवामुळे शेती व्यवसायही धोक्यात आला आहे. ही समस्या गंभीर बनली आहे तर शेकडो शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी वनविभागाकडे अर्ज केले आहेत. शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी या गनचा पर्याय चांगला यशस्वी ठरत आहे.वाघ, बिबट यांची संख्या वाढल्यापासून ही समस्या गंभीर बनली आहे. वाघाबरोबरच गवे, माकड, मोर, हरीण, नीलगाई, डुक्कर, बिबटे अशा अनेक वन्यप्राण्यांचे शेती व पाळीव जनावरांवर आक्रमण होत असल्याने येथील शेतकरी त्रस्त आहेत. याशिवाय गवे, माकड, बिबटे व चितळ या प्राण्यांच्या उपद्रवात कमालीची वाढ झाली आहे. मात्र या पाईपपासून बनवलेली ‘साऊंड गन’ पासून कुठल्याही प्राण्यांची जीवित हानी न होता फक्त शेतातून आवाजाने हुसकावून लावण्यासाठी होतो.चिमूर तालुक्यातील खडसंगी, माकड, भानसुली, बोथली, वाहानगाव या गावातील काही शेतकºयांनी शेतात या तोफचा आवाज करणे सुरू केले. त्यामुळे शेतात येणाऱ्या रानडुकर, माकड आणि नीलगाई पळून गेल्या तर काही शेतमालकांनी या प्रयोगानंतर वन्यप्राणी शेतात आलेच नसल्याचे सांगितले. साऊंड गनमुळे शेतपिकाचे नुकसान बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आल्याचेही ते म्हणाले. ही साउंड गन शेतकºयांना दिलासा देणारी असून येत्या काळात वनविभागातील वन्यजीवग्रस्त भागात या गनचा उपयोग करण्याचा निर्णय शेतकºयांनी घेतला आहे. त्यामुळे जंगलाजवळील शेतकऱ्यांच्या हातात आता गन दिसणार आहे.ही गन असा करते आवाजप्लास्टिक पाईपपासून तयार केलेल्या या गनमध्ये मोठ्या व्यासापासून निमुळत्या व्यासाचे पाईप वापरले आहेत. त्या पाईपमध्ये वर केलेल्या छिद्रातून कारबाईट टाकून त्यावर पाण्याचे काही थेंब टाकल्यानंतर त्याला बंद केले जाते. त्यामुळे पाईपमध्ये गॅस तयार होते. नंतर गॅसला मागून लायटरद्वारे ठिणगी पडल्यानंतर यामध्ये मोठा आवाज निर्माण होतो.गनसाठी वापरले जाणारे साहित्यया गनसाठी शेतात सिंचनासाठी वापरले जाणारे कमी जाडीचे प्लास्टिक पाईप, कापलिंग, कॅप, गॅस लायटर व कारबाईट चे तुकडे वापरले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना ही गन किफायतशीर दरात मिळत आहे.प्रक्रियेमुळे होतो आवाजजेव्हा कॅल्शियम कारबाईटची प्रक्रिया पाण्यासोबत होते, तेव्हा अत्यंत ज्वलनशील गॅस तयार होते. असिटीलीन गॅसची आॅक्सिजनसोबत प्रक्रिया करून ज्वलनशील गॅस तयार होतो. जेव्हा आग लावल्या जाते, तेव्हा हे मोठा आवाज होऊन स्फोट होतो. आवाज हा पाईपच्या व्यासावर अवलंबून असतो.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती